शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

प्रमोद जठारांनी 'त्यावेळी' राणेंवर केलेले आरोप खोटे होते काय? सतीश सावंतांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 18:45 IST

प्रमोद जठार यांची अवस्था अडकीत्यात अडकलेल्या सुपारीसारखी

कणकवली : प्रमोद जठार यांची अवस्था अडकीत्यात अडकलेल्या सुपारीसारखी झाली आहे. जशी आवळा सुपारी चघळून फेकून देतात तशीच गत जठार यांची झाली आहे. राणे यांचे समर्थन ते आता करीत आहेत. मात्र, राणे भाजप मध्ये येण्यापूर्वी त्यांनी त्यांच्यावर केलेले आरोप खोटे होते का? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. असे आव्हान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले आहे. भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी नितेश राणेंवर सूडबुद्धीने पोलिसांवर दबाव आणून राज्य सरकार कारवाई करत असल्याची टीका केली होती. या टीकेला सतीश सावंत यांनी कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड , शहरप्रमुख चंद्रशेखर राणे, नगरसेवक कन्हैया पारकर, उपतालुकाप्रमुख राजू राणे, सिद्धेश राणे आदी उपस्थित होते. 

सतीश सावंत म्हणाले, काँग्रेसमध्ये राणे कुटुंबीय असताना प्रमोद जठार यांनी स्वतः राणेंवर केलेली टीकात्मक विधाने आठवावीत. मात्र, आता प्रमोद जठार यांचा आत्मा रिफायनरीमध्ये अडकला आहे. त्यांना राणे कुटुंबियांवर प्रेम नसून ग्रीन रिफायनरी मार्गी लागावी यासाठी जठार प्रयत्न करत आहेत. 

२०१४ च्या निवडणुकीत भाजपा कार्यालयात नितेश राणेंनी सोडलेल्या म्हशी जठार विसरले आहेत का? आता खासदारकीचे तिकीट स्वतःला मिळण्यासाठी जठार हे राणेंची तळी उचलत आहेत. संतोष परबवर १८ डिसेंबरला हल्ला झाला आणि त्यानंतर सचिन सातपुतेला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून नितेश राणेंचे नाव या हल्ल्यात आले. त्यानंतर जिल्हा, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे कणकवली न्यायालयात शरण गेले. 

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. संतोष परबवर हल्ला होऊन त्याला १८ टाके पडले. मात्र केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी त्याबाबत परबला फक्त खरचटले आहे, असे म्हटले होते. त्यामुळे नितेश राणेंना आता ऍसिडिटीमुळे छातीत दुखत असेल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जरी मी त्यावेळी राणेंसोबत होतो तरी अनधिकृत आंदोलनांच्यावेळी मी त्यांची साथ दिली नाही.भाजप तालुकाध्यक्षाला झालेली मारहाण, चिखलफेक या सारख्या प्रकरणात मी त्यांच्या सोबत नव्हतो. जठार यांनी राणे विरोधात असताना त्यांच्यावर त्यावेळी केलेले आरोप खोटे होते काय ? तसे असेल तर आता जठार यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, असेही सतीश सावंत म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग