शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

राणेंची वाटचाल मुख्यमंत्र्यापासून ग्रामपंचायतीकडे- वैभव नाईक जहरी टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 20:04 IST

मालवण : नारायण राणेंनी यांनी प्रत्येक पक्षात पदे भोगली असतानाही पक्षाकडे आसुरी भावनेने पाहत आहेत.

ठळक मुद्देमहत्वाची पदे उपभोगूनही आसुरी भावना कायमकाँग्रेसमधून निलंबन होत असताना अशोक चव्हाण यांनीच राणे यांना काँग्रेसमध्ये घेतले होते

लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : नारायण राणेंनी यांनी प्रत्येक पक्षात पदे भोगली असतानाही पक्षाकडे आसुरी भावनेने पाहत आहेत. शिवसेनेतून बाहेर पडताना सेना औषधाला ठेवणार नाही आणि आता काँग्रेसमधून दुसºया पक्षात जाताना काँग्रेस संपविण्याची भाषा राणे आणि त्यांची टोळी करत आहेत. शिवसेना व काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदासह सर्व महत्वाची मंत्रीपदे दिल्यानंतरही ते समाधानी नाहीत. त्यामुळेच त्यांची मुख्यमंत्री ते ग्रामपंचायतीच्या दिशेने अधोगती सुरु झाली आहे, अशी जहरी टीका आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केली.

मालवण शिवसेना शाखा कार्यालयात मंगळवारी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, बाबी जोगी, सन्मेष परब, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, किरण वाळके आदी उपस्थित होते.वैभव नाईक म्हणाले, सन२००५ मध्ये शिवसेना सोडताना नारायण राणे यांनी शिवसेना औषधाला शिल्लक ठेवणार नाही असे वक्तव्य केले होते. आता जिल्'ातील सत्ता काँग्रेसच्या हाती ठेवणार नाही असे राणे बोलत आहेत. सर्व पदे उपभोगूनही बारा वर्षांच्या कालावधीनंतरही राणेंची आसुरी भूमिका कायम आहे. त्यामुळे राणे ज्या पक्षात जातील त्या पक्षाने राणेंची ही भूमिका लक्षात ठेवावी.ग्रामपंचायतीत अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडमुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघून नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले होते. आता काँग्रेसवर टीका करणारे राणे जिल्'ातील ग्रामपंचायतीमध्ये आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहेत. यावरूनच त्यांची अधोगती झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसमधून निलंबन होत असताना अशोक चव्हाण यांनीच राणे यांना काँग्रेसमध्ये घेतले होते, याचीही आठवण नाईक यांनी करून दिली.निलेश राणेंची दाढी आयुष्यभर तशीच राहणार !विकास सावंत हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांच्यावर राणेंच्या मुलांनी टीका करणे शोभत नाही. राणेंची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि समर्थकांची टोळी आता रत्नागिरीतही शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे निलेश राणे यांनी २०१९ च्या निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांचा पराभव करण्याचे दिलेले आव्हान कधीच पूर्ण होणार नसून निलेश राणेंची दाढी आयुष्यभर तशीच राहील असा टोला हाणताना राणेंनी प्रथम कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असेही आव्हान नाईक यांनी दिले.