शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सिंधुदुर्गच्या समुद्रात बुडविणार नौदलाची निवृत्त युद्धनौका; जागतिक पर्यटन संकल्पनेवर आधारित प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 11:30 IST

प्रमाणित स्कुबा डायव्हर्स दाखविणार युद्ध नौकेचे अंतरंग..

संदीप बोडवेमालवण: सिंधुदुर्गमधीलपर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा या साठी शासनाने कंबर कसली आहे. यासाठी सिंधुदुर्गच्या समुद्रात नौदलाची निवृत्त युद्धनौका बुडविण्याची महत्त्वाकांक्षी योजना तयार करण्यात आली आहे. पाण्याखालील युद्धनौका प्रमाणित स्कुबा डायव्हर्सच्या माध्यमातून पर्यटकांना पाहता येणार आहे. जागतिक पर्यटन संकल्पनेच्या धर्तीवर हा भारतातील पहिलाच प्रयत्न असून समस्त सिंधुदुर्गवासियांसाठी ही अभिमानाची बाब ठरणार आहे.सिंधुदुर्गात सुरुवातीला स्कुबा डायव्हिंग च्या माध्यमातून पर्यटनाला सुरुवात झाली. मात्र हे स्कुबा डायविंग आंतरराष्ट्रीय दर्जाचे नव्हते. भविष्याकडे पाहता सिंधुदुर्गात पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि रोजगार वाढीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा एखादा पर्यटन प्रकल्प साकारणे गरजेचे होते. याच अनुषंगाने युरोप आणि अमेरिकेत ज्याप्रमाणे निवृत्त युद्धनौका स्कुबा डायव्हिंग द्वारे पर्यटनासाठी समुद्राच्या पाण्याखाली बुडविल्या जातात. त्याच प्रमाणे सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाण्याखालील एक नाविन्यपूर्ण आकर्षण निर्माण व्हावे आणि ते दर्जेदार स्कुबा डायव्हर्सच्या मदतीने पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध व्हावे असे शासनाच्या विचाराधीन होते. यावर मागील काही महिन्यात अनेक पातळ्यांवर काम सुरू होते. एमटीडीसीच्या प्रस्तावाला नौदलाकडून मान्यता..

  • महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने भारतीय नौदलाकडे पर्यटनासाठी निवृत्त युद्धनौकेची मागणी केली होती. 
  • निवृत्त झालेल्या युद्धनौका भंगारात पाठविण्यातची पद्धती आहे. मात्र यामुळे त्या युद्धनौकेचा गौरवशाली इतिहास नष्ट होत असतो. 
  • समुद्रात स्कुबा डायव्हिंग साठी कृत्रिम प्रवाळ क्षेत्र निर्माण व्हावे म्हणून परदेशात निवृत्त युद्धनौका समुद्रात बुडवल्या जातात. 
  • पाण्यात बुडविलेल्या या युद्ध नौकांवर समुद्रातील कवचधारी जीवांचे थर साठतात. 
  • अशा युद्ध नौका शेकडो वर्ष पाण्यात खाली टिकून राहतात आणि त्यांचा इतिहास जपला जातो. तारकर्ली येथे संपन्न झालेल्या नौदल दिनाच्या वेळी नौदल अधिकाऱ्यांना ही संकल्पना समजावून सांगितल्या आली होती. 
  • ही संकल्पना ऐकल्यानंतर नौदल अधिकारी प्रभावीत झाले होते. 

सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न साकार होणार याचा आनंद: डॉ कुलकर्णी..

  • २००५ साली आयएनएस विराट ही निवृत्त युद्धनौका पर्यंत पर्यटनासाठी सिंधुदुर्गच्या समुद्रात बुडण्याची योजना दुर्दैवाने पूर्ण होऊ शकली नाही. मात्र शासनाच्या या नव्या प्रकल्पामुळे जिल्ह्याचे पर्यटन आणि सागरी जैवविविधता वाढीस लागणार आहे. जिल्ह्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. 
  • प्रतिवर्षी शंभर ते दीडशे कोटींच्या अर्थव्यवस्थेत वाढ होणार आहे. असा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यास पुढाकार घेतल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण जेष्ठ नेते, खासदार नारायण राणे, मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचलनालयाचे श्रद्धा जोशी शर्मा, डॉ. बी. एन. पाटील तसेच इसदाच्या संपूर्ण टीमचे सहकारी यांचे सहकार्य लाभले. या उपलब्धि बद्दल सिंधुदुर्गवासीयांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्गाच्या सागरी पर्यटनाचे जनक असलेल्या डॉ. सारंग कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना दिली. 
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन