शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत ! : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:23 IST

pratap sarnaik, narayanrane, sindhudurg, shivsena शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत . कणकवली येथे दौऱ्यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री भाजप खासदार नारायण राणे यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत , असा टोला त्यांनी लगावला आहे.

ठळक मुद्दे प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत ! : नारायण राणे ईडीच्या छापे, राणे यांची प्रतिक्रिया देण्यास नकार

कणकवली : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत . कणकवली येथे दौऱ्यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री भाजप खासदार नारायण राणे यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत , असा टोला त्यांनी लगावला आहे.नारायण राणे यांच्या ' जन संवाद ' कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी कणकवली येथील संपर्क कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, कायदेशीर गोष्टींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते . ईडी , सीबीआय , कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचे नसते .

प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत . तुम्ही आधी त्यांची माहिती घ्यावी . ईडीचा छापा पडला , हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा , मग आम्ही प्रतिक्रिया देऊ ह्व असे नारायण राणे यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले .

हे तर मातोश्रीच्या पिंजऱ्यातले सरकार आहे ! : नारायण राणे यांची टीकासिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, त्यावर मात करण्यासाठी कोणतीही परिणामकारक व्यवस्था नसल्याने मृत्यू होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येतही वाढ होत आहे. याला जबाबदार ठाकरे सरकार आहे. हे सरकार कोणाची देणी तसेच मानधनही देत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असून हे फक्त मातोश्रीच्या पिंजऱ्यातले सरकार आहे. अशी टीका माजी मुख्यमंत्री, भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी केली आहे.कणकवली येथील संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले , जिल्हा नियोजन सभेत झालेल्या निर्णयानंतर परस्पर कामे बदलणे हा पालकमंत्री यांचा अधिकार नाही. पालकमंत्री हा फक्त त्या सभेचा अध्यक्ष असतो. कामे बदलायची असतील तर मतदान घ्यावे लागते. त्यावेळी बहुसंख्येने ठराव मंजूर झाल्यास ते काम जिल्हा नियोजन मधून घ्यायचे असते.मात्र, ते न करता सभा संपल्यानंतर परस्पर कामे बदलून आपल्या पक्षातील लोकांची कामे करायची, हे नको ते उद्योग पालकमंत्री करत आहेत. हे योग्य नव्हे.        सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत. औषधे तसेच डॉक्टर नाहीत. इतर सुविधांची वानवा आहे. राज्यातही अशीच स्थिती आहे. त्यामुळे जर कोरोनामुळे जिल्ह्यासह राज्यात कोणाचा मृत्यू झाला. तर त्याला जबाबदार हे ठाकरे सरकारच आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाच्या आणि आरोग्याच्याबाबतीत दयनीय अवस्था झाली आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही बाब आपण तुमच्यासमोर मांडत आहे.ठाकरे सरकार हे फक्त कर्ज माफी बाबत बोलत आहे. मात्र, त्याबाबत काहीच ठोस असे झालेले नाही. हे सरकार कोणाची देणी व मानधन देत नाही . मुख्यमंत्री मातोश्री बाहेर पडत नाहीत. तसेच कोणताही लोकोपयोगी आदेश किंवा निर्णय सरकार घेत नसल्याचा आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला.सरकारच जबाबदार राहील !शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक , संबंधित कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्या झाल्या पाहिजेत. त्या न करता शाळा सुरू केल्या आणि जर उद्या काही झाले तर त्याला सरकारच जबाबदार असेल.असे राणे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकNarayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना