शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

राणेंची वाटचाल मुख्यमंत्र्यापासून ग्रामपंचायतीकडे- वैभव नाईक जहरी टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 20:04 IST

मालवण : नारायण राणेंनी यांनी प्रत्येक पक्षात पदे भोगली असतानाही पक्षाकडे आसुरी भावनेने पाहत आहेत.

ठळक मुद्देमहत्वाची पदे उपभोगूनही आसुरी भावना कायमकाँग्रेसमधून निलंबन होत असताना अशोक चव्हाण यांनीच राणे यांना काँग्रेसमध्ये घेतले होते

लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : नारायण राणेंनी यांनी प्रत्येक पक्षात पदे भोगली असतानाही पक्षाकडे आसुरी भावनेने पाहत आहेत. शिवसेनेतून बाहेर पडताना सेना औषधाला ठेवणार नाही आणि आता काँग्रेसमधून दुसºया पक्षात जाताना काँग्रेस संपविण्याची भाषा राणे आणि त्यांची टोळी करत आहेत. शिवसेना व काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदासह सर्व महत्वाची मंत्रीपदे दिल्यानंतरही ते समाधानी नाहीत. त्यामुळेच त्यांची मुख्यमंत्री ते ग्रामपंचायतीच्या दिशेने अधोगती सुरु झाली आहे, अशी जहरी टीका आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केली.

मालवण शिवसेना शाखा कार्यालयात मंगळवारी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, बाबी जोगी, सन्मेष परब, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, किरण वाळके आदी उपस्थित होते.वैभव नाईक म्हणाले, सन२००५ मध्ये शिवसेना सोडताना नारायण राणे यांनी शिवसेना औषधाला शिल्लक ठेवणार नाही असे वक्तव्य केले होते. आता जिल्'ातील सत्ता काँग्रेसच्या हाती ठेवणार नाही असे राणे बोलत आहेत. सर्व पदे उपभोगूनही बारा वर्षांच्या कालावधीनंतरही राणेंची आसुरी भूमिका कायम आहे. त्यामुळे राणे ज्या पक्षात जातील त्या पक्षाने राणेंची ही भूमिका लक्षात ठेवावी.ग्रामपंचायतीत अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडमुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघून नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले होते. आता काँग्रेसवर टीका करणारे राणे जिल्'ातील ग्रामपंचायतीमध्ये आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहेत. यावरूनच त्यांची अधोगती झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसमधून निलंबन होत असताना अशोक चव्हाण यांनीच राणे यांना काँग्रेसमध्ये घेतले होते, याचीही आठवण नाईक यांनी करून दिली.निलेश राणेंची दाढी आयुष्यभर तशीच राहणार !विकास सावंत हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांच्यावर राणेंच्या मुलांनी टीका करणे शोभत नाही. राणेंची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि समर्थकांची टोळी आता रत्नागिरीतही शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे निलेश राणे यांनी २०१९ च्या निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांचा पराभव करण्याचे दिलेले आव्हान कधीच पूर्ण होणार नसून निलेश राणेंची दाढी आयुष्यभर तशीच राहील असा टोला हाणताना राणेंनी प्रथम कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असेही आव्हान नाईक यांनी दिले.