शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी दिलासादायक

By admin | Updated: May 8, 2015 00:07 IST

जिल्हा बँकेवर आघाडीचे वर्चस्व : मतदारांकडून पुन्हा एकदा नारायण राणेंच्या नेतृत्वावर विश्वास

रजनीकांत कदम-कुडाळ -लोकसभा व विधानसभेमध्ये पराभव पत्करल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने एकत्र आघाडी करत जिल्ह्याची आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १९ पैकी १५ जागांवर घवघवीत यश संपादन केले. येथील मतदारांनी पुन्हा एकदा नारायण राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्याचे चित्र या निकालावरून दिसते. तसेच जिल्हा बँकेतील विजय हा काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलासा देणारा आणि भविष्यातील निवडणुकीसाठी उत्तेजन देणारा ठरणार आहे. सिंधुुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १९ पदांकरिता ५ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संकल्प सिध्दी पॅनेलचे १८, भाजप शिवसेना व इतर सहकार क्षेत्रातील व्यक्ती मिळून तयार केलेल्या सहकार वैभव पॅनेलचे १८ व अपक्ष ५ असे मिळून ४१ उमदेवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीचा निकाल ७ मे रोजी ओरोस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जाहीर करण्यात आला. या निकालानंतर संकल्पसिध्दी गटाचे १५ व सहकार वैभव पॅनेलचे ४ असे मिळून १९ उमेदवार निवडून आले. अपक्षांना मात्र इथे खातेही खोलता आले नाही. यापूर्वीच्या जिल्हा बँक निवडणुकींचा विचार केला असता, या निवडणुकींमध्ये फारसे राजकीय वातावरण नसायचे. यावर्षी मात्र या निवडणुकीला राजकीय रंग चढू लागला. ही निवडणूक काँगे्रस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या राजकीच पक्षांनी प्रतिष्ठेची बनविली. त्यामुळे निवडणुकीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. अनेक नेत्यांनीही घातला लक्ष सहकार क्षेत्रातील निवडणुकीमधील जिल्हा बँकेची सत्ता आपल्याकडे रहावी, याकरिता प्रत्येक पक्षाचे जिल्ह्यातील नेते मंडळींनी विशेष लक्ष घातले होते. यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह खासदार विनायक राऊत, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्ह्यातील आमदार तसेच अन्य नेत्यांनीही याकडे विशेष लक्ष घातले होते. या निवडणुकीत काँगे्रस व राष्ट्रवादीने एकत्र येत निर्माण केलेल्या संकल्पसिध्दी पॅनेलच्या उमेदवारांपैकी काँगे्रस पक्षाचे ९, तर राष्ट्रवादी पक्षाचे ६ उमेदवार निवडून आले. तसेच भाजप, शिवसेना व समविचारी उमेदवारांनी बनविलेल्या सहकार वैभव पॅनेलमधील भाजपाचा १, शिवसेना २ व अपक्ष असलेले विलास गावडे आदी चार उमेदवार निवडून आले. कुडाळ तालुक्यासाठी असलेल्या मतदार संघाकरिता काँग्रेसकडून प्रकाश मोर्ये यांना २०, तर काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या सुभाष मडव यांनी बऱ्यापैकी दहा मते घेतली. तर पुष्पसेन सावंत यांनीही ९ मते घेतली. त्यामुळे मडव यांना पडलेली मते ही काँग्रेसचीच पडली का, असा प्रश्न काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना निकाल हाती आल्यानंतर पडला होता. सावंतवाडीमध्ये आघाडीकडून दत्ताराम वारंग हे उभे होते. त्यांच्या विरोधात बंडखोरी करीत काँग्रेसचेच आल्मेडा लॉरेन्स उतरले. यामुळे काँगे्रसच्या मतांची विभागणी झाली. याचा फायदा शिवसेनेचे उमेदवार प्रकाश परब यांना झाला. ते १९ मतांनी विजयी झाले. वेंगुर्ल्यातही काँगे्रसचे उमेदवार मनीष दळवी यांच्या विरोधात बंडखोरी करीत निवडणुकीत उरतरलेले दत्ताराम नाईक यांच्यामध्ये काँगे्रसची झालेली मतविभागणीचा फायदा शिवसेनेच्या राजन गावडेंना झाला. ते १३ मते पडून निवडून आले. नव्याने बनलेले संचालकया निवडणुकीमध्ये काही नव्या चेहऱ्यांना संचालकपदी बसण्याचा बहुमान मिळाला आहे. यामध्ये प्रमोद धुरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, विलास गावडे, राजन गावडे, प्रकाश परब व इतर काहीजण आहेत. अनेकांसाठी महत्त्वाची निवडणूकही निवडणूक राजन तेली, पुष्पसेन सावंत, सतीश सावंत, व्हिक्टर डान्टस, अतुल काळसेकर अशा विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसाठी व नेत्यांसाठी महत्त्वाची होती. दरम्यान, निवडणुकीच्या निकालामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. बंडखोरांची डाळ शिजली नाहीकाँग्रेसमध्ये पाचजणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नव्हता. त्यामुळे काँग्रेसवर बंडखोरीचा परिणाम होऊन काँग्रेसच्या उमेदवारांना भोगावा लागणार, असे चित्र दिसत होते. प्रत्यक्षात मात्र निवडणुकीचा निकाल हाती येताच निकालानुसार कोणत्याही बंडखोराची डाळ शिजली नाही. फक्त काही प्रमाणात काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान कमी झाले. अनेक संचालक पराभूतया निवडणुकीत विद्यमान संचालक असलेल्या राजन तेली, डी. बी. वारंग, कृष्णनाथ तांडेल, गजानन गावडे व सुगंधा साटम यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर सतीश सावंत, व्हिक्टर डान्टस, आत्माराम ओटवणेकर, विद्याप्रसाद बांदेकर, दिगंबर पाटील, प्रकाश मोर्ये, विकास सावंत, आर. टी. मर्गज, नीता राणे या विद्यमान संचालकांना मतदारांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे.