शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुरळ-कोठारवाडीतील घटना : खारभूमी बंधारा कामाबाबत नाराजी, शेतीत पाणी गेल्याने जमीन नापीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 12:07 IST

पुरळ-कोठारवाडी येथील खारभूमी बंधाऱ्याचे मजबुतीकरणाचे काम करण्यापूर्वी पर्यायी बंधारा बांधून पाणी अडवणे गरजेचे असतांना बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतजमिनीत शिरून जमीन नापीक झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडून झालेले नुकसान खारबंधारा विभागाकडून मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देपुरळ-कोठारवाडीतील घटना खारभूमी बंधारा कामाबाबत नाराजीशेतीत पाणी गेल्याने जमीन नापीक

देवगड : पुरळ-कोठारवाडी येथील खारभूमी बंधाऱ्याचे मजबुतीकरणाचे काम करण्यापूर्वी पर्यायी बंधारा बांधून पाणी अडवणे गरजेचे असतांना बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतजमिनीत शिरून जमीन नापीक झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडून झालेले नुकसान खारबंधारा विभागाकडून मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.पुरळ-कोठारवाडीतील खारभूमी बंधारा मजबुतीकरण कामासाठी जलसंधारण विस्तार व सुधारणा योजनेअंतर्गत ९ लाख ९२ हजार ६७५ रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे या कामाला सुरूवात केली गेली. परंतु असलेल्या बंधाऱ्यांलाच बाजूने भर घालून हे काम सुरू केले गेले.

आधी पाणी अडवणे गरजेचे असतांना पर्यायी बंधारा न बांधताच कामाला सुरूवात करण्यात आली व यावेळी सदर बंधाऱ्यांची झडपे काढली गेली असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात पाणी शेतजमिनीत शिरून जमीन नापीक झाली आहे.

एकदा जमिनीत खारे पाणी शिरले तर तीन वर्षे पीक घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. हे नुकसान संबंधितांनी भरून द्यावे अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. यावेळी प्रदिप खर्से, बाळू दुदवडकर, सलीम चौगुले, मिलिंद बोंबडी, विपुल आंबेरकर, समीर पुरळकर उपस्थित होते.नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणीखारबंधाऱ्यांचे काम बंद पाडण्यात आले असता पुन्हा दोन दिवसांत हे काम त्याच पध्दतीने सुरू केल्याने शेतकऱ्यांनी काम करण्यास विरोध केला. संबधित बंधाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी खारबंधाऱ्यांचे अधिकारी हजर नसल्याने प्रदिप खर्से यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कामाचे कॉन्ट्रक्टर निखिल घेवारे यांनी बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात करण्यापूर्वी पर्यायी बंधारा बांधणे व नंतर काम सुरू करणे गरजेचे होते. या कामाची वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात यावी व झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रदिप खर्से तसेच अन्य शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गJalyukt Shivarजलयुक्त शिवार