शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
2
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
5
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
6
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
7
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
8
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
9
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला
10
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
11
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
12
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
13
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
14
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
15
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
16
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
17
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
18
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
19
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन

उद्धव ठाकरेंच्या भूलथापाना जनतेने भुलू नये, प्रमोद जठार यांचे आवाहन

By सुधीर राणे | Published: February 02, 2024 4:29 PM

विनायक राऊत यांनी प्रकल्पांना विरोध केल्याने बेरोजगारी वाढली 

कणकवली: उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री असताना कोकणासाठी काहीही करु शकले नाहीत. येथे येणाऱ्या प्रकल्पांना ठाकरे आणि खासदार विनायक राऊत यांनी विरोध करून एकप्रकारे ते प्रकल्प समुद्रात बुडविले. येथील तरुणांना रोजगारापासून मुकावे लागले. आता जनतेने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राऊत यांचा पराभव करून त्यांनाच समुद्रात बुडवावे. तसेच प्रकल्पांना विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या  भुलथापाना जनतेने भुलू नये, असे आवाहन भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले. कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, बबलू सावंत उपस्थित होते.जठार म्हणाले, प्रत्येक प्रकल्पाला खासदार विनायक राऊत विरोध करतात. नवीन कुठलाही प्रकल्प आला की, ते आणि उद्धव ठाकरे हे आम्हाला विश्वासात घ्या,असे म्हणतात. याचा अर्थ काय? रोजगार उपलब्ध  नसल्याने तरुणांना बाहेर गावी जावे लागत असल्याने कोकणातील ८० टक्के घरे बंद आहेत. रिफायनरी प्रकल्प व्हावा,यासाठी आमचे प्रयत्न आहेत. मात्र, एकदा राऊत यांना विचारले, तुम्ही रिफायनरीचा अभ्यास केला का? त्यावर ते म्हणाले लोकांना नको असेल तर आमचा त्याला विरोध राहील. आमदार राजन साळवी, आदित्य ठाकरे सांगताहेत की, हा प्रकल्प हवा. उद्धव ठाकरे यांनी प्रकल्प करावा म्हणून मुख्यमंत्री असताना केंद्रशासनाला पत्र दिले आहे. मग फक्त राऊतांचाच त्याला विरोध का? असा प्रश्न प्रमोद जठार यांनी उपस्थित केला.सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी,कोल्हापूर या भागातील काजू बीला २०० रुपये हमी भाव द्यावा, या मुद्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही यशस्वी झालो आहोत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्याबाबतची बैठक सर्व मंत्र्यांच्या उवस्थितीत पुढच्या आठवड्यात होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून काजू बी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. शेतकऱ्यांना येणारा उत्पादन शुल्क लक्षात घेवून सरकारने हमी भाव द्यावा, भावांतर म्हणून तरतूद करावी अशी आम्ही मागणी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेPramod Jatharप्रमोद जठार