शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूरसारखा प्रकल्प परवडणार नाही : वायकर

By admin | Updated: December 28, 2015 00:55 IST

कोकणात अनेक डोंगर आहेत, टेकड्या आहेत तेथे उत्तम रिवेरा होऊ शकतात, अशी शपथ दलवाई यांनी घेतली.

चिपळूण : जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाचे काही बरे वाईट झाले तर कोकण भस्मसात होईल. ऊर्जानिर्मिती ही कचऱ्यापासून समुद्राच्या लाटांपासून व लहान नद्यांमधूनही करता येते. त्यासाठी अणुऊर्जा प्रकल्पच कशासाठी हवा? जैतापूरला १० हजार मेगावॅट औष्णिक ऊर्जा तयार होईल. पैकी किती ऊर्जा कोकणासाठी वापरली जाईल, याचा विचार करा आणि जैतापूर प्रकल्पाला पाठिंबा द्या, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. दाभोळ खाडीतील कालुस्ते हद्दीत असलेल्या आयलँड पार्क या बेटावर रविवारी सकाळी ग्लोबल टुरिझम मल्टिपर्पज सोसायटीतर्फे आयोजित बॅकवॉटर फेस्टिवल व क्रोकोडाईल सफारीचा शुभारंभ पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते झाला. गोवळकोट धक्क्यावरून मान्यवरांसह पर्यटकांना बोटीने बेटावर नेण्यात आले. तेथे झांजपथकाच्या सहाय्याने स्वागत करण्यात आले. पालकमंत्री वायकर यांनी औपचारिक उद्घाटन केले. यावेळी खासदार हुसेन दलवाई, आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, तहसीलदार वृषाली पाटील, एमटीडीसीचे जगदीश चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आमदार बापू खेडेकर, सारस्वत बँकेचे व्यवस्थापक बर्वे, सरपंच अब्बास जबले, सरपंच सुहास बहुतुले, जानकी बेलोसे, उपनगराध्यक्ष कबीर काद्री, गटनेते राजू देवळेकर, नगरसेवक शशिकांत मोदी, महिला बालकल्याण सभापती आदिती देशपांडे, बांधकाम सभापती शिल्पा सप्रे, उपसभापती शिल्पा खापरे, पाणी पुरवठा सभापती रुक्सार अलवी, माजी नगराध्यक्षा हेमलता बुरटे, तालुकाप्रमुख सुधीर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. आर. सी. काळे ज्युनिअर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राम रेडीज, उपाध्यक्ष इब्राहिम दलवाई, सचिव संजय अणेराव, सुनील साळवी, शाहनवाज शाह, महेंद्र कासेकर, अलिम परकार, सज्जाद काद्री, व्यवस्थापक विश्वास पाटील, प्रेरणा लाड, राजेश पाथरे, समीर कोवळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष रेडीज यांनी गेली दोन वर्षे सातत्याने ग्लोबल टुरिझमच्या माध्यमातून पर्यटनाच्या वाढीसाठी होत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. त्यानंतर नगराध्यक्षा सावित्री होमकळस, जानकी बेलोसे, सचिन कदम, माजी आमदार बापू खेडेकर, आमदार सदानंद चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. खासदार हुसेन दलवाई यांनी पर्यावरणपूरक पर्यटन विकास होणे गरजेचे आहे. आपण रिवेरासाठी फ्रान्समध्ये व इतर ठिकाणी जातो. परंतु, कोकणात अनेक डोंगर आहेत, टेकड्या आहेत तेथे उत्तम रिवेरा होऊ शकतात, अशी शपथ दलवाई यांनी घेतली. (प्रतिनिधी)किल्ले विकासासाठी आराखडा तयारकिल्ल्यांच्या विकासासाठी व पर्यटनासाठी आपण ६७० कोटीचा आराखडा केला आहे. त्यामध्ये गोवळकोट किल्ल्याचा समावेश आहे. प्रत्येक किल्ल्याला १ कोटी रुपये देणार आहोत. परंतु, त्यासाठी स्थानिक पातळीवर एनओसी मिळविणे गरजेचे आहे. केवळ विकासाच्या गप्पा मारण्यापेक्षा तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत तरच विकास शक्य आहे असे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी स्पष्ट केले. परशुराम ते गोवळकोट दरम्यान रोपवेसाठी कन्सल्टंट विवेक साल्येकर काम पाहात आहेत. लवकरच त्याचा प्रस्ताव आपल्याकडे येईल आणि त्या मंजुरीसाठी आपण प्रयत्न करु. चिपळूण शहरासाठी ६ सिमेंट रोडचा २९.७९ कोटीचा प्रस्ताव आपल्याकडे आला असल्याचे ते म्हणाले.