शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

‘संभाजी’ चौकाला ‘बॅनर’चा विळखा

By admin | Updated: July 10, 2016 23:50 IST

नागरिकांना त्रास : नगरपंचायतीचे धोरण कागदावरच; अपघाताची शक्यता

वैभववाडी : बॅनर, होर्डिंग्जमुळे शहराचे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीने धोरण ठरविले खरे! परंतु, संभाजी चौकाकडे पाहिल्यावर नगरपंचायतीचे ‘बॅनर धोरण’ कागदावरच राहिल्याचा प्रत्यय सध्या नागरिकांना येत आहे. सुशोभित केलेल्या चौकाला बॅनरचा विळखा पडला असल्याने ‘संभाजी’ चौकाऐवजी ‘बॅनर’ चौक म्हणून त्याकडे पाहिले जाऊ लागले असून, या बॅनर्समुळे चौकात अपघाताची शक्यता वाढली आहे. नगरपंचायतीचा कारभार हाती घेताना नव्या कारभाऱ्यांनी कालमर्यादा ठरवून आकारमानानुसार कर भरुन घेऊन बॅनर लावण्याची परवानगी द्यावी. तसेच वाहतुकीला अडथळा होईल अशा जागी बॅनरला परवानगी देऊ नये. बॅनर लावणाऱ्यांनी निर्धारित वेळेत ते काढून नेले नाहीत तर संबंधितांकडून दंड वसूल करण्यात येईल, अशा स्वरूपाचे धोरण निश्चित करण्यात आले होते. परंतु, सुरुवातीपासूनच या धोरणाची अंमलबजावणी नीट होताना दिसत नाही. चौकातील पूर्वीच्या कठड्याच्या जागी नवीन कठडा उभारुन उंची वाढविण्यात आली. तसेच काही प्रमाणात त्याचे सुशोभिकरणही झाले. मात्र, त्यानंतर चौकाचा कठडा बॅनरसाठी अतिशय मोक्याचे ठिकाण बनला आहे. मध्यंतरी संभाजी चौकात महाराणा प्रतापसिंहांचा पुतळा उभारण्यावरुन उठलेल्या वादळानंतर या चौकात बॅनर लावूच नयेत, अशी भूमिका घेतली गेली होती. मात्र, तीही तकलादू ठरली. सध्या संपूर्ण संभाजी चौकाला चहुबाजूंनी बॅनरचा विळखा पडलेला दिसून येतो. या बॅनरमधून नगरपंचायतीला कर किती मिळाला. हा मुद्दा निराळाच आहे. विजयदुर्ग - कोल्हापूर व फोंडा -उंबर्डे या मार्गांचा संभाजी चौक दुभाजक आहे. हे दोन्ही रस्ते सतत वर्दळीचे आहेत. चौकातील बॅनरमुळे पलिकडच्या रस्त्यावरील वाहनांचा मुळीच अंदाज येत नाही. दोन रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या चौकात बॅनरला परवानगी देताना नगरपंचायतीने नागरिकांच्या आणि वाहनांच्याही सुरक्षिततेचा विचार करायला हवा. परंतु, संभाजी चौकातील सद्यस्थिती पाहता नगरपंचायतीचे बॅनर विषयक धोरण कागदावरच राहिल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच रिलायन्सच्या केबलसाठी खोदलेल्या चराचा अडथळा आहेच. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना चौकातील बॅनरचा नाहक त्रास होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी) हा नगरपंचायतीचा निष्काळजीपणा बॅनरला परवानगी देताना कालमर्यादेची अट पाळणे ही जशी बॅनर लावणाऱ्यांची जबाबदारी आहे. तशीच ती मुदतीनंतर काढून टाकण्याची जबाबदारी नगरपंचायतीचीही आहे. संभाजी चौकात सध्या शाळा, महाविद्यालयांचे प्रवेश, वाढदिवसांच्या शुभेच्छा, गुणवंतांचे अभिनंदन, मोर्चे, जयंत्या आदींचे बॅनर लागलेले आहेत. त्यातील बहुतांश बॅनर कालबाह्य झालेले आहेत. तरीही या बॅनर्सचा संभाजी चौकाला विळखा कायम आहे. मात्र, यातून नगरपंचायत प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. त्यामुळे नगरपंचायतीने चौकात लागणाऱ्या बॅनरवर निर्बंध घातले नाहीत; तर कालांतराने संभाजी चौकाची ‘बॅनर चौक’ अशी नवी ओळख निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.