शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
5
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
6
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
7
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
8
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
9
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
10
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
11
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
12
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
13
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
14
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
15
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
16
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
18
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
19
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
20
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन

रत्नागिरी : आंबा भरपाईचे २७ कोटी शिल्लकच

By admin | Updated: September 20, 2014 00:21 IST

अपूर्ण कागदपत्रे: कृषी विभाग बघतोय शेतकऱ्यांची वाट

रत्नागिरी : फुलकिडे (थ्रीप्स) यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून हेक्टरी १५ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार २१ कोटी ८ लाखाचा निधी जिल्ह्यातील ४१ हजार ३७७ शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. परंतु अपूर्ण कागदपत्र तसेच संपर्काच्या अभावामुळे २७ कोटी १३ लाखांचा निधी कृषी विभागाकडे अद्याप पडून आहे.थ्रीप्सचा प्रादुर्भाव (२०१२-१३) साली झाला होता. परिणामी आंबा पीक धोक्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मदत म्हणून हेक्टरी पंधरा हजार रुपये जाहीर करण्यात आले. मात्र, त्यासाठी दोन हेक्टरची मर्यादा घालण्यात आली होती. गेल्या दीड वर्षांपासून शेतकऱ्यांना आंबा पीक नुकसानभरपाईचे वितरण सुरु आहे. जिल्ह्यातील ४१ हजार ३७७ शेतकऱ्यांना २१ कोटी ८ लाखांचा निधी वितरित करण्यात आला. परंतु २७ कोटी १३ लाखांचा निधी अद्याप शिल्लक राहिला आहे.जिल्ह्यातील बहुतांश मंडळी नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई व अन्य शहरामध्ये राहतात. परिणामी गावाकडे येणे मर्यादित असते. तसेच काही शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सात-बारावर अनेक नावे असल्याने संबंधितांची संमतीपत्र त्यासाठी आवश्यक आहेत. एकूणच विविध कारणास्तव शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे संपर्क न केल्याने नुकसानभरपाईचा निधी अद्याप शिल्लक राहिला आहे. वेळोवेळी कृषी विभागाकडून आवाहन करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी तसाच पडून आहे. (प्रतिनिधी)