शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

ं‘अंनिस’ फरार मारेकºयांची पोस्टर्स लावणार : सुशीला मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कवैभववाडी : राज्य शासन दाभोलकर, पानसरे खुनाच्या तपासात अक्षम्य दिरंगाई करीत असल्याने विवेकवादी लोकांना धोका कायम आहे, असा आरोप करीत या प्रकरणातील संशयित फरार आरोपी सारंग अकोळकर व विनय पवार यांची ‘अंनिस’तर्फे राज्यभर पोस्टर्स लावली जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रधान सचिव सुशीला मुंडे यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कवैभववाडी : राज्य शासन दाभोलकर, पानसरे खुनाच्या तपासात अक्षम्य दिरंगाई करीत असल्याने विवेकवादी लोकांना धोका कायम आहे, असा आरोप करीत या प्रकरणातील संशयित फरार आरोपी सारंग अकोळकर व विनय पवार यांची ‘अंनिस’तर्फे राज्यभर पोस्टर्स लावली जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रधान सचिव सुशीला मुंडे यांनी वैभववाडी येथे पत्रकार परिषदेत दिली. विचारांचा लढा विचारांनी लढवा; त्यासाठी खून पाडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या संशयित मारेकºयांना पकडण्यात शासन दिरंगाई करीत आहे; त्यामुळेच पकडलेला संशयित आरोपी जामिनावर सुटला आहे. यासंबंधीचे प्रसिद्धीपत्रक देऊन मुंडे यांनी अंनिसची नेमकी भूमिका मांडली. यावेळी मच्छींद्रनाथ मुंडे, डॉ. शामकांत जाधव, किरण जाधव, प्रा. एस. एन. पाटील उपस्थित होते.सुशीला मुंडे पुढे म्हणाल्या की, डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला २० आॅगस्ट रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत, परंतु त्यांचे मारेकरी आजही मोकाट आहेत. ते वेळीच शोधून कारवाई केली असती तर कॉ. पानसरे व कर्नाटकातील प्रा. कलबुर्गी या दोन विवेकवादी व्यक्तींचा खून झालाच नसता, याची आम्हाला खात्री आहे. डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे खुनाच्या तपासातील दिरंगाईमुळे महाराष्ट्र पोलिसांचे हसे झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्ही वारंवार भेट घेतली. समितीने अनेक निवेदने दिली, परंतु संशयित आरोपींना पकडण्यासाठी राज्य किंवा केंद्र शासन पुरेसे प्रयत्न करताना दिसत नाही.कॉ. पानसरे खुनाच्या संथगती तपासाचा फायदा घेऊन या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडला जामीन मिळाला. त्यामुळे तोही फरार होण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने त्याच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात तातडीने अर्ज करायला हवा होता. तशी मागणीही अंनिसने मुख्यमंत्र्यांकडे केली होती, परंतु राज्य सरकारने त्याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही. सनातन संस्थेचे साधक व खुनातील संशयित आरोपी सारंग अकोळकर व विनय पवार यांच्यापासून विवेकवादी लोकांना धोका असल्याने सीबीआयने त्यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे, परंतु राज्य सरकारने कॉ. पानसरे खूनप्रकरणी त्या दोघा संशयितांवर अद्याप बक्षीस जाहीर केलेले नाही किंवा त्यांना फरार घोषित करून त्यांच्या संपत्तीची जप्तीही केलेली नाही.