शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कसाल-मालवण राज्य मार्गाची खड्ड्यांनी चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 12:36 IST

kasalmalvan, road, pwd, sindhudurgnews कसाल-मालवण राज्य मार्गाची खड्ड्यांनी पूर्णपणे चाळण झाली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये या रस्त्याची डागडुजी करण्याकरिता जिल्हा नियोजनमधून पालकमंत्र्यांनी ४ कोटी रुपये निधी दिला होता. यातून या रस्त्यावर फक्त मलमपट्टी करण्यात आली होती. ते पैसे नेमके कुठे गेले? असा सवाल वाहनचालकांतून विचारला जात आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना तर रस्ता कोठे आहे हे सापडत नाही एवढे खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देकसाल-मालवण राज्य मार्गाची खड्ड्यांनी चाळण वाहनचालक रस्ता शोधताहेत : सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देईल का ॽ

ओरोस : कसाल-मालवण राज्य मार्गाची खड्ड्यांनी पूर्णपणे चाळण झाली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये या रस्त्याची डागडुजी करण्याकरिता जिल्हा नियोजनमधून पालकमंत्र्यांनी ४ कोटी रुपये निधी दिला होता. यातून या रस्त्यावर फक्त मलमपट्टी करण्यात आली होती. ते पैसे नेमके कुठे गेले? असा सवाल वाहनचालकांतून विचारला जात आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना तर रस्ता कोठे आहे हे सापडत नाही एवढे खड्डे पडले आहेत.या रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकीस्वारांच्या मागे बसलेल्या व्यक्ती या खड्ड्यांत पडून अपघातही झाले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. कसाल-मालवण हा राज्य महामार्ग आंगणेवाडीच्या यात्रेच्या निमित्ताने डांबरीकरण केला जाईल, असे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नियोजनाचा झालेल्या बैठकीत सांगितले होते. तसेच या राज्य महामार्गासाठी ४ कोटी रुपये खर्च होणार असून हा रस्ता येणाऱ्या पर्यटकांसाठी चांगल्या प्रकारे तयार होईल असे सांगितले होते.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी एका ठेकेदाराला देण्यात आला. मात्र, या ठेकेदाराने रस्त्याला फक्त थोड्या-थोड्या अंतरावर मलमपट्टी केली आहे. त्यामुळे आता या रस्त्यावरून जात असताना वाहनचालकांना नेमका डांबरीकरण केलेला रस्ता कोठे आहे हे शोधूनही सापडत नाही.

मलमपट्टी करून फक्त हा रस्ता तयार करण्यात आल्याचे दाखविण्यात आले व चार कोटी रुपये पाण्यातही गेले. त्यामुळे वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता तयार केला अशा प्रकारच्या मोठ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.कसाल, बाजारपेठ रोड, शिवाजी महाराज चौक, पडव दरम्यान डोंगरेवाडी वळणावर तसेच आंब्याचे गाळू, रानबांबुळी येथील परिसरात तर वाहनधारकांना डांबरी रस्ता शोधूनही सापडत नाही. या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. खड्ड्यांनी चाळण झाल्याने या रस्त्यावर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग सुशेगाद आहे.आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनसर्वसामान्यांच्या खिशातून कर स्वरुपात मिळणारा शासन निधी भ्रष्ट अधिकारी व मुजोर कंत्राटदार यांच्यामुळे वाया जात आहे. हे जनतेचे दुर्दैव आहे. येत्या आठ दिवसांत महामार्गाची सुधारणा न झाल्यास मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाची भूमिका घेईल, अशी प्रतिक्रिया मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग