शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

रत्नागिरी : आंबा भरपाईचे २७ कोटी शिल्लकच

By admin | Updated: September 20, 2014 00:21 IST

अपूर्ण कागदपत्रे: कृषी विभाग बघतोय शेतकऱ्यांची वाट

रत्नागिरी : फुलकिडे (थ्रीप्स) यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून हेक्टरी १५ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार २१ कोटी ८ लाखाचा निधी जिल्ह्यातील ४१ हजार ३७७ शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. परंतु अपूर्ण कागदपत्र तसेच संपर्काच्या अभावामुळे २७ कोटी १३ लाखांचा निधी कृषी विभागाकडे अद्याप पडून आहे.थ्रीप्सचा प्रादुर्भाव (२०१२-१३) साली झाला होता. परिणामी आंबा पीक धोक्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मदत म्हणून हेक्टरी पंधरा हजार रुपये जाहीर करण्यात आले. मात्र, त्यासाठी दोन हेक्टरची मर्यादा घालण्यात आली होती. गेल्या दीड वर्षांपासून शेतकऱ्यांना आंबा पीक नुकसानभरपाईचे वितरण सुरु आहे. जिल्ह्यातील ४१ हजार ३७७ शेतकऱ्यांना २१ कोटी ८ लाखांचा निधी वितरित करण्यात आला. परंतु २७ कोटी १३ लाखांचा निधी अद्याप शिल्लक राहिला आहे.जिल्ह्यातील बहुतांश मंडळी नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई व अन्य शहरामध्ये राहतात. परिणामी गावाकडे येणे मर्यादित असते. तसेच काही शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सात-बारावर अनेक नावे असल्याने संबंधितांची संमतीपत्र त्यासाठी आवश्यक आहेत. एकूणच विविध कारणास्तव शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे संपर्क न केल्याने नुकसानभरपाईचा निधी अद्याप शिल्लक राहिला आहे. वेळोवेळी कृषी विभागाकडून आवाहन करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी तसाच पडून आहे. (प्रतिनिधी)