शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात वाऱ्यासह पाऊस, आंब्याचे मोठे नुकसान

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 7, 2023 18:57 IST

शेतकऱ्यांची पळापळ

कनेडी (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात कणकवली तालुक्यातील कनेडी आणि परिसरात आज, शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटात जोरदार वादळी वळीव पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांची पळापळ सुरू झाली.दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवार (दि.६) पासूनच पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. गेले दोन दिवस वातावरणात उकाडा वाढल्याने ग्रामस्थ हैराण झाले होते. आज, शुक्रवारी सायंकाळी साडेतीनच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही वेळातच सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पाऊस सुरू होता.शेतकऱ्यांच्या बेगमीसह आंब्याचे मोठे नुकसानशेतकऱ्यांनी बेगमी करून ठेवलेली लाकडे, शेणी, गुरांचा चारा, पावसाने भिजून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांची पळापळ होत असलेली दिसत होती. शेतकऱ्यांच्या कलमी आंब्याचेही मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे आंबे खाली पडून ढीग झाला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठिकठिकाणी वीज वितरणच्या तारा तुटून वीज प्रवाह बंद झाला होता तर काही ठिकाणी मार्गही झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडून बंद झाले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस