शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

सिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:02 IST

गणेशोत्सवानंतर आता सिंधुदुर्ग वासीयांना महालयाचे वेध लागले आहेत. अद्याप अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे काही दिवस शिल्लक असले तरी महालयासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू झाली आहे. मात्र, कोरोनाचे सावट यावर्षी महालयांवर आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध !साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू ; कोरोनाचे सावट

सुधीर राणे

कणकवली : गणेशोत्सवानंतर आता सिंधुदुर्ग वासीयांना महालयाचे वेध लागले आहेत. अद्याप अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे काही दिवस शिल्लक असले तरी महालयासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू झाली आहे. मात्र, कोरोनाचे सावट यावर्षी महालयांवर आहे.गणेश चतुर्थी दिवशी गणरायांची विधिवत स्थापना केल्यानंतर दीड , पाच ,सात , नऊ दिवसांनी अनेक ठिकाणी गणरायांना निरोप देण्यात आला आहे. १ सप्टेंबर रोजी अकरा दिवसांच्या गणरायाना निरोप देण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी सतरा, एकविस दिवसानीही गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रभाव असल्याने समूह संसर्ग रोखण्यासाठी अनेक भाविकांनी दरवर्षी पेक्षा लवकर गणरायाना निरोप देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.सिंधुदुर्गात महालयांना विशेष महत्त्व असते. पितृ पंधरवड्यात आपल्या मृत कुटुंबीयांच्या नावे तिथीनुसार पिंडदान करुन पितरांच्या आत्मांना शांती मिळण्यासाठी धार्मिक विधी केले जातात. तर पितरांच्या नावाने नातेवाईक व ग्रामस्थांना महाप्रसाद वाढला जातो. पितृपक्ष कालावधीत पितर धरतीवर येतात, त्यांना तृप्त केल्यास वर्षभर आपल्या कामांना गती मिळते अशी अनेक लोकांची श्रद्धा आहे.यावर्षी २ सप्टेंबर पासून महालयानां प्रारंभ होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर आता लोकांना महालयाचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरु झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कमी लोकांच्या उपस्थितीत महालय कसे करायचे ? याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.

त्याचप्रमाणे पुरोहित उपलब्ध होण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुळे पुरोहित उपलब्ध न झाल्यास पर्यायी व्यवस्था काय करायची ? याबाबत जुन्या जाणत्या व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.महालयासाठी आवश्यक सामानाची यादी बनवून ते खरेदी करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या विधीसाठी लागणाऱ्या वस्तूंची जुळवाजुळव करणे सध्या सुरू आहे. तर गणेशोत्सवासाठी आपल्या मुळ गावी आलेले अनेक मुंबईकर महालय करुनच परतणार आहेत. त्यांची त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.भाजीचे दर आणखीन वाढण्याची शक्यता !महालयांमध्ये अन्नदानाला जास्त महत्व असते. यावेळी करण्यात येणाऱ्या भोजनात विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो. गणेशोत्सवाच्या कालावधीत भाजी, फळे यांच्या किमतीत वाढ झाली होती. आता परत महालयांच्या कालावधीत पुन्हा भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे काही भाजी विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्ग