शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कणकवली ते जानवली जोडणाऱ्या पुलाला लवकरच मंजुरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली माहिती

By सुधीर राणे | Updated: May 5, 2023 15:57 IST

बांधकाम अभियंत्यांना या पुलाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे दिले निर्देश

कणकवली : कणकवली आणि जानवली या दोन गावांना जोडणारा पूल लवकरच उभारला जाणार आहे. जानवली नदीवरील या पुलाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून पाठवा, असे निर्देश आम्ही बांधकाम विभागाला दिले आहेत. तर पुढील वर्षभरात कणकवली रेल्वे स्थानक परिसर विमानतळाच्या धर्तीवर विकसित होईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.     मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी कणकवली नगरपंचायतीला भेट दिली. यावेळी त्यांनी शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे ,माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संदेश सावंत,संजय कामतेकर,महेश सावंत तसेच अन्य नगरसेवक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, कणकवली व जानवली ही गावे जोडण्यासाठी जानवली नदीवर गणपती सान्याजवळ मोठा पूल व्हावा. अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती आता लवकरच पूर्णत्वास जाईल. बांधकाम अभियंत्यांना या पुलाचे अंदाजपत्रक तयार करायला सांगितले आहे. अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर या पुलासाठी निधी उपलब्ध करून देणार आहोत.कोकणात येणारा चाकरमानी किंवा पर्यटक यांचा प्रवास सुखाचा व्हावा. मोठ्या शहरांच्या धर्तीवर कोकणातही सुविधा मिळाव्यात यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे. त्याअनुषंगाने महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. तसेच रेल्वे स्थानकांकडे जाणारे रस्तेही चांगल्या दर्जाचे तयार केले जाणार आहेत. सिंधुदुर्गातील प्रमुख रेल्वे स्थानकांचे अद्ययावतीकरण होणार आहे.यामध्ये कणकवली रेल्वे स्थानक परिसर विमानतळाच्या धर्तीवर विकसित केला जाणार आहे. या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून पुढील वर्षापर्यंत ही कामे पूर्ण होणार आहेत. दरम्यान, सिंधुदुर्गातील रस्ते आणि पर्यटन अनुषांगिक कामांच्या पूर्ततेला प्राधान्य देण्यात आल्याची माहितीही मंत्री चव्हाण यांनी दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण