शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

कागदनिर्मिती उद्योग आणण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: August 15, 2016 00:13 IST

दीपक केसरकर : वेंगुर्ले प्रादेशिक फळसंशोधन केंद्राच्या सभागृहात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक

वेंगुर्ले : मनरेगाअंतर्गत बांबू लागवडीला भरपूर वाव आहे. बांबूपासून फर्निचर, तंबू, शोभेच्या वस्तू आदी निर्मितीला चांगली मागणी आहे. बांबूपासून कागद तयार करण्याची इंडस्ट्रीज जिल्ह्यात येवू शकते. पण अशा इंडस्ट्रीजपासून पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची शहानिशा करुनच असा प्रकल्प जिल्ह्यात आणण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिली. वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात जलयुक्त शिवार व मनरेगा योजनेंतर्गत होणाऱ्या कामांचे नियोजन व उपाययोजना आदींबाबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, चांदा ते बांदा योजना अधिकारी लिना बनसोडे, उपजिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, ज्ञानेश्वर खुटवड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी केसरकर म्हणाले, चांदा ते बांदा योजनेंतर्गत मनरेगाच्या मदतीने गोपालन, डेअरी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जाणार आहे. त्यासाठी मनरेगा व चांदा ते बांदा या योजनेच्या निधीचा चांगल्याप्रकारे उपयोग करता येणार आहे. यावेळी किनारपट्टी भागात नवाबाग-उभादांडा याठिकाणी पर्यटनासाठी तंबू उभारण्यात येणार असून एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्यासाठीचे स्पॉट आयडेंटीफाय करण्याच्या सूचना केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक तालुक्यात मनरेगाअंतर्गत वृक्षलागवड करतांना फळ पिकांच्या व फूलशेतीच्या लागवडीवर जास्त भर दिल्यास ते फायदेशीर ठरेल. त्यासाठी अशा झाडांची निश्चित करुन जांभूळ, कोकम, पेरु, फणस आदी झाडांंचा यामध्ये समावेश करुन त्यांच्या लागवडीबाबतचे प्रस्ताव मनरेगा विभागामार्फतच पाठवा. त्यातून विकासाला चालना मिळेल, असा विश्वास केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. वेंगुर्ले येथील जिल्हा समाजकल्याणच्या वसतीगृहात तातडीने सोयीसुविधा पुरविण्याकरिता स्वतंत्र प्रस्ताव पाठवावा, जिल्ह्यातील नगरपरिषद व ग्रामपंचायत हद्दीतील स्ट्रीटलाईटबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करुन ३० आॅगस्टपर्यंत स्ट्रीटलाईटचा प्रश्न निकाली काढावा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. (प्रतिनिधी)