शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

कायमस्वरूपी उपायाचा प्रयत्न

By admin | Updated: May 20, 2015 00:15 IST

जिल्ह्यातील वाळूप्रश्न : विनायक राऊत यांचे आश्वासन

कणकवली : जांभ्या दगडाचा प्रश्न निकाली निघाला आहे. वाळू उत्खननावर हरित लवादाचे निर्बंध आड येत आहेत. तसेच एमएमबी बोर्डाकडे लिलावासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे. यावर मार्ग काढण्यासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे आम्ही कोकणातील आमदारांची बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाय काढण्याचा प्रयत्न असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले. एमएमबी बोर्डाचे अधिकार महसूलकडे द्यावेत. बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली महसूल यंत्रणा खाडीपट्ट्याचा लिलाव करेल, अशी मागणी केली आहे. राज्यशासनाकडून हरित लवादाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. आवाज फाऊंडेशनने काढलेल्या त्रुटींसंदर्भात राज्यशासनाने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. हरित लवादाने वाळूपट्टे लिलावाला मान्यता दिल्यानंतर महसूल यंत्रणेकडून लिलाव प्रक्रिया केली जाणार आहे. वाळू माफियांमुळे राज्यात मांडलेल्या उच्छादामुळे राज्यात एमपीईडी अ‍ॅक्ट लागू झाला. या अ‍ॅक्टचा त्रास कोकणवासीयांना होत असल्याचे खासदार राऊत म्हणाले. त्याचवेळी आरटीआय कार्यकर्ते अधिकाराचा गैरवापर करून प्रशासनाला वेठीस धरत असल्याचेही खासदार राऊत म्हणाले. वाळू उत्खनन हा महाराष्ट्रातील गंभीर प्रश्न झाला असून वाळूला पर्याय तयार झाला पाहिजे. तलाठी संघटनेची भेट घेणारवाळू उत्खननासंदर्भात झालेल्या वादात मंडल अधिकाऱ्यावर कारवाई झाली. त्यानंतर तलाठ्यांनी आंदोलन पुकारले. ग्रामीण भागातील महसूलची कामे ठप्प झाल्याने तलाठी संघटनेची भेट घेणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. बाजारभावाने मूल्यांकनचौपदरीकरणांतर्गत संपादित केल्या जाणाऱ्या निवासी जागांना बाजारभाव किंवा रेडिरेकनर दर यातील जो जास्त असेल त्याच्या चौपट व व्यावसायिक जागेला दुप्पट दर मिळणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)भात खरेदी आठ दिवसातभाताची उचल करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या गोदामांमध्ये साठलेल्या भाताच्या लिलावासाठी दुसऱ्या टेंडरची वाट न पाहता येत्या आठ दिवसांत भात खरेदी सुरू करण्यात यावी, अशी जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.शून्य प्रहरात स्थानिक प्रश्न मांडलेलोकसभेच्या कार्यकालाविषयी खासदार राऊत यांनी सांगितले की, शून्य प्रहरात १३ वेळा संधी मिळाली. त्यात जास्तीत जास्त मतदारसंघातील प्रश्न उपस्थित केले. नियम ३७७ अन्वये मतदारसंघातील प्रश्न ३ वेळा मांडले. वेगवेगळ्या कामकाजात १२ वेळा भाग घेतला, असे राऊत यांनी सांगितले.तारांकित ८ प्रश्न मांडले. २०० अतारांकित प्रश्न मांडले आणि पुरवणी प्रश्नांसाठी १२ वेळा संधी मिळाली. लोकसभेत महत्त्वाची चर्चा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर झाली.