शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पुरळ-कोठारवाडीतील घटना : खारभूमी बंधारा कामाबाबत नाराजी, शेतीत पाणी गेल्याने जमीन नापीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 12:07 IST

पुरळ-कोठारवाडी येथील खारभूमी बंधाऱ्याचे मजबुतीकरणाचे काम करण्यापूर्वी पर्यायी बंधारा बांधून पाणी अडवणे गरजेचे असतांना बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतजमिनीत शिरून जमीन नापीक झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडून झालेले नुकसान खारबंधारा विभागाकडून मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देपुरळ-कोठारवाडीतील घटना खारभूमी बंधारा कामाबाबत नाराजीशेतीत पाणी गेल्याने जमीन नापीक

देवगड : पुरळ-कोठारवाडी येथील खारभूमी बंधाऱ्याचे मजबुतीकरणाचे काम करण्यापूर्वी पर्यायी बंधारा बांधून पाणी अडवणे गरजेचे असतांना बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतजमिनीत शिरून जमीन नापीक झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडून झालेले नुकसान खारबंधारा विभागाकडून मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.पुरळ-कोठारवाडीतील खारभूमी बंधारा मजबुतीकरण कामासाठी जलसंधारण विस्तार व सुधारणा योजनेअंतर्गत ९ लाख ९२ हजार ६७५ रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे या कामाला सुरूवात केली गेली. परंतु असलेल्या बंधाऱ्यांलाच बाजूने भर घालून हे काम सुरू केले गेले.

आधी पाणी अडवणे गरजेचे असतांना पर्यायी बंधारा न बांधताच कामाला सुरूवात करण्यात आली व यावेळी सदर बंधाऱ्यांची झडपे काढली गेली असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात पाणी शेतजमिनीत शिरून जमीन नापीक झाली आहे.

एकदा जमिनीत खारे पाणी शिरले तर तीन वर्षे पीक घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. हे नुकसान संबंधितांनी भरून द्यावे अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. यावेळी प्रदिप खर्से, बाळू दुदवडकर, सलीम चौगुले, मिलिंद बोंबडी, विपुल आंबेरकर, समीर पुरळकर उपस्थित होते.नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणीखारबंधाऱ्यांचे काम बंद पाडण्यात आले असता पुन्हा दोन दिवसांत हे काम त्याच पध्दतीने सुरू केल्याने शेतकऱ्यांनी काम करण्यास विरोध केला. संबधित बंधाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी खारबंधाऱ्यांचे अधिकारी हजर नसल्याने प्रदिप खर्से यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कामाचे कॉन्ट्रक्टर निखिल घेवारे यांनी बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात करण्यापूर्वी पर्यायी बंधारा बांधणे व नंतर काम सुरू करणे गरजेचे होते. या कामाची वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात यावी व झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रदिप खर्से तसेच अन्य शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गJalyukt Shivarजलयुक्त शिवार