शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी अलर्ट राहावे!, कणकवलीत मान्सूनपूर्व नियोजन बैठक

By सुधीर राणे | Updated: May 9, 2023 13:15 IST

ज्या यंत्रणा त्यांची जबाबदारी असताना व एक दोनवेळा सांगूनही उपस्थित राहत नसतील, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा

कणकवली: लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. नैसर्गिक आपत्तीत अॅपद्वारे पंचनामे करण्याच्या शासनाच्या सूचना असून त्यानुसार कार्यवाही होईल. संबंधित विभागांनी यासाठी अलर्ट असण्याची गरज आहे. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कालावधीत मुख्यालयात राहणे बंधनकारक असल्याची माहिती प्रांताधिकारी जगदिश कातकर यांनी बैठकीत दिली. तसेच अधिकाऱ्यांना विविध सूचनाही केल्या.कणकवली तहसील कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार आर. जे. पवार, पोलिस निरीक्षक अनिल जाधव, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे, निवासी नायब तहसीलदार शिवाजी राठोड आदी अधिकारी उपस्थित होते.प्रांताधिकारी कातकर म्हणाले, प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची गरज आहे. तसेच तालुकास्तरीय आपत्ती निवारण कक्ष तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात येणार आहे. पर्जन्यमानाची सद्यस्थितीत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी होत आहे. तसेच याच दरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. यावर्षी पाऊस लवकर येण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून त्यानुसार सर्वांनी सतर्क रहावे.पूर, दरडीमुळे स्थलांतर करण्याची गरज निर्माण होण्याची शक्यता आहे. अशी ठिकाणे निश्चित करून त्यासाठीची पर्यायी व्यवस्था असावी. पर्यायी व्यवस्थेच्या ठिकाणी वीज, पाणी, स्वच्छतागृह असावे. नगरपंचायत स्तरावरही मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करण्यात यावे. शहरातील गटारांची साफसफाई करण्यात यावी. झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्याचे नियोजन  करावे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटरस्त्यांमध्ये दरडी कोसळणे व इतर रस्त्यांवर काही समस्या निर्माण झाल्यास यंत्रणा अलर्ट ठेवावी. महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. ग्रामपंचायत स्तरावर आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. टीसीएल पावडरबाबत दक्षता घ्यावी. शासकीय दवाखान्यांमध्ये औषधसाठा उपलब्ध ठेवावा. पोलिस विभागाने या कालावधीत अलर्ट असण्याची गरज आहे. तालुकास्तरीय पथके तयार करावीत, आदी सूचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या.अतिवृष्टीच्या कालावधीत शाळेत जाणाऱ्या मुलांच्या ज्या मार्गावर पाणी येते तेथे आवश्यक ती काळजी घेण्यात यावी. तसेच मोरी, रस्त्यांवर पाणी असताना वाहने घालू नयेत, याबाबत दक्षतेसाठी अलर्ट रहावे, असे स्पष्ट करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही अलर्ट राहण्याबाबातच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. दुरुस्ती आवश्यक असलेल्या शाळांबाबतही कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. ज्या यंत्रणा त्यांची जबाबदारी असताना व एक दोनवेळा सांगूनही उपस्थित राहत नसतील, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असा इशाराही  दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस