शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालय परिसरातील झाडांना आग, वृक्ष लागवडीवर प्रश्न उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 17:20 IST

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लागवड करण्यात आलेल्या झाडांची देखभाल करण्याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आज पुन्हा एकदा दिसून आले आहे. प्रशासनाने या झाडांकडे दुर्लक्ष करीत झाडांसभोवतालचे गवत न काढल्याने बुधवारी या गवताला आग लागून या परिसरातील अनेक झाडे आगीच्या भक्षस्थानी पडली.

ठळक मुद्देमुख्यालय परिसरातील झाडांना आग, वृक्ष लागवडीवर प्रश्न उपस्थित वृक्ष संवर्धनाकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लागवड करण्यात आलेल्या झाडांची देखभाल करण्याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आज पुन्हा एकदा दिसून आले आहे. प्रशासनाने या झाडांकडे दुर्लक्ष करीत झाडांसभोवतालचे गवत न काढल्याने बुधवारी या गवताला आग लागून या परिसरातील अनेक झाडे आगीच्या भक्षस्थानी पडली.

एकीकडे शासन वृक्षलागवडीवर भर देत असताना जिल्हा प्रशासन मात्र वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, झाडांची देखभाल करता येत नसेल तर वृक्ष लागवड का केली जाते असा प्रश्न उपस्थित होत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून-जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते. शासनाच्या वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवड केली जाते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोकळ्या जागेत वृक्ष लागवड केली आहे.मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसराच्या मोकळ्या जागेत नारळ, सुपारी अशी झाडे लावली आहेत. यातील काही झाडांची देखभाल करण्यात आल्याने ती चांगली झाली आहेत. तर काही झाडांकडे अक्षरश: त्या त्या विभागांनी दुर्लक्ष केला आहे.बुधवारी भर दुपारी लागलेल्या आगीत प्रशासनाच्यावतीने लावण्यात आलेली झाडे जळून खाक झाली आहेत. पाण्याअभावी अखेरची घटका मोजणारी झाडे या आगीच्या भक्षस्थानी पडली.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी खर्च केलेला शासनाचा निधी वाया गेला आहे. तशी चर्चाही या ठिकाणी सुरू आहे.पुन्हा त्याच ठिकाणी झाडे लावण्यासाठी आगज्या ठिकाणी बुधवारी आग लागून झाडे जळाली आहेत त्या ठिकाणी दरवर्षी आग लागते आणि झाडे जळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे या झाडांसभोवतालचे गवत काढण्यात यावे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने बुधवारी लागलेल्या आगीत ही झाडे जळाली. मात्र, वारंवार याच ठिकाणी आग लागून झाडे जळत असल्याने पुन्हा याच ठिकाणी झाडे लावण्यासाठी जागा मोकळी व्हावी यासाठी तर आग लावली जात नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग