शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

प्रमोद जठारांनी 'त्यावेळी' राणेंवर केलेले आरोप खोटे होते काय? सतीश सावंतांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 18:45 IST

प्रमोद जठार यांची अवस्था अडकीत्यात अडकलेल्या सुपारीसारखी

कणकवली : प्रमोद जठार यांची अवस्था अडकीत्यात अडकलेल्या सुपारीसारखी झाली आहे. जशी आवळा सुपारी चघळून फेकून देतात तशीच गत जठार यांची झाली आहे. राणे यांचे समर्थन ते आता करीत आहेत. मात्र, राणे भाजप मध्ये येण्यापूर्वी त्यांनी त्यांच्यावर केलेले आरोप खोटे होते का? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. असे आव्हान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले आहे. भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी नितेश राणेंवर सूडबुद्धीने पोलिसांवर दबाव आणून राज्य सरकार कारवाई करत असल्याची टीका केली होती. या टीकेला सतीश सावंत यांनी कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड , शहरप्रमुख चंद्रशेखर राणे, नगरसेवक कन्हैया पारकर, उपतालुकाप्रमुख राजू राणे, सिद्धेश राणे आदी उपस्थित होते. 

सतीश सावंत म्हणाले, काँग्रेसमध्ये राणे कुटुंबीय असताना प्रमोद जठार यांनी स्वतः राणेंवर केलेली टीकात्मक विधाने आठवावीत. मात्र, आता प्रमोद जठार यांचा आत्मा रिफायनरीमध्ये अडकला आहे. त्यांना राणे कुटुंबियांवर प्रेम नसून ग्रीन रिफायनरी मार्गी लागावी यासाठी जठार प्रयत्न करत आहेत. 

२०१४ च्या निवडणुकीत भाजपा कार्यालयात नितेश राणेंनी सोडलेल्या म्हशी जठार विसरले आहेत का? आता खासदारकीचे तिकीट स्वतःला मिळण्यासाठी जठार हे राणेंची तळी उचलत आहेत. संतोष परबवर १८ डिसेंबरला हल्ला झाला आणि त्यानंतर सचिन सातपुतेला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून नितेश राणेंचे नाव या हल्ल्यात आले. त्यानंतर जिल्हा, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे कणकवली न्यायालयात शरण गेले. 

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. संतोष परबवर हल्ला होऊन त्याला १८ टाके पडले. मात्र केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी त्याबाबत परबला फक्त खरचटले आहे, असे म्हटले होते. त्यामुळे नितेश राणेंना आता ऍसिडिटीमुळे छातीत दुखत असेल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जरी मी त्यावेळी राणेंसोबत होतो तरी अनधिकृत आंदोलनांच्यावेळी मी त्यांची साथ दिली नाही.भाजप तालुकाध्यक्षाला झालेली मारहाण, चिखलफेक या सारख्या प्रकरणात मी त्यांच्या सोबत नव्हतो. जठार यांनी राणे विरोधात असताना त्यांच्यावर त्यावेळी केलेले आरोप खोटे होते काय ? तसे असेल तर आता जठार यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, असेही सतीश सावंत म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग