शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मुख्यमंत्र्यांनी केलेली टीका राणेंनी स्वतःवर ओढवून घेतली ! : वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 16:08 IST

Dasram Uddhav Thackeray, Narayan Rane, Shiv Sena , Vaibhav Naik, sindhudurg ' दसरा मेळाव्याच्या भाषणात ठाकरेंनी राणे आणि त्याच्या मुलांचा उल्लेख टाळला होता . मात्र , शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेले विशेषण आपल्यालाच चपखल बसते हे राणेंच्या लक्षात आल्याने त्यांनी ठाकरेंनी उडवलेली टोपी स्वत : हून झेलली आणि आपल्या डोक्यावर घालून घेतली , अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी केलेली टीका राणेंनी स्वतःवर ओढवून घेतली ! : वैभव नाईक राणेंनी केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख

कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील संयमी व सुसंस्कृत नेते आहेत. गेल्या पंधरा वर्षात शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर असंख्य वेळा त्यांचे नाव घेऊन टीका केली . परंतु ठाकरेंनी चुकूनही राणेंच्या नावाचा उल्लेख केला नाही .

दसरा मेळाव्याच्या भाषणात ठाकरेंनी राणे आणि त्याच्या मुलांचा उल्लेख टाळला होता . मात्र , शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेले विशेषण आपल्यालाच चपखल बसते हे राणेंच्या लक्षात आल्याने त्यांनी ठाकरेंनी उडवलेली टोपी स्वत : हून झेलली आणि आपल्या डोक्यावर घालून घेतली , अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पत्रकार परिषदेत आपण कोणाविषयी बोलत आहोत , याचेही भान राणेंना राहिले नाही . माजी मुख्यमंत्री असलेल्या राणेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला.

महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवारांपर्यंत सुसंस्कृत विरोधी नेत्यांची परंपरा आहे . त्यामुळे महाराष्ट्रात राजकारण करत असताना सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते सभ्यतेचे काही अलिखित संकेत पाळतात. राणेंनी मुख्यमंत्री पदी विराजमान असलेल्या ठाकरेंचा एकेरी उल्लेख करून सभ्यतेचे अलिखित संकेत पायदळी तुडवले आहेत.आमदार नीतेश राणेंना मी सांगू इच्छीतो की , मातोश्रीच्या अंगणात तुळशी वृंदावनच आहे . ' आपण हसे लोकाला आणि शेंबुड आपल्या नाकाला ' अशीच काहीशी नीतेश यांची अवस्था झाली आहे . मुळात ' संस्कार ' हा शब्दच त्यांच्या तोंडी शोभत नाही, असेही नाईक यांनी या म्हटले आहे .

 

 

 

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाVaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग