शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा-बाळा नांदगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 20:41 IST

मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराला आपण सर्वांनी बळ देणे गरजेचे आहे. शासन सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देवागदे येथे मनसेचा मेळावा

कणकवली: मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराला आपण सर्वांनी बळ देणे गरजेचे आहे. शासन सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. त्यामुळे मनसैनिकानी जनतेच्या मनात शासन विरोधातील नाराजी पोहचवली पाहिजे. वेळप्रसंगी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी कार्यकर्त्यानी ठेवावी. असे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले.वागदे येथील एन.के. मंगल कार्यालयात रविवारी मनसेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मनसे नेते शिरीष सावंत, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर , राज्य उपाध्यक्ष सत्यवान दळवी, महिला आघाडी उपाध्यक्षा स्नेहल जाधव, अनिषा माजगावकर , जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, धीरज परब, चैताली भेंडे आदी उपस्थित होते.बाळा नांदगावकर म्हणाले, राज ठाकरे यांनी सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाची उभारणी केली .जनतेची कामे आताच्या शासनाकडून होत नसल्याने जनतेच्या मनात चीड आहे. अशावेळी मनसेकडे आशेने पाहिले जाते. याचा विचार करा आणि कामाला लागा.परशुराम उपरकर म्हणाले, राज्य व केंद्र शासनाने जनतेची घोर निराशा केली आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेले युती शासन आता पुन्हा युती करून जनतेसमोर निवडणुकीच्या माध्यमातून येणार आहेत. मात्र, जनता त्याना थारा देणार नाही. जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहेत. आतापर्यंत मनसेने त्यांच्यावर वचक ठेवला आहे. परंतु जनतेने मतदानाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्याना त्यांचे अपयश दाखवून द्यावे.सत्यवान दळवी म्हणाले , महाराष्ट्रात रस्ते टोलमुक्त हवेत. अशी मागणी सर्वात प्रथम राज ठाकरे यांनी केली. मात्र, कोकणात होत असलेल्या महामार्गावर टोल नाके उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे मनसैनिकानी आम्ही टोल भरणार नाही.अशी भूमिका घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. आम्ही काम धंद्यानिमित्त मुंबईत असलो तरी कोकणवासीयांच्या प्रश्नासाठी कायमच तुमच्या सोबत आहोत.असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यानी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजन दाभोलकर यांनी केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBala Nandgaonkarबाळा नांदगावकर