शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर कुपोषणाचे संकट कायम

By admin | Updated: June 8, 2014 01:14 IST

कोट्यवधींचा खर्च वाया : कुपोषणमुक्तीसाठी दहा वर्षे प्रयत्न

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुपोषण मुक्तीसाठी गेल्या दहा वर्षात कोट्यवधी रुपये खर्चूनही जिल्ह्यातील कुपोषणाचे संकट दूर झालेले नाही. अद्यापही जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची ७६७ तर कमी वजनाची ४८९९ एवढी मुले असल्याचे एप्रिल अखेरच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या दहा वर्षात कुपोषण मुक्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागामार्फत कुपोषण मुक्तीसाठी दरवर्षीच्या अर्थसंकल्पात लाखो रुपयांची तरतूद करण्यात येते. विशेष बाल उपचार केंद्र तसेच अन्य उपक्रम राबवून कुपोषण दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी अद्यापही कुपोषणाच्या विळख्यातून जिल्हा सावरलेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एप्रिल अखेर अहवालानुसार ४८९४४ एवढी ० ते ६ वयोगटातील मुले आहेत. त्यापैकी ४८६९८ मुलांचे वजन घेतले असता कमी वजनाची ४८९९ एवढी तर ७६७ तीव्र कमी वजनाची मुले आढळली आहेत. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात कुपोषित मुलामुलींसाठी तसेच गरोदर महिला व स्तनदा मातांसाठी अतिरिक्त आहारावर तब्बल १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीमध्ये जिल्हा कुपोषणमुक्त व्हावा याबाबत केवळ चर्चा होते. कुपोषित मुले दत्तक घेण्याच्या घोषणाही अनेकवेळा झाल्या. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही मात्र झालेली दिसून येत नाही. जिल्ह्यातील कुपोषण दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असले तरी संबंधित पालक आणि लोकप्रतिनिधी यांचेही सहकार्य तेवढेच महत्वाचे आहे. केवळ निधी खर्चून कुपोषण दूर होणार काय? असा प्रश्न आहे. कुपोषित मुलांना देण्यात येणारा आहार दर्जेदार आहे का? योग्यप्रकारे त्याच पुरवठा होतो का? पुरविण्यात आलेला पोषण आहार ती मुले तसेच गरोदर महिला, स्तनदा माता खातात का? हा संशोधनाचा प्रश्न आहे. अंगणवाड्यांमधून विविध जातीचे कडधान्य तसेच अन्य पौष्टिक खाद्य पुरविले जाते. त्यामध्ये जीवनावश्यक घटकांचा समावेश आहे का? आणि पुरविण्यात येणाऱ्या आहारातून आवश्यक जीवनसत्व मिळते का याचे संशोधनही होणे गरजेचे आहे. केवळ निधी खर्चासाठी उपक्रम राबवून कुपोषण दूर होणार नाही. अंडी, केळी, दूध, टॉनिक आदींचा पोषण आहारामध्ये समावेश होणे आवश्यक आहे. शेंगदाणा लाडू, भुकटीचे लाडू, उकडलेले कडधान्य देऊन मुलांच्या वजनात भर पडणार नाही तर मुलांचे वजन वाढण्याच्या दृष्टीने देण्यात येणाऱ्या आहारात आवश्यक तो बदल करणे गरजेचे आहे. अन्यथा कुपोषणाच्या संकटातून सिंधुदुर्ग जिल्हा बाहेर येण्यासाठी आणखी अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)