शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून फेरनिश्चिती, कणकवली बंदची जिल्हाधिका-यांकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 21:01 IST

कणकवली येथील महामार्ग बाधितांवर मुल्यांकनासंबंधी अन्याय होणार नाही. प्रसंगी कणकवलीतील प्रत्येक मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन करून फेर दर निश्चिती करण्यात येईल असे शुक्रवारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सिंधुदुर्ग : कणकवली येथील महामार्ग बाधितांवर मुल्यांकनासंबंधी अन्याय होणार नाही. प्रसंगी कणकवलीतील प्रत्येक मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन करून फेर दर निश्चिती करण्यात येईल असे शुक्रवारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बाधितांनी १२ डिसेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत आपले तक्रार अर्ज आपल्याकडे दाखल करावेत असे आवाहन त्यांनी केले. कणकवलीतील बंदच्या पार्श्वभुमीवर शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवलीच्या प्रांताधिकारी निता शिंदे, प्राधिकरणाचे कायदा अधिकारी अ‍ॅड. सामंत, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते. कणकवली शहरातील महामार्ग बाधितांना योग्य मोबदला दिला गेला नाही. यासाठी कणकवली शहरात कडकडीत बंद व मुक मोर्चा काढण्यात आला होता. प्रशासनाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आल्याने त्याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली. या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कणकवली  शहरातील मालमत्तेचे योग्य मुल्यांकन झाले नाही, अशी सर्वसामान्य तक्रार आहे. मुल्यांकनासाठी नवीन भूसंपादन कायदा २0१३ कलम २६ ते ३0 नुसार मोबदला निश्चिती करायची होती. त्यानुसार कणकवली शहरातील मालमत्तांचे गेल्या तीन वर्षांतील बाजार दरातील सरासरी काढून त्याला एक गुणकाने गुणून त्यात शंभर टक्के  दिलासा रक्कम मिळवून मुल्यांकन करण्याची पद्धत आहे. त्यानुसार कणकवली तालुक्यातील २२ निवाडे जाहीर करण्यात आले. त्यापैकी २१ ठिकाणी मोबदला रक्कम वाटपही झाले. कणकवली शहराच्या बाबतीत मात्र, काही जणांनी मोबदल्याबाबत शंका व्यक्त केली. त्यानुसार कणकवली शहरातील शिष्ठमंडळ दहा ते बारा वेळा लोकप्रतिनिधींच्या मार्फत भेटीला आले होते. त्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली होती. ज्या स्टॉलधारकांना आपली मालमत्ता आहे मात्र त्यांना प्रशासना कडून नोटीस मिळाली नाही अशांनी प्रांताधिकारी यांना भेटावे. तर ज्यांनी आपले हक्क नोंद न्यायालयामार्फत सिद्ध केले व न्यायालयाचे प्रमाणपत्र सादर केले अशांनाच मोबदला मिळवू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ १६ जणांचे तक्रार अर्जकणकवली शहरात एकूण ४७७ महामार्ग बाधित असून त्यातील ६२ जणांनी मुल्यांकन स्विकारून त्यांना ४ कोटी ३७ लाख रुपयांचे निधी वितरण करण्यात आले आहे. उर्वरित ४१५ बाधितांपैकी फक्त १६ बाधितांचेच तक्रार अर्ज प्राप्त झाले असल्याचे ते म्हणाले. चौकट१२ डिसेंबरपर्यंत गा-हाणी लेखी द्याजिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात तातडीने निर्णय व्हावा म्हणून एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यामध्ये भूसंपादन अधिकारी संजय जाधव, विधी अधिकारी अ‍ॅड. सामंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. जोपर्यंत जिल्हाधिका-यांकडे या बाधितांच्या तक्रार अर्जावर सुनावणी होऊन काही निर्णय मिळत नाही तोपर्यंत त्यांना पुढे न्यायालयात दाद ही मागता येणार नाही. म्हणून जास्तीत जास्त महामार्ग बाधितांनी १२ डिसेंबर पर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत आपली गाºहाणी लेखी स्वरूपात द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.