शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

सावंतवाडीतील आठवडा बाजार स्थलांतरावरुन वाद, रुपेश राऊळांचा मंत्री केसरकरांवर आरोप; म्हणूनच..

By अनंत खं.जाधव | Updated: March 29, 2023 16:49 IST

केसरकर घोषणा मंत्री असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध 

सावंतवाडी : मोती तलावाच्या काठावर असलेलाच आठवडा बाजार योग्य आहे. त्यामुळे बाजाराचे अन्यत्र स्थलांतर करण्यास ठाकरे गटाचा विरोध आहे. हा आठवडा बाजार हलवू नये, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली. दरम्यान शहरातील अन्य विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावरून मतदारांची नजर हटविण्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांनी बाजार स्थलांतरांवरून वाद निर्माण केला असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. ते आज, बुधवारी सावंतवाडीत येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.आठवडा बाजार हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे निर्देश मंत्री केसरकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राऊळ बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुका संघटक मायकल डिसोजा, योगेश नाईक, गुणाजी गावडे, महिला तालुका संघटक रश्मी माळवदे, श्रुतिका दळवी, साधना कळंगुटकर, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, शब्बीर मणियार, प्रशांत बुगडे, विनोद ठाकूर, फिलिप्स रोड्रिक्स उपस्थित होते.राऊळ म्हणाले, शहरातील मल्टीस्पेशालिटी, बस स्थानक असे प्रश्न प्रलंबित असताना केसरकारांनी आठवडा बाजार हलवून नवीन वाद निर्माण केला आहे. बाजार हलवताना कोणत्याही नागरिकांना विचारात घेतले नाही. अनेकांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी बाजार योग्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बाजार कुठेही हलविण्यात येऊ नये, अशी आमची भूमिका आहे.ज्या ठिकाणी आपण बाजार नेतो, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले त्या ठिकाणी साधी शौचालयाची व्यवस्था नाही. चार ठिकाणी बाजार हलवल्यानंतर सर्वसामान्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे हा बाजार स्थलांतरित करू नये. याबाबत आम्ही लवकरच जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमची भूमिका कळविणार आहोत. त्यामुळे घेतलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणीही राऊळ यांनी यावेळी केली.केसरकर घोषणा मंत्री असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध मंत्री दीपक केसरकर हे घोषणा मंत्री असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले असून ते फक्त घोषणाच करतात आता तर मल्टीस्पेशालिटीला ८० टक्के परवानगी मिळणे सोपे झाले असे सांगतात. मग तीन वर्षापूर्वी भूमिपूजन कशासाठी केले ही जनतेची फसवणूक नाही का? असा सवालही राऊळ यांनी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Sawantwadiसावंतवाडी