शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पेट्रोल, डिझेल दरवाढ जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी : वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:55 IST

सातत्याने पेट्रोल, डिझेल दरवाढ केल्याने भाजप सरकारला आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे का? असा प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

ठळक मुद्देपेट्रोल, डिझेल दरवाढ जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी : वैभव नाईक भाजपाला आश्वासनांचा पडला विसर, दिवसेंदिवस वाढ

मालवण : कोरोना विषाणूचे संकट देशावर अद्यापही कायम असताना आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या नागरिकांना पेट्रोल, डिझेलची केलेली दरवाढ ही त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखीच आहे.

केंद्रातील भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी पेट्रोल, डिझेल दरवाढीचा प्रमुख मुद्दा प्रचारात आघाडीवर ठेवला होता. मात्र भाजप पक्षाची सलग दोन वेळा देशात सत्ता येऊनही नागरिकांना ह्यअच्छे दिनह्ण पहावयास मिळालेले नाहीत. कोरोना संकट काळातही सलग पंधरा ते वीस दिवस सातत्याने पेट्रोल, डिझेल दरवाढ केल्याने भाजप सरकारला आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे का? असा प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.गेले १५ ते २० दिवस सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी दरवाढ होत आहे. ३१ मे रोजी पेट्रोलचा दर ७७.४१ रुपये व डिझेलचा दर ६६.३० रुपये होता. हा दर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारा होता. कोरोनाचे संकट विचारात घेत लोकांसाठी पेट्रोल, डिझेलचे दर कमी करायला हवे होते. मात्र केंद्र सरकारकडून दरात कपात होण्याऐवजी वाढ होत गेली. २४ जूनपर्यंत पेट्रोलचा दर ८७.५७ रुपये तर डिझेलचा दर ७८.०५ रुपये प्रति लीटर एवढा वाढविण्यात आला आहे.नागरिकांच्या खिशाला परवडेल एवढाच दर निश्चित करावाकोरोना संकटातून सावरत असलेल्या देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्यावरील आर्थिक संकट दूर करायला हवे. तरी जिल्हा शिवसेनेच्यावतीने पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून देशातील नागरिकांच्या खिशाला परवडेल एवढाच पेट्रोल, डिझेलचा दर निश्चित करावा, अशी मागणी पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाPetrolपेट्रोल