शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

कसाल-मालवण राज्य मार्गाची खड्ड्यांनी चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 12:36 IST

kasalmalvan, road, pwd, sindhudurgnews कसाल-मालवण राज्य मार्गाची खड्ड्यांनी पूर्णपणे चाळण झाली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये या रस्त्याची डागडुजी करण्याकरिता जिल्हा नियोजनमधून पालकमंत्र्यांनी ४ कोटी रुपये निधी दिला होता. यातून या रस्त्यावर फक्त मलमपट्टी करण्यात आली होती. ते पैसे नेमके कुठे गेले? असा सवाल वाहनचालकांतून विचारला जात आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना तर रस्ता कोठे आहे हे सापडत नाही एवढे खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देकसाल-मालवण राज्य मार्गाची खड्ड्यांनी चाळण वाहनचालक रस्ता शोधताहेत : सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देईल का ॽ

ओरोस : कसाल-मालवण राज्य मार्गाची खड्ड्यांनी पूर्णपणे चाळण झाली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये या रस्त्याची डागडुजी करण्याकरिता जिल्हा नियोजनमधून पालकमंत्र्यांनी ४ कोटी रुपये निधी दिला होता. यातून या रस्त्यावर फक्त मलमपट्टी करण्यात आली होती. ते पैसे नेमके कुठे गेले? असा सवाल वाहनचालकांतून विचारला जात आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना तर रस्ता कोठे आहे हे सापडत नाही एवढे खड्डे पडले आहेत.या रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकीस्वारांच्या मागे बसलेल्या व्यक्ती या खड्ड्यांत पडून अपघातही झाले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. कसाल-मालवण हा राज्य महामार्ग आंगणेवाडीच्या यात्रेच्या निमित्ताने डांबरीकरण केला जाईल, असे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नियोजनाचा झालेल्या बैठकीत सांगितले होते. तसेच या राज्य महामार्गासाठी ४ कोटी रुपये खर्च होणार असून हा रस्ता येणाऱ्या पर्यटकांसाठी चांगल्या प्रकारे तयार होईल असे सांगितले होते.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी एका ठेकेदाराला देण्यात आला. मात्र, या ठेकेदाराने रस्त्याला फक्त थोड्या-थोड्या अंतरावर मलमपट्टी केली आहे. त्यामुळे आता या रस्त्यावरून जात असताना वाहनचालकांना नेमका डांबरीकरण केलेला रस्ता कोठे आहे हे शोधूनही सापडत नाही.

मलमपट्टी करून फक्त हा रस्ता तयार करण्यात आल्याचे दाखविण्यात आले व चार कोटी रुपये पाण्यातही गेले. त्यामुळे वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता तयार केला अशा प्रकारच्या मोठ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.कसाल, बाजारपेठ रोड, शिवाजी महाराज चौक, पडव दरम्यान डोंगरेवाडी वळणावर तसेच आंब्याचे गाळू, रानबांबुळी येथील परिसरात तर वाहनधारकांना डांबरी रस्ता शोधूनही सापडत नाही. या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. खड्ड्यांनी चाळण झाल्याने या रस्त्यावर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग सुशेगाद आहे.आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनसर्वसामान्यांच्या खिशातून कर स्वरुपात मिळणारा शासन निधी भ्रष्ट अधिकारी व मुजोर कंत्राटदार यांच्यामुळे वाया जात आहे. हे जनतेचे दुर्दैव आहे. येत्या आठ दिवसांत महामार्गाची सुधारणा न झाल्यास मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाची भूमिका घेईल, अशी प्रतिक्रिया मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग