शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राणेंची दहशत मोडीत : राऊत नूतन खासदारांचे खारेपाटण येथे महायुतीकडून जंगी स्वागत

By admin | Updated: May 18, 2014 00:25 IST

कणकवली : लोकसभा निवडणुकीत आमचा विजय झाला आणि जनतेने राणेंची दहशत मोडीत काढल्याचे दिसून आले आहे. परशुरामाच्या भूमीत अन्याय टिकत नाही,

कणकवली : लोकसभा निवडणुकीत आमचा विजय झाला आणि जनतेने राणेंची दहशत मोडीत काढल्याचे दिसून आले आहे. परशुरामाच्या भूमीत अन्याय टिकत नाही, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. विजयी झाल्यानंतर राऊत हे शनिवारी सिंधुदुर्ग दौर्‍यावर आले. येथील शिवसेना शाखेत ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार राऊत यांचे खारेपाटण येथे जिल्ह्याच्या सीमेवर महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी स्वागत गेले. त्यानंतर खासदार राऊत यांचे कणकवलीत पटवर्धन चौकात ढोलताशांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. खासदार राऊत म्हणाले की, नको असलेले प्रकल्प लोकांच्या माथी मारण्याचे काम नारायण राणे यांनी केले. येणार्‍या काळात आम्ही जनतेला आवश्यक असलेले उद्योग जिल्ह्यात आणू. अन्न सुरक्षा कायद्यातील त्रुटींमुळे जनतेला धान्य कमी प्रमाणात मिळत आहे. योजनेतील त्रुटी दूर करून मुबलक धान्य मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. आंबा, काजू, मच्छिमारांचा प्रश्न, बेरोजगारी, वनसंज्ञा आदी प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यात गती आणण्यासाठी जातीने लक्ष घालू. ज्या लोकांनी आपणाला भरघोस मतांनी निवडून दिले. त्या सिंधुदुर्गवासीयांशी संपर्क ठेवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. यावेळी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सहसंपर्कप्रमुख गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख वैभव नाईक, तालुकाप्रमुख सचिन सावंत, महिला आघाडीप्रमुख स्नेहा तेंडुलकर, आरपीआयचे निरीक्षक तानाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष शरद जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)