शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
3
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
4
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
5
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
6
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
7
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
8
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
9
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
10
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
11
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
12
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
13
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
14
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
15
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
16
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
17
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
18
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
19
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
20
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश

राणेंची दहशत मोडीत : राऊत नूतन खासदारांचे खारेपाटण येथे महायुतीकडून जंगी स्वागत

By admin | Updated: May 18, 2014 00:25 IST

कणकवली : लोकसभा निवडणुकीत आमचा विजय झाला आणि जनतेने राणेंची दहशत मोडीत काढल्याचे दिसून आले आहे. परशुरामाच्या भूमीत अन्याय टिकत नाही,

कणकवली : लोकसभा निवडणुकीत आमचा विजय झाला आणि जनतेने राणेंची दहशत मोडीत काढल्याचे दिसून आले आहे. परशुरामाच्या भूमीत अन्याय टिकत नाही, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. विजयी झाल्यानंतर राऊत हे शनिवारी सिंधुदुर्ग दौर्‍यावर आले. येथील शिवसेना शाखेत ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार राऊत यांचे खारेपाटण येथे जिल्ह्याच्या सीमेवर महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी स्वागत गेले. त्यानंतर खासदार राऊत यांचे कणकवलीत पटवर्धन चौकात ढोलताशांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. खासदार राऊत म्हणाले की, नको असलेले प्रकल्प लोकांच्या माथी मारण्याचे काम नारायण राणे यांनी केले. येणार्‍या काळात आम्ही जनतेला आवश्यक असलेले उद्योग जिल्ह्यात आणू. अन्न सुरक्षा कायद्यातील त्रुटींमुळे जनतेला धान्य कमी प्रमाणात मिळत आहे. योजनेतील त्रुटी दूर करून मुबलक धान्य मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. आंबा, काजू, मच्छिमारांचा प्रश्न, बेरोजगारी, वनसंज्ञा आदी प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यात गती आणण्यासाठी जातीने लक्ष घालू. ज्या लोकांनी आपणाला भरघोस मतांनी निवडून दिले. त्या सिंधुदुर्गवासीयांशी संपर्क ठेवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. यावेळी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सहसंपर्कप्रमुख गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख वैभव नाईक, तालुकाप्रमुख सचिन सावंत, महिला आघाडीप्रमुख स्नेहा तेंडुलकर, आरपीआयचे निरीक्षक तानाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष शरद जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)