शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राहुल गांधीनी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन करणार : राजश्री धुमाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 17:52 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अनुद्गार काढणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची तत्काळ माफी मागावी. त्यांनी दोन दिवसांत माफी न मागितल्यास आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू . असा इशारा भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देराहुल गांधीनी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन करणार राजश्री धुमाळे यांचा इशारा

कणकवली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अनुद्गार काढणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची तत्काळ माफी मागावी. त्यांनी दोन दिवसांत माफी न मागितल्यास आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू . असा इशारा भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे यांनी दिला आहे.कणकवली येथिल भाजपा संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजप प्रभारी तालुकाध्यक्ष राजन चिके, महिला प्रदेश सदस्या प्रज्ञा ढवण, माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष रमेश पावसकर, डामरे माजी सरपंच बबलू सावंत, परशुराम झगडे, पपू पुजारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी राजश्री धुमाळे म्हणाल्या , स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही कदापिही सहन करणार नाही.सावरकरांविरोधात बोलणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांनी प्रथम देशाचा इतिहास जाणून घ्यावा आणि त्यानंतरच वक्तव्य करावे. त्यांचे ते वक्तव्य बलिशपणाचे आहे. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबरच संपूर्ण देशाचाही अपमान केला आहे. हे कधीही सहन केले जाणार नाही. असेही राजश्री धुमाळे यांनी यावेळी सांगितले.यावेळी राजन चिके म्हणाले, १८ डिसेंबर रोजी कणकवली तालुका भाजपाचा मेळावा भगवती मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता होणार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच तालुक्यातील विकासकामांचा आढावा ते यावेळी घेणार आहेत. त्याचबरोबर पुढील काळात सक्षम विरोधी पक्ष या नात्याने काम करण्याविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार , माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपा प्रदेश सदस्य अतुल काळसेकर, प्रदेश सचिव राजन तेली, जिल्हापरिषद अध्यक्षा संजना सावंत यांची प्रमुख उपस्थितीही असणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले.नूतन तालुकाध्यक्ष पक्षश्रेष्ठी ठरवतील !सध्या भाजपाची जिल्ह्यातील पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार नूतन तालुकाध्यक्ष कोण असणार? हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. पक्षश्रेष्ठी आपल्यावर जी काही जबाबदारी देतील ती पार पाडली जाईल.भाजपात पक्ष शिस्त महत्वाची असते. त्यामुळे पक्ष वाढविण्यासाठी नवे ,जुने असा वाद न करता सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने प्रयत्न करतील . असे एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान राजन चिके यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीsindhudurgसिंधुदुर्ग