शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
3
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
4
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
5
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
6
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
7
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
8
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
9
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
10
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
11
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
12
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
13
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
14
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
15
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
16
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
17
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
18
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
19
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
20
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत ! : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:23 IST

pratap sarnaik, narayanrane, sindhudurg, shivsena शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत . कणकवली येथे दौऱ्यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री भाजप खासदार नारायण राणे यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत , असा टोला त्यांनी लगावला आहे.

ठळक मुद्दे प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत ! : नारायण राणे ईडीच्या छापे, राणे यांची प्रतिक्रिया देण्यास नकार

कणकवली : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत . कणकवली येथे दौऱ्यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री भाजप खासदार नारायण राणे यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत , असा टोला त्यांनी लगावला आहे.नारायण राणे यांच्या ' जन संवाद ' कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी कणकवली येथील संपर्क कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, कायदेशीर गोष्टींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते . ईडी , सीबीआय , कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचे नसते .

प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत . तुम्ही आधी त्यांची माहिती घ्यावी . ईडीचा छापा पडला , हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा , मग आम्ही प्रतिक्रिया देऊ ह्व असे नारायण राणे यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले .

हे तर मातोश्रीच्या पिंजऱ्यातले सरकार आहे ! : नारायण राणे यांची टीकासिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, त्यावर मात करण्यासाठी कोणतीही परिणामकारक व्यवस्था नसल्याने मृत्यू होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येतही वाढ होत आहे. याला जबाबदार ठाकरे सरकार आहे. हे सरकार कोणाची देणी तसेच मानधनही देत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असून हे फक्त मातोश्रीच्या पिंजऱ्यातले सरकार आहे. अशी टीका माजी मुख्यमंत्री, भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी केली आहे.कणकवली येथील संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले , जिल्हा नियोजन सभेत झालेल्या निर्णयानंतर परस्पर कामे बदलणे हा पालकमंत्री यांचा अधिकार नाही. पालकमंत्री हा फक्त त्या सभेचा अध्यक्ष असतो. कामे बदलायची असतील तर मतदान घ्यावे लागते. त्यावेळी बहुसंख्येने ठराव मंजूर झाल्यास ते काम जिल्हा नियोजन मधून घ्यायचे असते.मात्र, ते न करता सभा संपल्यानंतर परस्पर कामे बदलून आपल्या पक्षातील लोकांची कामे करायची, हे नको ते उद्योग पालकमंत्री करत आहेत. हे योग्य नव्हे.        सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत. औषधे तसेच डॉक्टर नाहीत. इतर सुविधांची वानवा आहे. राज्यातही अशीच स्थिती आहे. त्यामुळे जर कोरोनामुळे जिल्ह्यासह राज्यात कोणाचा मृत्यू झाला. तर त्याला जबाबदार हे ठाकरे सरकारच आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाच्या आणि आरोग्याच्याबाबतीत दयनीय अवस्था झाली आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही बाब आपण तुमच्यासमोर मांडत आहे.ठाकरे सरकार हे फक्त कर्ज माफी बाबत बोलत आहे. मात्र, त्याबाबत काहीच ठोस असे झालेले नाही. हे सरकार कोणाची देणी व मानधन देत नाही . मुख्यमंत्री मातोश्री बाहेर पडत नाहीत. तसेच कोणताही लोकोपयोगी आदेश किंवा निर्णय सरकार घेत नसल्याचा आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला.सरकारच जबाबदार राहील !शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक , संबंधित कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्या झाल्या पाहिजेत. त्या न करता शाळा सुरू केल्या आणि जर उद्या काही झाले तर त्याला सरकारच जबाबदार असेल.असे राणे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकNarayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना