शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात नारळाची उत्पादनक्षमता कमी

By admin | Updated: September 4, 2016 00:37 IST

तपस भट्टाचार्य : नारळ बागायतदार, उद्योजकांचा मेळावा

रत्नागिरी : अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नारळाचे उत्पादन क्षेत्र जास्त आहे. मात्र, आपल्याकडे उत्पादन क्षमता कमी असून, याचा गांभीर्याने विचार नारळ उत्पादकांनी करणे आवश्यक आहे. नारळ पिकाबाबत विद्यापीठातर्फे संशोधन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी केले.प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये व श्रीफळ उत्पादक हितवर्धक संघ, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक नारळ दिनानिमित्त नारळ बागायदार व उद्योजकांचा मेळावा अल्पबचत सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. भट्टाचार्य बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, केरळचे तज्ज्ञ महेश्वरम् अप्पा, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, नारळ बोर्डाचे उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये, नारळ बागायतदार संघाचे अध्यक्ष अनिल जोशी, अभिजीत हेगशेट्ये, नाझीम पडवेकर उपस्थित होते.डॉ. भट्टाचार्य यांनी नारळाचे उत्पादन क्षेत्र मोठे असतानाही यातून मिळणाऱ्या कमी उत्पन्नाचे कारण शोधणे महत्वाचे असल्याचे यावेळी सांगितले. केरळ येथील तज्ज्ञ महेश्वर अप्पा यांनी महाराष्ट्र आणि केरळ राज्यांमधील नारळ उत्पादनाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी सांगितले की, नारळाला केवळ पावसाचे पाणी पुरेसे असल्याचा गैरसमज येथील बागायदारांमध्ये आहे. मात्र, नारळाला दररोज पाण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप यांनी सांगितले की, नारळ पिकाच्या वाढीव उत्पादनासाठी येथील बागायदारांना मार्गदर्शनाची गरज असून, या मार्गदर्शनामुळे यातील काही तांत्रिक बाबी येथील बागायदारांना कळतील, असा विश्वास व्यक्त केला. बारीक-बारीक गोष्टी समजून घेऊन नारळ पीक व उत्पादनाच्या विकासाकडे वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)