शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

शाळांच्या छतावरील पाणी विंधन विहिरीत

By admin | Updated: January 11, 2016 00:34 IST

जिल्हा परिषद : १५७ शाळांमध्ये राबवणार उपक्रम

रत्नागिरी : संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या १५७ प्राथमिक शाळांच्या इमारतींचे छतावरील पाणी बोअरवेलमध्ये सोडून नैसर्गिकरित्या पुनर्भरण करुन पाण्याच्या पातळीत वाढ करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दरवर्षी सर्वाधिक पाऊस पडूनही खडकाळ जमिनीमुळे नद्या, नाल्यांद्वारे पावसाचे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते, त्यामुळे एप्रिल, मे महिन्यांत भीषण पाणीटंचाई उद्भवते. त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई उद्भवणार हे निश्चित आहे. मात्र, त्यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने लोकसहभागातून मिशन बंधारे २०१५च्या माध्यमातून वनराई बंधारे, कच्चे बंधारे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत श्रमदानातून सुमारे साडेचार हजार बंधारे उभारण्यात आले आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पाणीटंचाईमुळे प्राथमिक शाळांनाही ती जाणवत असते. अनेकदा पाण्यासाठी विद्यार्थ्यांनाही या टंचाईच्या कालावधीत त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी या पाणीटंचाईचा त्रास जाणवू नये, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने आतापासूनच उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करुन जिल्हा परिषदेने पाणी साठवण्याबाबतचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी प्राथमिक शाळांमधील विंधन विहिरींची उन्हाळ्यातही पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी आतापासूनच उपाय योजले जात आहेत. त्यासाठी येत्या पावसाळ्यात या प्राथमिक शाळांच्या छतावरील पाणी या विंधन विहिरींमध्ये सोडण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)