शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कणकवलीत शास्त्रीय संगीत महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 13:28 IST

कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित २२ व्या पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसेंदिवस अभिजात संगीत रसिकांच्या दुष्टीने समृद्ध होत असलेल्या या महोत्सवाची उंची आणखीनच वाढत आहे . रविवारी पं. रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनात रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले. तर कणकवलीतील तरुण, उमदे शास्त्रीय गायक मनोज मेस्त्री यांच्या सादरीकरणालाही रसिकांनी दाद दिली.

ठळक मुद्देपं . रघुनंदन पणशीकरांसह मनोज मेस्त्री यांचेही गायन अर्जुन पटवर्धन यांचे सतारवादन ठरले लक्षवेधी

सुधीर राणे

कणकवली : येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित २२ व्या पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसेंदिवस अभिजात संगीत रसिकांच्या दुष्टीने समृद्ध होत असलेल्या या महोत्सवाची उंची आणखीनच वाढत आहे . रविवारी पं. रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनात रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले. तर कणकवलीतील तरुण, उमदे शास्त्रीय गायक मनोज मेस्त्री यांच्या सादरीकरणालाही रसिकांनी दाद दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकवली शहरात वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा , प्रायोगिक नाट्यमहोत्सवाबरोबरच गेली बाविस वर्षे शास्त्रीय संगीत महोत्सव आणि त्या अंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या शास्त्रीय संगीत कार्यशाळेच्या माध्यमातून अभिजात संगीत रसिकांना संगीताच्या दृष्टीने समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात या संस्थेला चांगले यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे रसिकांची येथील कार्यक्रमांना येण्याची ओढ वाढत आहे.यापूर्वी या शास्त्रीय संगीत महोत्सवात पं. सत्यशील देशपांडे , अलकाताई मारुलकर , पं. शौनक अभिषेकी , पं. कैवल्यकुमार गुरव , पं. संजीव अभ्यंकर , तालयोगी सुरेश तळवलकर , पं . राजाभाऊ काळे , कलापिनी कोमकली अशा दिग्गजांनी हजेरी लावली . तसेच हा महोत्सव आपल्या गायन, वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवला . त्याच उंचीचा प्रत्यय यावर्षीही या संगीत महोत्सवात पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने आला . रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पं. पणशीकर यांच्या संगीत मैफिलीला रसिकांनी दाद दिली. तसेच रसिकांनी आपलीही गाण्याची समज गेल्या बावीस वर्षांत वाढली असल्याचा प्रत्यय यावेळी दिला.पं. रघुनंदन पणशीकर यांनी 'यमन' रागातील विलंबित तीन तालामध्ये ' मोहन मन' हा बडा ख्याल , त्यानंतर ' सखी येरी आली ' ही द्रुत तीन तालातील बंदिश सादर केली . त्यानंतर नायकी कानडा पारामामध्ये रुपक तालातील मेरो पिया ही बंदिश सादर केली.रसिकाग्रहास्तव ' मत्स्यगँधा ' नाटकातील ' गुंतता ह्रदय हे ' नाट्यपद सादर केले . तसेच रसिकांच्या मागणीनुसार किशोरी आमोणकर यानी अजरामर केलेली ' अवघा रंग एक झाला ' ही भैरवी त्यांनी सादर करून संगीत महोत्सवाचा समारोप केला . त्यांच्या मैफिलीला तबला साथ चारुदत्त फडके , हार्मोनियम साथ उदय कुलकर्णी व तानपुरा साथ पल्लवी पिळणकर , रविराज काळे यांनी केली .प्रारंभी वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या पं . जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्रातील पं . समीर दुबळे यांचे विद्यार्थी असलेल्या मनोज मेस्त्रींचे शास्त्रीय गायन झाले . मनोज मेस्त्री हे कणकवलीतीलच असून त्यांच्या संगीत मैफिलीला कलारसिकानी उत्स्फूर्त दाद दिली . राग ' मधुवंती ' मधील विलंबित 'झुमरा ' तालातील ह्ल ए हो मोरे सईया ' हा बडा ख्याल गाऊन द्रुत तालातील 'सूनप्रिया अर्ज ' सादर केली .

त्यानंतर खमाज रागातील ' ना मानूंगी ' बंदिश - ठुमरी सादर केली . उस्ताद साईज परवेज यांचे शिष्य अर्जुन पटवर्धन यांनी सतारवादनात 'राजश्री ' रागातील रुपक तालात व द्रूत एकतालातील रचना सादर केली . त्यामुळे या संगीत महोत्सवाची रंगत आणखीनच वाढली. सूत्रसंचालन प्रा . डॉ . अनिल फराकटे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत डॉ. समीर नवरे यांनी केले. यावेळी पं. समीर दुबळे यांच्यासह अन्य संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. 

टॅग्स :musicसंगीतsindhudurgसिंधुदुर्ग