शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी अलर्ट राहावे!, कणकवलीत मान्सूनपूर्व नियोजन बैठक

By सुधीर राणे | Updated: May 9, 2023 13:15 IST

ज्या यंत्रणा त्यांची जबाबदारी असताना व एक दोनवेळा सांगूनही उपस्थित राहत नसतील, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा

कणकवली: लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. नैसर्गिक आपत्तीत अॅपद्वारे पंचनामे करण्याच्या शासनाच्या सूचना असून त्यानुसार कार्यवाही होईल. संबंधित विभागांनी यासाठी अलर्ट असण्याची गरज आहे. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कालावधीत मुख्यालयात राहणे बंधनकारक असल्याची माहिती प्रांताधिकारी जगदिश कातकर यांनी बैठकीत दिली. तसेच अधिकाऱ्यांना विविध सूचनाही केल्या.कणकवली तहसील कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार आर. जे. पवार, पोलिस निरीक्षक अनिल जाधव, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे, निवासी नायब तहसीलदार शिवाजी राठोड आदी अधिकारी उपस्थित होते.प्रांताधिकारी कातकर म्हणाले, प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची गरज आहे. तसेच तालुकास्तरीय आपत्ती निवारण कक्ष तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात येणार आहे. पर्जन्यमानाची सद्यस्थितीत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी होत आहे. तसेच याच दरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. यावर्षी पाऊस लवकर येण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून त्यानुसार सर्वांनी सतर्क रहावे.पूर, दरडीमुळे स्थलांतर करण्याची गरज निर्माण होण्याची शक्यता आहे. अशी ठिकाणे निश्चित करून त्यासाठीची पर्यायी व्यवस्था असावी. पर्यायी व्यवस्थेच्या ठिकाणी वीज, पाणी, स्वच्छतागृह असावे. नगरपंचायत स्तरावरही मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करण्यात यावे. शहरातील गटारांची साफसफाई करण्यात यावी. झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्याचे नियोजन  करावे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटरस्त्यांमध्ये दरडी कोसळणे व इतर रस्त्यांवर काही समस्या निर्माण झाल्यास यंत्रणा अलर्ट ठेवावी. महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. ग्रामपंचायत स्तरावर आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. टीसीएल पावडरबाबत दक्षता घ्यावी. शासकीय दवाखान्यांमध्ये औषधसाठा उपलब्ध ठेवावा. पोलिस विभागाने या कालावधीत अलर्ट असण्याची गरज आहे. तालुकास्तरीय पथके तयार करावीत, आदी सूचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या.अतिवृष्टीच्या कालावधीत शाळेत जाणाऱ्या मुलांच्या ज्या मार्गावर पाणी येते तेथे आवश्यक ती काळजी घेण्यात यावी. तसेच मोरी, रस्त्यांवर पाणी असताना वाहने घालू नयेत, याबाबत दक्षतेसाठी अलर्ट रहावे, असे स्पष्ट करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही अलर्ट राहण्याबाबातच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. दुरुस्ती आवश्यक असलेल्या शाळांबाबतही कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. ज्या यंत्रणा त्यांची जबाबदारी असताना व एक दोनवेळा सांगूनही उपस्थित राहत नसतील, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असा इशाराही  दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस