शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

रत्नागिरी : उष्मा वाढल्याने विजेची अधिक मागणी

By admin | Updated: September 20, 2014 00:34 IST

कमी पाऊस : १३ हजार ६०७ मेगावॅट मागणीची नोंद- दरवाढीचा महानगरपालिका क्षेत्रास फटका; कोकण परिमंडलास दिलासा

रत्नागिरी : गेले दहा बारा दिवस पावसाने उघडीप घेतली आहे. कडकडीत ऊन पडत असल्याने उकाडा वाढला आहे. परिणामी राज्यात विजेची मागणी वाढली आहे. शुक्रवारी दुपारी १३ हजार ६०७ मेगावॅट इतकी विजेची मागणी नोंदविण्यात आली होती.गणेशोत्सव कालावधीत पाऊस बऱ्यापैकी कोसळत असल्यामुळे साडेदहा हजार ते अकरा हजार मेगावॅट इतकी विजेची मागणी करण्यात आली होती. कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याने वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. मात्र औष्णिक जलविद्युत, गॅस, खासगी प्रकल्पातून उत्पादित विजेतून ग्राहकांना मागणीप्रमाणे वीजपुरवठा करण्यात येत आहे. ऐन उन्हाळ्यात (एप्रिल-मे) १४ ते १५ हजार मेगावॅट इतकी विजेची सर्वोत्तम मागणी नोंदविण्यात आली होती. सध्या जलविद्युत प्रकल्पातील निर्मिती संच देखभाल दुरूस्तीसाठी बंद आहेत. एखाददुसऱ्या संचाव्दारे वीजनिर्मीती करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून ५ हजार ५४३ मेगावॅट वीज आयात करण्यात येत आहे. औष्णिक प्रकल्पाव्दारे ४ हजार ३८७ मेगावॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून ८०० मेगावॅट, उरण गॅस प्रकल्पातूल ४७६ मेगावॅट तर खासगी (जिंदाल, अदानी, आयडियल) प्रकल्पातून ३ हजार ५६० मेगावॅट विजेचा पुरवठा होत असल्याने ग्राहकांना वीजेचा पुरवठा करण्यात येत आहे.दसऱ्यापर्यत पाऊस पडतो. परंतु तरीही प्रमाण मात्र कमी होत चालले आहे. हवामानातील बदलामुळे विजेची मागणी भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. कोळसानिर्मिती प्रकल्पास जर कोळसा पुरवठा वेळेवर न झाल्यास भारनियमनाचा धोका आहे. गणेशोत्सव संपून २० ते २२ दिवस झाले असले तरी २० दिवसात दोन ते अडीच हजार मेगावॅट इतकी मागणी वाढली आहे. हवामान कोरडे राहिले तर यापुढे वीजेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने वीज टंचाई भासणार आहे.(प्रतिनिधी)पावसाने दडी मारली वीजेची मागणी वाढलीयंदा दसऱ्याआधी पाऊस कमी देखभाल दुरूस्तीसाठी बंद आहेतजलविद्युत केंद्रातील निर्मिती संचअपवाद एखाद दुसऱ्या संचाचा वीजपुरवठा अधिक कसा होईल यासाठी आता प्रयत्नसर्व प्रकल्पातील उत्पादीत वीजेतून होतोय वीज पुरवठा दरवाढीचा महानगरपालिका क्षेत्रास फटका; कोकण परिमंडलास दिलासारत्नागिरी : विजेची मागणी वाढल्यानंतर केंद्र शासनाकडून विज आयात करावी लागते. महावितरणच्या धोरणानुसार ही रक्कम कर स्वरूपात असल्याने नियमानुसार ती स्थानिक ग्राहकांकडून वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त दरवाढ म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील ग्राहकांच्या बिलातून रक्कम वसूल केली जाणार आहे. कोकण परिमंडलात महापालिका नसल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. महानगरपालिका हद्दीत एलबीटी कर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने स्थानिक कर महावितरणला आकारला होता. हा कर तेथील ग्राहकांकडून नियमित वसूल करून स्थानिक संस्थेला देण्यात येणार आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील ग्राहकांकडून करवसूली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद महानगरपालिकेस विजेवर २१.६८ कोटी रूपये भरण्यास महावितरणला आदेश देण्यात आले आहे. संबंधित रक्कम किती महिन्यात वसूल करायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र एका महिन्यात ही रक्कम वसूल केल्यास प्रतियुनिट २.२५ रू. असा भार ग्राहकांवर येईल. जर काही महिन्यात रक्कम वसूल करायचे ठरल्यास व महानगरपालिकेने व्याज आकारल्यास त्यानुसार यात बदल होणार आहेत. कोकण परिमंडलात रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात महापालिका नसल्यामुळे येथील ग्राहकांना संबंधित करातून दिलासा मिळाला आहे. परंतु औरंगाबादप्रमाणे नागपूर तसेच अन्य महापालिका हद्दीतील ग्राहकांना कराचा भूर्दंड बसणार आहे. कोकण परिमंडलास महापालिका नसल्याचा दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)