शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

शोभा वाढली पण दर्जाचा प्रश्न अनुत्तरीतच

By admin | Updated: February 19, 2016 00:16 IST

कुटीर रूग्णालय दुरूस्तीची अवस्था : निधी मंजूर असूनही मुहूर्त सापडेना, बाह्य सजावटीपेक्षा अंतर्गत सुधारणेची गरज

प्रसन्न राणे -- सावंतवाडी  येथील संस्थानकाळापासून असलेल्या कुटीर रूग्णालयाच्या इमारतीसाठी शासनाकडून मंजूर झालेल्या दीड कोटी रूपयांच्या निधीचा अद्यापही थांगपत्ता नसून अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या इमारतीचे काम सुरू होणार तरी केव्हा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे कुटीर रूग्णालयात डागडुजीची गरज असतानाही रूग्णालयाच्या बाहेरील सुशोभिकरणाचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. दर्जा सुधारण्यापेक्षा सुशोभिकरणावर भर देणारे नेमके काय साधणार आहेत? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांशी रूग्ण कुटीर रूग्णालयाचा लाभ घेतात. अनेक गावांमधून शेकडो रूग्ण या रूग्णालयात उपचारासाठी येत जात असतात. यावेळी त्या रूग्णांना अनेक समस्या भेडसावत असतात. प्रसुतीगृहातील गैरसोय, बेडची कमतरता, विद्युत पुरवठा वारंवार खंडीत, पिण्याच्या पाण्याची गैरव्यवस्था, पावसाळ्यात छप्पर दुरूस्ती करूनही गळतीची समस्या भेडसावत आहे. अनेक समस्यांना दररोज नवनवीन रूग्णांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, तरीही रूग्णांच्या जिवाशी खेळ करीत दरवर्षी मलमपट्टी शिवाय काहीही करण्यात येत नाही.याचबरोबर या रूग्णालयातील शवागृहही मृतावस्थेत आहे. सुरूवातीपासूनच शवागृहे नादुरूस्त झाल्याने नवीन बांधण्यात आले होते. मात्र, दुसरेही शवागृह लगेचच बंद पडल्यानंतर यांच्या दुरूस्तीकडे पुर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे मध्यंतराच्या काळात सावंतवाडीतीलच दोघांचे मृतदेह ओरोस येथे ठेवण्यात आले होते.रूग्णालयातील रूग्णांसाठी असलेली विहिरही बंद करण्यात आली. यामुळे नळाच्या पाण्याचा वापर रूग्णांना करावा लागत आहे. तेही वेळापत्रकानुसार यामुळे रूग्णालयाची स्वतंत्र एक विहीर अथवा बोअरवेल असणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यदृष्ट्या स्वच्छ पाणी त्यांना उपलब्ध होऊ शकते. रूग्णालयात असंख्य समस्या असतानाही या समस्यांकडे दुर्लक्ष करीत बांधकाम विभागाने रूग्णालयाच्या बाहेरील कठड्याचे काम हाती घेतले. ही अत्यंत निंदनीय अवस्था असून रूग्णांच्या होणाऱ्या परवडीकडे सर्वांनीच डोळे बंद केले आहे. याबाबत कोणच जाब विचारत नसून सर्वांनीच बघ्याची भूमिका घेतली आहे.कुटीर रूग्णालयाच्या इमारत दुरूस्तीसाठी शासनाकडून दीड कोटीचा निधी मंजूर होऊन कित्येक महिने झाले. मात्र, तरीही रूग्णांच्या सेवेकडे दुर्लक्ष करीत नुसती शोभा वाढविण्याचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. यामुळे दररोज होण्याच्या परवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. इमारतीला गरज शवविच्छेदनाची रूग्णालयातील सर्वच इमारतीची दुरवस्था झाली आहे. खिडक्या, भिंती, दारांसह छप्पराचे साहित्यही निकृष्ट बनले आहे. त्यामुळे या विभागाचेच शवविच्छेदन करून त्याची दुरूस्ती करण्याची नितांत गरज आहे. याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचे छप्परही जीर्ण झाले आहे. यामुळे या सर्व बाबींकडे जलदगतीने लक्ष देणे आवश्यक आहे.