शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा राडे सुरू झाले, म्हणून सिंधुदुर्ग बदलतोय काय?; वैभव नाईकांचा भाजपला खोचक सवाल

By सुधीर राणे | Updated: February 6, 2023 17:56 IST

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लावा. मग मराठी माणूस कोणासोबत आहे ते नेमके समजेल

कणकवली: आंगणेवाडीत भराडी मातेच्या यात्रेदिवशी भाजपाने आनंद मेळावा घेतला. तो फक्त शिवसेनेवर टीका करण्यासाठी आणि नारायण राणेंना राजकीय निरोप देण्यासाठी होता का? या मेळाव्यासाठी' सिंधुदुर्ग बदलतोय' ..अशी टॅग लाईन वापरण्यात आली. म्हणजे नेमके काय? जिल्ह्यात पुन्हा राडे सुरू झाले म्हणून सिंधुदुर्ग बदलतोय काय? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेत्यांना विचारला आहे. कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.वैभव नाईक म्हणाले, आंगणेवाडीत राज्यातून लाखो भाविक  येतात. मात्र, असे असताना भाजपच्या सभेमुळे भाविकांना चार पाच तास वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागला. मुळात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सभा आयोजनामुळे राणेंची असलेली नाराजी त्यांच्या बोलण्यातून जाणवली. भाजपने आमच्यावर विनाकारण टीका करत बसण्यापेक्षा हिम्मत असेल तर लगेचच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लावावी. मग मराठी माणूस कोणासोबत आहे ते नेमके समजेल असे खुले आव्हान देखील नाईक यांनी दिले.आमच्या सरकारच्या काळातील काही रस्ते भाजपाच्या ठेकेदारांनी  केले नव्हते. ते आता केले आहेत. भाजपा मेळाव्यात ५५० लोकांचा सत्कार करण्यात आला. ज्यावेळी राणे काँगेसमध्ये गेले तेव्हाही अशीच सूज काँग्रेसला आली होती. मात्र, माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकांने त्यांचा पराभव केला. भर सभेत राणे भाषण करताना मी ३० वर्षे काम केल्यामुळे एवढे लोकप्रतिनिधी तयार  झाले असल्याचे वारंवार सांगत होते. तसेच मी भाजप सोडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेत बोलायला उभे राहताच फटाके वाजवण्यात आले. राणे आणि रविंद्र चव्हाण यांच्या मध्ये सुप्त वाद निर्माण झाला आहे, हे या मेळाव्याच्यावरून दिसून आले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काय केले? असे विरोधकांकडून विचारले जाते. मात्र,  जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. हे काम शिवसेनेनेच केले आहे. विरोधकांनी अंगणवाडी तरी सुरू केली का? असे राणे विचारतात. मात्र, आम्ही डीफार्मसीसारखी कॉलेज सुरू केली आहेत. त्यामुळे राणेंनी जुने आरोप पुन्हा करु नयेत.आशिष शेलार यांनी मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून २० वर्षे सत्ता भोगली आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्या लोकांना ३० कोटींचा दंड झाला त्यांनी पक्ष बदल केल्यावर तो माफ केला जातो. मात्र, दबावासाठी जिल्ह्यातील १५० डंपर चालकांना दंड केला जातो. याला काय म्हणायचे? काही वाळू व्यावसायिकांना भाजपात प्रवेश करा, म्हणून सांगितले जात आहे. आमच्यावर कमिशनचा आरोप करणाऱ्या राणेंनी त्या कामांची निविदा प्रक्रिया झालीच नाही. ही माहिती आधी घ्यावी. माझ्या राजकीय भवितव्याबाबत काळजी नकोआमदार नितेश राणे यांनी अगोदर नाणारला विरोध केला होता. आता कमिशनसाठी व कामाच्या ठेक्यासाठी त्यांचा विरोध मावळला. असे आम्ही म्हणायचे का?  आमच्यावर दबाव असूनही आम्ही  पक्ष बदललेला नाही. त्यामुळे नितेश राणेंनी माझ्या राजकीय भवितव्याबाबत काळजी करु नये. असेही वैभव नाईक यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Narayan Raneनारायण राणे BJPभाजपा