शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तरसभेमुळे सत्ताधारी घाबरले - परशुराम उपरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 17:05 IST

ज्या पक्षाची स्थापना खऱ्या अर्थाने हिंदुत्वासाठी करण्यात आली होती, तो सत्ताधारी शिवसेना पक्ष आता हिंदुत्ववाद सोडून सेक्युलर झाला आहे.

कणकवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाडवा मेळावा आणि ठाण्यातील उत्तरसभेमुळे सत्ताधारी राजकीय पक्ष घाबरले आहेत. त्यामुळे विविध आरोप होत आहेत. मात्र, मराठी माणूस आणि हिंदुत्वासासाठी मनसेची स्थापना करण्यात आली होती. शिवसेनेसारख्या एका हिंदुत्ववादी पक्षाने बाळासाहेब ठाकरेंच्या प्रखर हिंदुत्वाची कास सोडली. मात्र, राज ठाकरे यांनी आपला हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावीपणे पुढे केल्यामुळे इतर पक्षांना पोटशूळ उठला आहे, अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले, राज ठाकरे यांनी हनुमान जयंतीच्या औचित्यावर अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. त्यामुळे बाकीचे राजकीय पक्ष देवळात जाऊन आपल्या हिंदुत्वाचे दर्शन घडवत आहेत. ज्या पक्षाची स्थापना खऱ्या अर्थाने हिंदुत्वासाठी करण्यात आली होती, तो सत्ताधारी शिवसेना पक्ष आता हिंदुत्ववाद सोडून सेक्युलर झाला आहे.मात्र हिंदूंना सवलत नाहीबाळासाहेबांच्या जुन्या भाषणांचे व्हिडिओ पाहिले तर त्यातून प्रखर हिंदुत्वाचे दर्शन घडते. बाळासाहेबांचे शरद पवारांशी सलोख्याचे संबंध असले तरी त्यांना बाळासाहेबांनी अनेकदा सुनावले होते. इटलीहून लग्न करून भारतात आलेल्या सोनिया गांधींना पांढऱ्या पायाची म्हणणारे बाळासाहेबच होते. आज एकत्रित सत्तेत आल्यामुळे सरकार सेक्युलर झाले आहे. अल्पसंख्यांक मंत्र्यांनी मुस्लिम मुलांना शिक्षणासाठी तीन हजार रुपये मासिक मानधन घोषित केले. मात्र इतर धर्मीय मुले गरीब असूनही त्यांना मानधन दिले जात नाही. हज यात्रेला विमान प्रवासासाठी सवलत दिली जाते. मात्र सर्व हिंदूंना पंढरपूरला जाण्यासाठी एसटीची किंवा इतर प्रवासाची सवलत सरकारने दिली नाही.विनायक राऊतांनी बाळासाहेबांची भाषणे ऐकावीतत्यामुळे एका हिंदुत्ववादी पक्षाने हिंदुत्वाची कास सोडल्यामुळे राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा विषय जो बाळासाहेबांनी उचलून ठरला होता त्याचे समर्थन केल्याने इतरांना डोकेदुखी झाली आहे. राज ठाकरे हे हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी बाळासाहेबांची जुनी भाषणे ऐकावीत किंवा आम्ही ती त्यांना देतो. त्यावेळी बाळासाहेबांनीही दसरा मेळाव्यात भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती.

तत्कालीन नेते सरपोतदार यांनी भोंग्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. बाळासाहेबांनी रस्त्यावर पढल्या जाणाऱ्या नमाजाविरोधात उत्तर देण्यासाठी शिवसैनिकांना आदेश दिले होते की त्यांनी महाआरती सुरू करावी. याबाबत खासदार राऊत अनभिज्ञ आहेत का? आज प्रखर हिंदुत्ववादी विचार बोलणारा जहाल नेता म्हणून राज ठाकरे लोकांना हवे आहेत. त्यामुळे बाकीच्या पक्षांच्या लोकांना पोटशूळ उठले आहेत.हिंदुत्ववादी नेता म्हणून राज ठाकरेंकडे बघण्याची गरजआता हिंदुत्ववादी नेता म्हणून राज ठाकरेंकडे बघण्याची गरज आहे. आपले परखड विचार मांडताना बाळासाहेबांनी जात्यांध मुसलमानांचा योग्य समाचार घेतला होता. त्याचप्रमाणे कोणत्याही कारवाईची पर्वा न करता राज ठाकरेही हिंदूत्वासाठी झटत आहेत. आता मुख्यमंत्री आणि त्यांच्या बांडगुळांनी बाळासाहेबांचे विचार समजून घेण्याची गरज आहे. तसेच राज ठाकरेंच्या ५ जूनच्या अयोध्या दौऱ्यात जिल्ह्यातील शेकडो मनसैनिक सहभागी होणार असल्याचे परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर Raj Thackerayराज ठाकरे