शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पिण्याच्या पाण्यासाठी करताहेत पायपीट, ऐन पावसाळ्यातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:10 IST

ऐन पावसाळ्यात दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. मात्र, नळपाणी योजना स्वत: चालविणारे ग्रामपंचायत सदस्य अजय परब निर्धास्त आहेत. ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे पिण्याच्या पाण्यासाठी करताहेत पायपीट, ऐन पावसाळ्यातील प्रकार कुडासेमधील नळपाणी योजना पंधरा दिवस बंद

दोडामार्ग : कुडासे गावातील चार वाड्यांवरील सुमारे दीडशे कुटुंबांना पाणीपुरवठा करणारी नळपाणी योजना गेल्या पंधरा दिवसांपासून नादुरुस्त आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. मात्र, नळपाणी योजना स्वत: चालविणारे ग्रामपंचायत सदस्य अजय परब निर्धास्त आहेत. ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.येथील देसाईवाडी, वानोशीवाडी, धनगरवाडी, खैरातवाडी या वाड्यांना पाणीपुरवठा करणारी नळपाणी योजना चतुर्थीपूर्वीच नादुरुस्त झाली आहे. सुमारे दीडशे कुटुंबे या पाणी योजनेवर अवलंबून आहेत. मात्र, गेले पंधरा दिवस येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. ही नळपाणी योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात नसून ती पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीकडे आहे.मात्र, ग्रामपंचायत सदस्य अजय परब हे वैयक्तिकरित्या ही नळपाणी योजना चालवितात. पाणीपट्टी वसुलीपासून ते देखभाल दुरुस्तीपर्यंत ते स्वत: करीत आहेत. मात्र, त्याचा हिशोब अद्यापपर्यंत ग्रामपंचायत वा पाणीपुरवठा समितीला त्यांनी दिलेला नाही.कुडासे गावातील नळपाणी योजना गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून उत्सवाच्या कालावधीतच लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर आहे.ऐन पावसाळ्यात एकीकडे पूर येतोय तर दुसरीकडे पिण्याचे पाणी मिळत नाही. याला काय म्हणायचे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चतुर्थीपूर्वी नादुरुस्त झालेली नळपाणी योजना दुरुस्त करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणे अत्यावश्यक होते. परंतु याकडे परब यांनी दुर्लक्ष केले.

परिणामी ग्रामस्थांना अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. ही बाब खेदजनक असल्याची खंत ग्रामस्थ संतोष देसाई, उल्हास देसाई, बाजीराव देसाई यांसह अन्य ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातsindhudurgसिंधुदुर्ग