शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

समाजसेवेचा वसा नाईक कुटुंबियांनी जोपासला : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 17:14 IST

कणकवली : श्रीधर नाईक यांनी राजकारणातून नव्हे तर समाजकारणातून आपला वेगळा ठसा समाजमनावर उमठवला होता. अल्पवयात त्यांनी वैचारिक श्रीमंती ...

ठळक मुद्देसमाजसेवेचा वसा नाईक कुटुंबियांनी जोपासला : विनायक राऊत श्रीधर नाईक स्मृतिदिन कार्यक्रमात प्रतिपादन

कणकवली : श्रीधर नाईक यांनी राजकारणातून नव्हे तर समाजकारणातून आपला वेगळा ठसा समाजमनावर उमठवला होता. अल्पवयात त्यांनी वैचारिक श्रीमंती कमावली होती. मात्र, दुर्दैवाने त्यांची राजकीय हत्या झाली. परंतु त्यांचा समाजसेवेचा वसा नाईक कुटुंबाने आजही जोपासला आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी येथे केले.कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल.सभागृहात शनिवारी श्रीधर नाईक स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिर आणि शेतकरी मेळावाही घेण्यात आला. त्याचे उदघाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार वैभव नाईक,भाजपा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, श्रीधर नाईक यांचे सुपुत्र नगरसेवक सुशांत नाईक, संकेत नाईक, शिवसेना महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, नीलम पालव, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, प्रदीप सावंत, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, डॉ.चंद्रकांत राणे, डॉ. तुळशीराम रावराणे, डॉ . गीते, दादा कुडतरकर, प्रतीक्षा साटम, तेजल लिंग्रज, शैलेश भोगले, शेखर राणे, सचिन सावंत, राजू शेट्ये, विलास साळसकर, सुजित जाधव, गीतेश कडू, सुदाम तेली, छोटू पारकर, प्रथमेश सावंत , सतीश नाईक , भास्कर राणे, बाळू मेस्त्री, यांच्यासह श्रीधर नाईक प्रेमी उपस्थित होते.यावेळी विनायक राऊत म्हणाले, विजय नाईक यांनीही आपला व्यवसाय सांभाळत समाज सेवा केली. विजय नाईक व श्रीधर नाईक या दोघा बंधूनी समाजसेवेच्या माध्यमातून एक आदर्श समाजासमोर उभा केला . त्याचे अनुकरण नाईक कुटुंबियांच्या पुढील पिढीने केले आणि जनमानसात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.आमदार वैभव नाईक म्हणाले, गेली २८ वर्षे जनतेचा आधार नाईक कुटुंबियांना लाभला आहे. हा आधारच आम्हाला समाजसेवेची उर्मी देतो आणि त्यातून स्फुर्ती मिळते. श्रीधर नाईक वयाच्या १८ व्या वर्षापासून स्वतः रक्तदान करत होते. विविध माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असायचे. तसे कार्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

येथे आयोजित करण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक भविष्यात मोठे लेखक आणि चित्रकार बनतील. श्रीधर नाईक यांनी आम्हाला वसा दिलेल्या राजकीय आणि सामाजिक कार्याच्या दिशेनेच नाईक कुटुंबीय यापुढेही वाटचाल करतील.संदेश पारकर म्हणाले, लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांनी श्रीधर नाईक यांची हत्या केली. ही हत्या स्वतःचे अस्तित्व नाहीसे होईल या भीतीने त्यांनी केली होती. ही सिंधुदुर्गातील पहिली राजकीय हत्या होती. श्रीधर नाईक समाजसेवेतील अग्रणी नाव होते. त्यांच्या हत्येने नाईक कुटुंबियांइतकेच समाजाचेही मोठे नुकसान झाले आहे. खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी होत श्रीधर नाईक यांची हत्या करणारी जुलमी राजकीय शक्ती संपवली आहे. श्रीधर नाईक यांची स्मृती समाजाला विधायक दिशा देणारी आहे.अतुल रावराणे म्हणाले, आपल्या समाजसेवेतून श्रीधर नाईक यांच्या स्मृती नाईक कुटुंबीयांनी जागृत ठेवल्या आहेत. श्रीधर नाईक यांचे योगदान कणकवलीतच नव्हे तर जिल्ह्यातील जनतेच्या कायमच स्मरणात राहील.असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी उपस्थित इतर मान्यवरानीही मनोगत व्यक्त केले.यावेळी श्रीधर नाईक फाउंडेशन व कृषी विज्ञान केंद्र , सिंधदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. तर तालुक्यातील ५० गुणवंत विद्यार्थ्यांना चांदीचे मेडल देऊन यावेळी गौरविण्यात आले. तसेच दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या दिव्या राणेचा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते चांदीचे मेडल, शाल, श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला . 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग