शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तरसभेमुळे सत्ताधारी घाबरले - परशुराम उपरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 17:05 IST

ज्या पक्षाची स्थापना खऱ्या अर्थाने हिंदुत्वासाठी करण्यात आली होती, तो सत्ताधारी शिवसेना पक्ष आता हिंदुत्ववाद सोडून सेक्युलर झाला आहे.

कणकवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाडवा मेळावा आणि ठाण्यातील उत्तरसभेमुळे सत्ताधारी राजकीय पक्ष घाबरले आहेत. त्यामुळे विविध आरोप होत आहेत. मात्र, मराठी माणूस आणि हिंदुत्वासासाठी मनसेची स्थापना करण्यात आली होती. शिवसेनेसारख्या एका हिंदुत्ववादी पक्षाने बाळासाहेब ठाकरेंच्या प्रखर हिंदुत्वाची कास सोडली. मात्र, राज ठाकरे यांनी आपला हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावीपणे पुढे केल्यामुळे इतर पक्षांना पोटशूळ उठला आहे, अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले, राज ठाकरे यांनी हनुमान जयंतीच्या औचित्यावर अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. त्यामुळे बाकीचे राजकीय पक्ष देवळात जाऊन आपल्या हिंदुत्वाचे दर्शन घडवत आहेत. ज्या पक्षाची स्थापना खऱ्या अर्थाने हिंदुत्वासाठी करण्यात आली होती, तो सत्ताधारी शिवसेना पक्ष आता हिंदुत्ववाद सोडून सेक्युलर झाला आहे.मात्र हिंदूंना सवलत नाहीबाळासाहेबांच्या जुन्या भाषणांचे व्हिडिओ पाहिले तर त्यातून प्रखर हिंदुत्वाचे दर्शन घडते. बाळासाहेबांचे शरद पवारांशी सलोख्याचे संबंध असले तरी त्यांना बाळासाहेबांनी अनेकदा सुनावले होते. इटलीहून लग्न करून भारतात आलेल्या सोनिया गांधींना पांढऱ्या पायाची म्हणणारे बाळासाहेबच होते. आज एकत्रित सत्तेत आल्यामुळे सरकार सेक्युलर झाले आहे. अल्पसंख्यांक मंत्र्यांनी मुस्लिम मुलांना शिक्षणासाठी तीन हजार रुपये मासिक मानधन घोषित केले. मात्र इतर धर्मीय मुले गरीब असूनही त्यांना मानधन दिले जात नाही. हज यात्रेला विमान प्रवासासाठी सवलत दिली जाते. मात्र सर्व हिंदूंना पंढरपूरला जाण्यासाठी एसटीची किंवा इतर प्रवासाची सवलत सरकारने दिली नाही.विनायक राऊतांनी बाळासाहेबांची भाषणे ऐकावीतत्यामुळे एका हिंदुत्ववादी पक्षाने हिंदुत्वाची कास सोडल्यामुळे राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा विषय जो बाळासाहेबांनी उचलून ठरला होता त्याचे समर्थन केल्याने इतरांना डोकेदुखी झाली आहे. राज ठाकरे हे हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी बाळासाहेबांची जुनी भाषणे ऐकावीत किंवा आम्ही ती त्यांना देतो. त्यावेळी बाळासाहेबांनीही दसरा मेळाव्यात भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती.

तत्कालीन नेते सरपोतदार यांनी भोंग्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. बाळासाहेबांनी रस्त्यावर पढल्या जाणाऱ्या नमाजाविरोधात उत्तर देण्यासाठी शिवसैनिकांना आदेश दिले होते की त्यांनी महाआरती सुरू करावी. याबाबत खासदार राऊत अनभिज्ञ आहेत का? आज प्रखर हिंदुत्ववादी विचार बोलणारा जहाल नेता म्हणून राज ठाकरे लोकांना हवे आहेत. त्यामुळे बाकीच्या पक्षांच्या लोकांना पोटशूळ उठले आहेत.हिंदुत्ववादी नेता म्हणून राज ठाकरेंकडे बघण्याची गरजआता हिंदुत्ववादी नेता म्हणून राज ठाकरेंकडे बघण्याची गरज आहे. आपले परखड विचार मांडताना बाळासाहेबांनी जात्यांध मुसलमानांचा योग्य समाचार घेतला होता. त्याचप्रमाणे कोणत्याही कारवाईची पर्वा न करता राज ठाकरेही हिंदूत्वासाठी झटत आहेत. आता मुख्यमंत्री आणि त्यांच्या बांडगुळांनी बाळासाहेबांचे विचार समजून घेण्याची गरज आहे. तसेच राज ठाकरेंच्या ५ जूनच्या अयोध्या दौऱ्यात जिल्ह्यातील शेकडो मनसैनिक सहभागी होणार असल्याचे परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर Raj Thackerayराज ठाकरे