शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

ग्रामविकासात सकारात्मक भूमिका आवश्यक  : अतुल रावराणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:52 IST

निवडणुकीपुरते राजकारण असते. त्यानंतर गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने सकारात्मक भूमिका ठेवणे आवश्यक आहे. आपल्या गावाला शासनाकडून अधिकाधिक निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तरच गावाचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो, असे मत शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी गडमठ येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देग्रामविकासात सकारात्मक भूमिका आवश्यक  : अतुल रावराणेस्वखर्चाने सभामंडपाची उभारणी, सभामंडपाचे लोकार्पण

वैभववाडी : निवडणुकीपुरते राजकारण असते. त्यानंतर गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने सकारात्मक भूमिका ठेवणे आवश्यक आहे. आपल्या गावाला शासनाकडून अधिकाधिक निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तरच गावाचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो, असे मत शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी गडमठ येथे व्यक्त केले.गडमठ येथील गांगेश्वर मंदिरालगत भैरीभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अतुल रावराणे यांनी स्वखर्चाने सभामंडपाची उभारणी केली असून या सभामंडपाचे लोकार्पण रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण रावराणे, दीपक पाचकुडे, महेश रावराणे, रामचंद्र सुतार, उन्नती पावले, विकास मठकर, पप्पू दळवी आदी उपस्थित होते.रावराणे म्हणाले, ग्रामविकासाला चालना देण्यासाठी गावातील एकोपा महत्त्वाचा असतो. ही एकजूट ठेवण्याचे काम गावच्या ग्रामदैवतांच्या माध्यमातून शक्य होते. एकीच्या बळावरच शासनाकडून अधिकाधिक विकासनिधी गावात कसा आणता येईल? हे सकारात्मक धोरण प्रत्येकाने जपणे आवश्यक आहे. अध्यात्म ही आपली संस्कृती आहे. ती टिकविण्यावर आपला भर असणे आवश्यक आहे.त्याचबरोबर पुढच्या पिढीला चांगले शिक्षण गावातच कशा पध्दतीने उपलब्ध करून देता येईल? याचाही विचार आपण केला पाहिजे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना गावातच संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रावराणे यांच्यासह इतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन गावाच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्ग