शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

कागदनिर्मिती उद्योग आणण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: August 15, 2016 00:13 IST

दीपक केसरकर : वेंगुर्ले प्रादेशिक फळसंशोधन केंद्राच्या सभागृहात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक

वेंगुर्ले : मनरेगाअंतर्गत बांबू लागवडीला भरपूर वाव आहे. बांबूपासून फर्निचर, तंबू, शोभेच्या वस्तू आदी निर्मितीला चांगली मागणी आहे. बांबूपासून कागद तयार करण्याची इंडस्ट्रीज जिल्ह्यात येवू शकते. पण अशा इंडस्ट्रीजपासून पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची शहानिशा करुनच असा प्रकल्प जिल्ह्यात आणण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिली. वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात जलयुक्त शिवार व मनरेगा योजनेंतर्गत होणाऱ्या कामांचे नियोजन व उपाययोजना आदींबाबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, चांदा ते बांदा योजना अधिकारी लिना बनसोडे, उपजिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, ज्ञानेश्वर खुटवड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी केसरकर म्हणाले, चांदा ते बांदा योजनेंतर्गत मनरेगाच्या मदतीने गोपालन, डेअरी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जाणार आहे. त्यासाठी मनरेगा व चांदा ते बांदा या योजनेच्या निधीचा चांगल्याप्रकारे उपयोग करता येणार आहे. यावेळी किनारपट्टी भागात नवाबाग-उभादांडा याठिकाणी पर्यटनासाठी तंबू उभारण्यात येणार असून एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्यासाठीचे स्पॉट आयडेंटीफाय करण्याच्या सूचना केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक तालुक्यात मनरेगाअंतर्गत वृक्षलागवड करतांना फळ पिकांच्या व फूलशेतीच्या लागवडीवर जास्त भर दिल्यास ते फायदेशीर ठरेल. त्यासाठी अशा झाडांची निश्चित करुन जांभूळ, कोकम, पेरु, फणस आदी झाडांंचा यामध्ये समावेश करुन त्यांच्या लागवडीबाबतचे प्रस्ताव मनरेगा विभागामार्फतच पाठवा. त्यातून विकासाला चालना मिळेल, असा विश्वास केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. वेंगुर्ले येथील जिल्हा समाजकल्याणच्या वसतीगृहात तातडीने सोयीसुविधा पुरविण्याकरिता स्वतंत्र प्रस्ताव पाठवावा, जिल्ह्यातील नगरपरिषद व ग्रामपंचायत हद्दीतील स्ट्रीटलाईटबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करुन ३० आॅगस्टपर्यंत स्ट्रीटलाईटचा प्रश्न निकाली काढावा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. (प्रतिनिधी)