शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

सातबारा संगणकीकरणाचा सिंधुदुर्गातील सर्वसामान्यांना बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:02 IST

आॅनलाईन सातबारा संगणकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. २२ सप्टेंबरपासुन एन.आय.सी.पुणे येथील महसुलचा मुख्य सर्व्हर बंद असल्यामुळे तलाठयांचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे कणकवलीसह सिंधुदुर्गातील सर्वसामान्य पक्षकारांच्या असंख्य नोंदी, सातबारा दुरुस्त, नवीन सातबारासह होणारी सर्व कामे ठप्प झाली आहेत.

ठळक मुद्दे२२ सप्टेंबरपासुन कणकवलीसह सिंधुदुर्गातील मुख्य सर्व्हर बंद कार्यप्रणाली पुर्णत: नादुरुस्त, तलाठयांचे कामकाज झाले ठप्पजनतेची कामे वेळेत होण्यासाठी आॅफलाईन कामकाजाची मागणी

कणकवली ,दि. ०२ : आॅनलाईन सातबारा संगणकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. २२ सप्टेंबरपासुन एन.आय.सी.पुणे येथील महसुलचा मुख्य सर्व्हर बंद असल्यामुळे तलाठयांचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे कणकवलीसह सिंधुदुर्गातील सर्वसामान्य पक्षकारांच्या असंख्य नोंदी, सातबारा दुरुस्त, नवीन सातबारासह होणारी सर्व कामे ठप्प झाली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ सप्टेंबर २०१७ पासुन मुख्य सर्व्हर बंद असल्यामुळे आॅनलाईन कार्यप्रणाली उघडण्यास विलंब लागत आहे.

फक्त सातबारा जरी पक्षकाराला द्यावयाचा असल्यास तब्बल दिड ते दोन तास जात आहेत. तर इतर कामे करण्यासाठी एनआयसीची आॅनलाईन कार्यप्रणाली पुर्णत: नादुरुस्त असल्याचे दिसुन येत आहे.

त्यामुळे सर्वसामान्य ग्रामीण भागातील जनतेला विविध शासकीय, वैयक्तिक कामांसाठी लागणारे सातबारा, फेरफार नोंदी, सातबारात बदल यासह अन्य महसुल विषयक कामे होत नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहेत.

तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे संबंधीत अधिकाऱ्यांकडुन पाठपुरावा करुन देखील कुठलीही दखल घेतली जात नसल्याची चर्चा महसुल विभागात आहे.

एकीकडे तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांकडे विविध कामकाजाचा बोजा असतानाच आॅनलाईन फीडींगचे काम दिल्यामुळे दररोजच्या कामकाजावर परिणाम झाला होता. गेले दोन वर्षे सर्वसामान्य पक्षकारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

आॅनलाईन सातबारा खरेदी-विक्री या प्रक्रियेत वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासुन बंद असलेल्या सर्व्हरमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने महसुल विभागातील या मोठा अडचणीचा विषय बनलेल्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.आॅफलाईन कामकाजाची मागणीसिंधुदुर्ग जिल्ह्यात आॅनलाईन सातबारा, फेरफार नोंदी व इतर दस्त स्कॅनिंग करताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वर्षोनुवर्षे आॅनलाईन प्रक्रियेचे कामकाज प्रलंबीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तलाठी, मंडल अधिकारी, महसुल अधिकाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आॅनलाईन प्रक्रिया राबविताना जनतेची कामे वेळेत होण्यासाठी आॅफलाईन कामकाज करावे. तसेच आॅनलाईनचे कामकाज सोईने करुन १०० टक्के संगणीकृत कामकाज पुर्ण झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतुन केली जात आहे. 

टॅग्स :talukaतालुकाonlineऑनलाइन