शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सातबारा संगणकीकरणाचा सिंधुदुर्गातील सर्वसामान्यांना बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:02 IST

आॅनलाईन सातबारा संगणकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. २२ सप्टेंबरपासुन एन.आय.सी.पुणे येथील महसुलचा मुख्य सर्व्हर बंद असल्यामुळे तलाठयांचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे कणकवलीसह सिंधुदुर्गातील सर्वसामान्य पक्षकारांच्या असंख्य नोंदी, सातबारा दुरुस्त, नवीन सातबारासह होणारी सर्व कामे ठप्प झाली आहेत.

ठळक मुद्दे२२ सप्टेंबरपासुन कणकवलीसह सिंधुदुर्गातील मुख्य सर्व्हर बंद कार्यप्रणाली पुर्णत: नादुरुस्त, तलाठयांचे कामकाज झाले ठप्पजनतेची कामे वेळेत होण्यासाठी आॅफलाईन कामकाजाची मागणी

कणकवली ,दि. ०२ : आॅनलाईन सातबारा संगणकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. २२ सप्टेंबरपासुन एन.आय.सी.पुणे येथील महसुलचा मुख्य सर्व्हर बंद असल्यामुळे तलाठयांचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे कणकवलीसह सिंधुदुर्गातील सर्वसामान्य पक्षकारांच्या असंख्य नोंदी, सातबारा दुरुस्त, नवीन सातबारासह होणारी सर्व कामे ठप्प झाली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ सप्टेंबर २०१७ पासुन मुख्य सर्व्हर बंद असल्यामुळे आॅनलाईन कार्यप्रणाली उघडण्यास विलंब लागत आहे.

फक्त सातबारा जरी पक्षकाराला द्यावयाचा असल्यास तब्बल दिड ते दोन तास जात आहेत. तर इतर कामे करण्यासाठी एनआयसीची आॅनलाईन कार्यप्रणाली पुर्णत: नादुरुस्त असल्याचे दिसुन येत आहे.

त्यामुळे सर्वसामान्य ग्रामीण भागातील जनतेला विविध शासकीय, वैयक्तिक कामांसाठी लागणारे सातबारा, फेरफार नोंदी, सातबारात बदल यासह अन्य महसुल विषयक कामे होत नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहेत.

तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे संबंधीत अधिकाऱ्यांकडुन पाठपुरावा करुन देखील कुठलीही दखल घेतली जात नसल्याची चर्चा महसुल विभागात आहे.

एकीकडे तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांकडे विविध कामकाजाचा बोजा असतानाच आॅनलाईन फीडींगचे काम दिल्यामुळे दररोजच्या कामकाजावर परिणाम झाला होता. गेले दोन वर्षे सर्वसामान्य पक्षकारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

आॅनलाईन सातबारा खरेदी-विक्री या प्रक्रियेत वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासुन बंद असलेल्या सर्व्हरमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने महसुल विभागातील या मोठा अडचणीचा विषय बनलेल्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.आॅफलाईन कामकाजाची मागणीसिंधुदुर्ग जिल्ह्यात आॅनलाईन सातबारा, फेरफार नोंदी व इतर दस्त स्कॅनिंग करताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वर्षोनुवर्षे आॅनलाईन प्रक्रियेचे कामकाज प्रलंबीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तलाठी, मंडल अधिकारी, महसुल अधिकाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आॅनलाईन प्रक्रिया राबविताना जनतेची कामे वेळेत होण्यासाठी आॅफलाईन कामकाज करावे. तसेच आॅनलाईनचे कामकाज सोईने करुन १०० टक्के संगणीकृत कामकाज पुर्ण झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतुन केली जात आहे. 

टॅग्स :talukaतालुकाonlineऑनलाइन