शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीतील आठवडा बाजार स्थलांतरावरुन वाद, रुपेश राऊळांचा मंत्री केसरकरांवर आरोप; म्हणूनच..

By अनंत खं.जाधव | Updated: March 29, 2023 16:49 IST

केसरकर घोषणा मंत्री असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध 

सावंतवाडी : मोती तलावाच्या काठावर असलेलाच आठवडा बाजार योग्य आहे. त्यामुळे बाजाराचे अन्यत्र स्थलांतर करण्यास ठाकरे गटाचा विरोध आहे. हा आठवडा बाजार हलवू नये, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली. दरम्यान शहरातील अन्य विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावरून मतदारांची नजर हटविण्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांनी बाजार स्थलांतरांवरून वाद निर्माण केला असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. ते आज, बुधवारी सावंतवाडीत येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.आठवडा बाजार हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे निर्देश मंत्री केसरकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राऊळ बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुका संघटक मायकल डिसोजा, योगेश नाईक, गुणाजी गावडे, महिला तालुका संघटक रश्मी माळवदे, श्रुतिका दळवी, साधना कळंगुटकर, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, शब्बीर मणियार, प्रशांत बुगडे, विनोद ठाकूर, फिलिप्स रोड्रिक्स उपस्थित होते.राऊळ म्हणाले, शहरातील मल्टीस्पेशालिटी, बस स्थानक असे प्रश्न प्रलंबित असताना केसरकारांनी आठवडा बाजार हलवून नवीन वाद निर्माण केला आहे. बाजार हलवताना कोणत्याही नागरिकांना विचारात घेतले नाही. अनेकांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी बाजार योग्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बाजार कुठेही हलविण्यात येऊ नये, अशी आमची भूमिका आहे.ज्या ठिकाणी आपण बाजार नेतो, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले त्या ठिकाणी साधी शौचालयाची व्यवस्था नाही. चार ठिकाणी बाजार हलवल्यानंतर सर्वसामान्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे हा बाजार स्थलांतरित करू नये. याबाबत आम्ही लवकरच जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमची भूमिका कळविणार आहोत. त्यामुळे घेतलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणीही राऊळ यांनी यावेळी केली.केसरकर घोषणा मंत्री असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध मंत्री दीपक केसरकर हे घोषणा मंत्री असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले असून ते फक्त घोषणाच करतात आता तर मल्टीस्पेशालिटीला ८० टक्के परवानगी मिळणे सोपे झाले असे सांगतात. मग तीन वर्षापूर्वी भूमिपूजन कशासाठी केले ही जनतेची फसवणूक नाही का? असा सवालही राऊळ यांनी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Sawantwadiसावंतवाडी