शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

 रेडी रेवस मार्गाचा नव्याने आराखडा व्हावा; विधानसभा अध्यक्षांची मागणी, महामार्गावर छोटो मोठे उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न 

By अनंत खं.जाधव | Updated: November 27, 2023 19:47 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मागील काही वर्षात म्हणावा तसा विकास झाला नाही.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मागील काही वर्षात म्हणावा तसा विकास झाला नाही. ही वस्तुस्थिती आहे पण आता आपण विकासाबाबत नवनवीन काही तरी करतो याचे ही मला समाधान आहे. नवीन रेडी रेवस महामार्गाच्या बाजूला छोटे मोठे विकास प्रकल्प उभारले जावेत यासाठी नव्याने आराखडा बनविण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मातोंड येथील देवीच्या उत्सवानिमित्त अँड नार्वेकर हे सावंतवाडीत आले होते. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांवर सडेतोड मते मांडली.

येथील मुलांना रोजगारासाठी गोव्यात जावे लागते खरे आहे. येथे प्रकल्प आणायचे झाले तर इकोसेन्सेटिव्ह सह अनेक अडचणी आहेत. या अडचणींवर मात करून प्रकल्प आणावे लागतात अनेकांनी प्रकल्प करण्यासाठी जमिनी घेतल्या ते काही करत नाहीत.त्यावर मुंबई येथे बैठक झाली असून लवकरच निर्णय घेऊ... तीन मंत्री असताना सावंतवाडी मतदारसंघ मागे का? असे विचारले असताना त्यांनी सांगितले की, भविष्यात हे तीन मंत्री काही तरी करून दाखवतील छोटे मोठे पर्यटन प्रकल्प आले पाहिजेत यासाठी प्रयत्न झाला पाहिजे आणि तो सर्वानी मिळून करावा. मागील दौऱ्यात जिल्ह्यातील प्रश्नांवर बैठक घेणार होता. मी तीन ते चार बैठका घेतल्या यात सीआरझेड चा प्रश्न सोडविण्यात आला तसेच येथील जमिनी अनेक वर्षे उद्योजकांच्या ताब्यात आहेत. त्यावर ही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

तसेच माझे उपमुख्यमंत्र्यांशी संबंध चांगले आहेत मी या बाबी त्यांच्या कानावर घालून येथे एखादा प्रकल्प यावा यासाठी प्रयत्न करेन. एखादा निर्णय देतना विलंब झाला म्हणजे पदाची गरिमा राहिली नाही असे म्हणायचे का? माझ्या विधानसभा अध्यक्ष पदांच्या काळात सर्वात जास्त कामकाज झाले एक प्रश्न उत्तर तास म्हणा किंवा आयुधे वाया घालवली नाहीत मग गरिमा राहिली नाही ही टीका कशी योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी केला. 

सतत विधानसभा अध्यक्ष विरोधकांच्या निशाण्यावर का? याला प्रत्युत्तर देताना नार्वेकरांनी म्हटले, "मी सध्या रेडी रेवस या सागरी महामार्ग वर अभ्यास करत आहे. या मार्गाचा शासनाने नव्याने आराखडा करावा यासाठी मी पत्र दिले असून यामागचे कारण म्हणजे या मार्गावर छोटे छोटे पर्यटन उद्योग यावेत जेणे करुन त्याचा फायदा कोकणातील तरूणांना होईल त्यामुळे याचा आराखडाच नव्याने करण्यासाठी लवकरच बैठक ही घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परस्थीतीमुळे कदाचित मी त्याच्या निशाण्यावर असेन पण माझे काम मी नियमात करतो आणि आता तर सर्वोच्च न्यायालया कडून ही 31 डिसेंबर पर्यंत निर्णय देण्यास सांगितले आहे." 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRahul Narvekarराहुल नार्वेकर