शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

केंद्रीय निवड परीक्षेमार्फत भरती

By admin | Updated: January 6, 2016 00:57 IST

शासनाचा आदेश : खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक नेमणूक

आनंद त्रिपाठी - वाटूळ --शिक्षण संचालकांनी २९/१२/२०१५ रोजी काढलेल्या पत्रान्वये शासनाने पुढील आदेश येईपर्यंत खासगी व्यवस्थापन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती करण्यात येऊ नये, अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या असल्याने राज्यातील शिक्षक भरती पुढील निर्णयापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आता खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक भरती आता भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षेमार्फतच होणार आहे.यापूर्वी होणाऱ्या भरतीच्या प्रक्रियेला या नव्या आदेशामुळे खिळ बसली असून शिक्षक भरतीवर एकप्रकारे बंधनच आल्याचे म्हटले जात आहे. २०१४-१५च्या झालेल्या आॅनलाईन संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचा व सध्या रिक्त पदांचा आढावा घेऊन अतिरिक्त शिक्षक भरतीबाबत सरकार विचाराधीन आहे. खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त जागांची शिक्षक भरती देखील भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षेतूनच होणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत. शासनाच्या या नव्या आदेशामुळे संस्थाचालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.न्यायालयात प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांचा निकाल लागल्याने आरटीएफ कायद्यानुसार संचमान्यता व अतिरिक्त शिक्षक समायोजन करण्याचे सगळे मार्ग मोकळे झाल्याने आगामी शैक्षणिक वर्षामध्ये शाळांमधील रिक्त पदांवर शिक्षक नियुक्ती होईल अशी आशा यामुळे निर्माण झाली आहे. शासनस्तरावरुन शिक्षक भरती झाल्यास राज्यातील अनेक खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये संस्थास्तरावरुन होणाऱ्या भरतीला चपराक बसणार असल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.निर्णय बदला : शिक्षक भरतीत पैशांचे व्यवहार होतातच असे नाहीशासनाकडून घेतला जाणारा सीईटीचा निर्णय हा योग्य नाही. दोन वर्ष बीएडचे प्रशिक्षण घेतल्यानंतर अवघ्या तासाभराच्या सीईटी परीक्षेमध्ये त्याचे मूल्यमापन होणार आहे का? बीएड, डीएड प्रवेशावेळीच अशी सीईटी घेऊन प्रवेश दिला जावा. १९९४पासून इमारत भाडे नाही, २००५पासून १२ टक्के वेतनेतर अनुदान नाही अशा असंख्य अडचणीतून संस्था शाळा चालवत असून, सगळ्याच शाळांमध्ये पैशांचा व्यवहार होऊन शिक्षक नेमले जातात, असे नाही.- वासुदेव तुळसणकरअध्यक्ष, ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, ओणी - राजापूरआळा बसणार?खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षक भरती करताना पैसे घेऊन भरती केल्याचा आरोप केला जातो. या नव्या आदेशामुळे अशा प्रकारांना आळा बसेल, असा एक मतप्रवाह शिक्षणक्षेत्रात आहे.