शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा : नांदगावकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 12:37 IST

मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराला आपण सर्वांनी बळ देणे गरजेचे आहे. शासन सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. त्यामुळे मनसैनिकानी जनतेच्या मनात शासन विरोधातील नाराजी पोहचवली पाहिजे. वेळप्रसंगी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी कार्यकर्त्यानी ठेवावी, असे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले.

ठळक मुद्देजनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा : नांदगावकर वागदे येथे मनसेच्या मेळाव्यात बाळा नांदगावकर यांचे आवाहन  

कणकवली: मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराला आपण सर्वांनी बळ देणे गरजेचे आहे. शासन सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. त्यामुळे मनसैनिकानी जनतेच्या मनात शासन विरोधातील नाराजी पोहचवली पाहिजे. वेळप्रसंगी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी कार्यकर्त्यानी ठेवावी, असे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले.वागदे येथील एन.के. मंगल कार्यालयात रविवारी मनसेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मनसे नेते शिरीष सावंत, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर , राज्य उपाध्यक्ष सत्यवान दळवी, महिला आघाडी उपाध्यक्षा स्नेहल जाधव, अनिषा माजगावकर , जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, धीरज परब, चैताली भेंडे आदी उपस्थित होते.बाळा नांदगावकर म्हणाले, राज ठाकरे यांनी सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाची उभारणी केली .जनतेची कामे आताच्या शासनाकडून होत नसल्याने जनतेच्या मनात चीड आहे. अशावेळी मनसेकडे आशेने पाहिले जाते. याचा विचार करा आणि कामाला लागा.परशुराम उपरकर म्हणाले, राज्य व केंद्र शासनाने जनतेची घोर निराशा केली आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेले युती शासन आता पुन्हा युती करून जनतेसमोर निवडणुकीच्या माध्यमातून येणार आहेत. मात्र, जनता त्याना थारा देणार नाही. जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहेत. आतापर्यंत मनसेने त्यांच्यावर वचक ठेवला आहे. परंतु जनतेने मतदानाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्याना त्यांचे अपयश दाखवून द्यावे.सत्यवान दळवी म्हणाले , महाराष्ट्रात रस्ते टोलमुक्त हवेत. अशी मागणी सर्वात प्रथम राज ठाकरे यांनी केली. मात्र, कोकणात होत असलेल्या महामार्गावर टोल नाके उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे मनसैनिकानी आम्ही टोल भरणार नाही.अशी भूमिका घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. आम्ही काम धंद्यानिमित्त मुंबईत असलो तरी कोकणवासीयांच्या प्रश्नासाठी कायमच तुमच्या सोबत आहोत.असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यानी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजन दाभोलकर यांनी केले. 

टॅग्स :MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्ग