शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

शाळांच्या छतावरील पाणी विंधन विहिरीत

By admin | Updated: January 11, 2016 00:34 IST

जिल्हा परिषद : १५७ शाळांमध्ये राबवणार उपक्रम

रत्नागिरी : संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या १५७ प्राथमिक शाळांच्या इमारतींचे छतावरील पाणी बोअरवेलमध्ये सोडून नैसर्गिकरित्या पुनर्भरण करुन पाण्याच्या पातळीत वाढ करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दरवर्षी सर्वाधिक पाऊस पडूनही खडकाळ जमिनीमुळे नद्या, नाल्यांद्वारे पावसाचे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते, त्यामुळे एप्रिल, मे महिन्यांत भीषण पाणीटंचाई उद्भवते. त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई उद्भवणार हे निश्चित आहे. मात्र, त्यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने लोकसहभागातून मिशन बंधारे २०१५च्या माध्यमातून वनराई बंधारे, कच्चे बंधारे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत श्रमदानातून सुमारे साडेचार हजार बंधारे उभारण्यात आले आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पाणीटंचाईमुळे प्राथमिक शाळांनाही ती जाणवत असते. अनेकदा पाण्यासाठी विद्यार्थ्यांनाही या टंचाईच्या कालावधीत त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी या पाणीटंचाईचा त्रास जाणवू नये, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने आतापासूनच उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करुन जिल्हा परिषदेने पाणी साठवण्याबाबतचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी प्राथमिक शाळांमधील विंधन विहिरींची उन्हाळ्यातही पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी आतापासूनच उपाय योजले जात आहेत. त्यासाठी येत्या पावसाळ्यात या प्राथमिक शाळांच्या छतावरील पाणी या विंधन विहिरींमध्ये सोडण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)