शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दर्याला श्रीफळ अर्पण करून मच्छिमार सज्ज

By admin | Updated: August 30, 2015 00:28 IST

सिंधुदुर्गात नारळी पौर्णिमा उत्साहात

मालवण : मालवण, देवगड, वेंगुर्ले किनारपट्टींसह जिल्ह्यात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले सिंधुदुर्गावरून दर्याला मानाचा श्रीफळ अर्पण झाल्यानंतर मालवण बंदरजेटी येथे शहरातील मच्छिमार, व्यापारी आणि नागरिकांनी सागराला श्रीफळ अर्पण केले. सावंतवाडी येथे ऐतिहासिक मोती तलावात, कुडाळ येथे भंगसाळ नदीत रिक्षा संघटनेने, कणकवली येथे गड नदीत पोलीस ठाण्याच्यावतीने श्रीफळ अर्पण करण्यात आले. मच्छिमार बांधवांनी दर्या राजाची पूजा करीत यावर्षी ‘मस्त्य हंगामात बरकत दे’, असे साकडे घातले. नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून शनिवारी दुपारी व्यापारी संघाच्यावतीने बाजारपेठेतील हनुमान मंदिरात श्रीफळ ठेवून मालवणच्या भरभराटीसाठी साकडे घालण्यात आले. त्यानंतर व्यापारी संघाचा ‘नारळ’ ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने हनुमान मंदिर ते बंदर जेटी येथे आणण्यात आला. या मिरवणुकीत मच्छिमार महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर श्रीफळ व कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. सायंकाळी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील रहिवाशांनी सोन्याचा मुलामा लावलेले श्रीफळ समुद्राला अर्पण केले. त्यानंतर मालवण व्यापारी संघाच्यावतीने श्रीफळाची विधिवत पूजा करून व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी सागराला श्रीफळ अर्पण केले. मालवणवासीयांनीही समुद्रात श्रीफळ अर्पण केले. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, मालवणचे पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे, भाई गोवेकर, नंदू गवंडी, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, बाळू अंधारी, नाना पारकर, स्वप्नाली नेरुरकर, लायन्स, लायनेस, रोटरी क्लब सदस्य, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवण, मालवणातील मच्छिमार बांधव, व्यापारी बंधू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी) मच्छिमारबांधव मासेमारीसाठी सज्ज मासेमारी ही किनारपट्टीच्या अर्थकारणाचा कणा आहे. नारळी पौर्णिमेपासून नव्या मासेमारी हंगामास सुरुवात करताना, बोटी समुद्रात लोटताना मच्छिमारबांधव दर्यास श्रीफळ अर्पण करून बरकतीची मागणी करतो. शासनाच्या नियमानुसार पूर्वी १० जून ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमा हा मासेमारी बंदीचा कालावधी असायचा. मात्र, यावर्षी १ जून ते ३१ जुलै हा दोन महिन्यांचा कालावधी मासेमारी बंदीचा होता. त्यामुळे मासेमारी हंगाम १ आॅगस्ट पासून सुरू झाला असला, तरी बहुतांश मच्छिमारबांधव नारळी पौर्णिमेनंतरच नव्या मासेमारी हंगामास सुरुवात करणार आहेत. कबड्डी स्पर्धेचे आकर्षण नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून लायन्स व लायनेस क्लब यांच्यावतीने आयोजित महिला व पुरुष गटातील जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांचे खास आकर्षण ठरले. वीज वितरण व भाजप यांच्यावतीने नागरिकांना अल्प दारात एलईडी बल्बची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, भाऊ सामंत, विजू केनवडेकर, गणेश कुशे, दादा वाघ, आपा लुडबे व अन्य उपस्थित होते. तसेच शिवसेनेच्यावतीने मालवणवासियांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. नारळ लढविण्यासाठी युवकांची गर्दी आजही नारळी पौर्णिमा उत्सवात बंदरजेटी येथे विविध ठिकाणांहून आणलेले नारळ लढविले जात होते. नारळ लढविण्याबरोबरच नारळी पौर्णिमा उत्सवाचा आनंद युवावर्गासह आबाल वृद्ध, महिला उपस्थित राहून लुटत होते. बंदर जेटीवर त्यामुळे भरगच्च गर्दी अनुभवता आली. मात्र, नारळाच्या किमतीत वाढ झाल्याने नारळी पौर्णिमेपूर्वी महिनाभर आधी नारळाच्या राशी टाकून नारळ लढविण्यात घट झाल्याचे प्रकर्षाने दिसून आले. (प्रतिनिधी)