शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

‘तेरेखोल’मधील बंधाऱ्याने अडचण

By admin | Updated: June 5, 2015 00:30 IST

शेतकरी हवालदिल : पावसाळ्यात पुराचे पाणी घुसणार

ओटवणे : तेरेखोल नदीपात्रात इन्सुली बिलेवाडी दरम्यान उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे स्थानिक विलवडे गावातील शेतकऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.इन्सुली-वाफोली-चराठे-माजगाव, आदी गावांच्या नळयोजना उन्हाळ्यात सुस्थितीत कार्यरत रहाव्यात यासाठी तेरेखोल नदीपात्रात इन्सुली-बिलेवाडी दरम्यान काही वर्षापूर्वी बंधारा उभारण्यात आला होता. या बंधाऱ्यामुळे त्या ठिकाणी पाणी अडविले जाते आणि नळयोजनेमार्फत सुरळीत पाणीपुरवठा केला जातो.मात्र, या उभारलेल्या बंधाऱ्यामुळे त्यामागील विलवडे शेतकऱ्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात वरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा लोंढा या बंधाऱ्यामुळे अडविला जातो. आणि हे पाणी जवळच असलेल्या स्थानिक विलवडे शेतकऱ्यांच्या बागांमध्ये पुराप्रमाणे घुसत आहे. यामुळे नदीकिनारचे मातीचे बंधारे तर उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच केळी, माड, पोफळीच्या बागा तसेच भाजीपाल्याची पिकेसुद्धा दरवर्षी पावसामध्ये मातीत मिळून वाहून जातात. केळी, माड, पोफळी अक्षरश: कोलमडून पडून मोठी नुकसानीही गतवर्षी शेतकऱ्यांची झालेली आहे. (वार्ताहर)