शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

केंद्रप्रमुख पदे कायम

By admin | Updated: July 23, 2014 21:56 IST

सुरेश पेडणेकर : विधानसभा अध्यक्षांनी दिले आश्वासन

कणकवली : संपूर्ण महाराष्ट्रात १० जून २०१४ पूर्वी तात्पुरती तसेच अभावितपणे भरण्यात आलेली केंद्रप्रमुख पदे कायम करण्यात येतील. असे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती संघटनेचे सल्लागार सुरेश पेडणेकर यांनी दिली.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १४ नोव्हेंबर १९९४ च्या शासन निर्णयानुसार राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी ४८६० केंद्रप्रमुखांची पदे निर्माण केली. ही पदे १०० टक्के पदोन्नतीने भरण्याची शासन निर्णयात तरतूद होती. गेली २० वर्षे ही पदे कार्यरत असून ती १०० टक्के पदोन्नतीने भरण्यात येत होती. परंतु २ फेब्रुवारी २०१० च्या शासन निर्णयानुसार ही पदे ४० टक्के सरळसेवेने, ३० टक्के विभागीय स्पर्धा परीक्षेने तर उर्वरित ३० टक्के पदोन्नतीने अशी करण्यात आली. मात्र या शासन निर्णयात याची कार्यप्रणाली दिलेली नसल्यामुळे या शासन आदेशाची कार्यवाही होऊ शकली नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात केंद्रप्रमुखांची अनेक पदे रिक्त राहिली. त्याचा ताण प्रशासनावर व शैक्षणिक कामकाजावर होऊ लागल्याने २५ जून २०१० रोजी पुन्हा एकदा आदेश काढण्यात आला. यामध्ये १ फेब्रुवारी २०१० पूर्वी रिक्त असणारी सर्व केंद्रप्रमुखांची पदे पूर्वीच्या पद्धतीने भरण्यासाठी परवानगी दिली. ही पदे भरूनसुद्धा विशिष्ट तारखेच्या मर्यादेमुळे अनेक पदे रिक्त राहिली आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणेच्या संचालकांनी २९ नोव्हेंबर २०१२ च्या पत्रानुसार सर्व रिक्त पदे तात्पुरत्या तसेच अभावितपणे भरण्याची अनुमती दिली. त्याप्रमाणे काही जिल्हा परिषदांनी त्या पत्रापूर्वी तर काही जिल्हा परिषदांनी त्या पत्रानंतर आपल्याकडील १०० टक्के रिक्त पदे पदोन्नतीने भरली. (वार्ताहर) -दरम्यान, महाराष्ट्र शासनाने केंद्रप्रमुखांची पदे ४०:३०:३० अशी केल्याची अधिसूचना १० जून २०१४ रोजी प्रसिद्ध केली. त्याचा परिणाम तात्पुरत्या स्वरूपात भरलेल्या केंद्रप्रमुखांवर होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा या संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी १६ जुलै रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची त्यांच्या दालनात भेट घेतली व लेखी निवेदन सादर केले. यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी आश्वासन दिले. तसेच शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून केंद्रप्रमुख पदे कायम करण्याची विनंती केली. संघटनेचे राज्याध्यक्ष दत्तात्रय सावंत तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते, असेही या पत्रकात म्हटले आहे.