शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

प्रलंबित प्रश्न मार्गी लागेपर्यंत जमिनीला हात लावू देणार नाही :  राजन साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 18:13 IST

ज्या ज्या ठिकाणी प्रश्न प्रलंबित आहेत, ते पुर्णत्वाला जात नाहीत तो पर्यंत लांजा शहरातील जमिनीला हात लावू देणार नाही, अशी ठोस भूमिका लांजा-राजापुरचे आमदार राजन साळवी यांनी मांडली.

ठळक मुद्देप्रलंबित प्रश्न मार्गी लागेपर्यंत जमिनीला हात लावू देणार नाही : राजन साळवी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाबाबत लांजात बैठक

लांजा : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम झाले पाहिज,े ही भावना आहेच. मात्र लांजा शहरातील उध्वस्त होत असलेल्या नागरिक, व्यापारी, खोकेधारक, दुकानदार व सर्व इमारत मालक या सर्वांचे न्यायालय, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय ज्या ज्या ठिकाणी प्रश्न प्रलंबित आहेत, ते पुर्णत्वाला जात नाहीत तो पर्यंत लांजा शहरातील जमिनीला हात लावू देणार नाही, अशी ठोस भूमिका लांजा-राजापुरचे आमदार राजन साळवी यांनी मांडली.सोमवार दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी लांजा शहरामध्ये महामर्गाच्या चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शहरातील व्यापाºयांनी काम न करु देता पिटाळून लावले होते. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील वादावादीची दखल त्याक्षणी आमदार राजन साळवी यांनी घेउन व्यापाºयांच्या पाठीशी राहण्याची भुमिका घेतली होती.

कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून काम बंद ठेवण्याच्या सुचनाही दिल्या होत्या. यासह ४ डिसेंबर २०१८ रोजी लांजा शहरातील नागरीक, व्यापारी व महामार्ग अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांची एक संयुक्त सभा घेण्याचे आश्वासन साळवी यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी ही सभा शहरातील सांस्कृतीक भवन लांजा येथे नागरिक व व्यापाऱ्यांचे प्रश्न आणि अधिकाऱ्यांच्या उत्तराने दीड ते दोन तास सुरू होती. या सभे प्रसंगी आमदार राजन साळवी बोलत होते.या सभेला संघर्ष समितीचे अध्यक्ष महंमद रखांगी, व्यापारी संघटनचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, नगराध्यक्ष सुनिल कुरूप, परवेश घारे, जयवंत शेट्ये, जगदीश राजापकर, संदीप दळवी, हेमंत शेट्ये, रुपेश गांगण, सचिन भिंगार्डे, खलिल मणेर, सुरेंद्र लाड, महेश नारकर, अनिल लांजेकर, प्रभाकर शेट्ये आदी उपस्थित होते.आमदार राजन साळवी लांजा शहरातील प्रकल्पबाधित व्यापारी व नागरिकांशी बोलताना पुढे म्हणाले की, महामार्गाचे चौपदरीकरण होत असल्याने लांजा शहरातील अनेक खोकेधारक, दुकानदार, इमारती मालक हे सर्व उध्वस्त होत असल्याचे समोर आल्यानतर या मार्गाला बायपास मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र लांजा शहर जिथे सुरू होते व व शहराचा शेवट जिथे संपतो, त्यावरती पुल होणार हे महामार्ग प्रशासनाने समोर ठेवले.

मात्र महामार्ग प्रशासनाने शहरातील नागरीक, खोकेधारक, व्यापारी यांच्या समस्या, प्रश्न व ज्यांना मोबदला मिळाला नाही, ज्यांचा अर्धवट मिळालेला आहे, अशा सर्व प्रकल्प बाधितांना पुर्णत्वाला केल्याशिवाय शहरात कामाला सुरूवात करु नये नाहीतर जनतेस रस्यावर उतरुन शहरातील जमिनीला हात लावू देणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला.या सभेला महामार्ग चौपदरिकरणाचे अधिकारी, प्रांतकार्यालयाचे प्रतिनिधी, महामार्ग ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम, महावितरण या खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच व्यापारी आणि नागरिकांच्यावतीने संघर्ष समितीचे अध्यक्ष महंमद रखांगी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना महामार्गाच्या वेळोवेळी बदलत असणाऱ्या जागा हस्तांतरणाबाबत चांगलेच धारेवर घेतले होते.

नागरीक व व्यापारी यांच्यावतीने बोलताना महंमद रखागी म्हणाले की, ३० ते ४० वषार्पासून छत्री डोक्यावर घेउन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. आज तेच सर्व महामार्गात उध्वस्त होत आहेत. शहराची बाजारपेठ रस्त्यावरच आहे. आज उध्वस्त होणाऱ्यांकडे अन्य कोणाताही रोजगारदृष्ट्या दुसरा पर्याय नाही, असे असतानाही कोणतीच माहिती नाही.

एकाएकी नोटीसा येतात, त्यामध्ये मोबदला, जागा किती घेतली जातेय, नेमकी शहरात मार्ग कसा असणार हे निश्चित नाही आणि नोटीसा पाठवून व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेशी खेळण्याचे काम महामार्ग प्रशासन करत आहे, असे ते म्हणाले.नळपाणी योजनेवर चर्चा सभेत लांजा नगरपंचायतीच्या नळपाणी योजनेचा विषयावर चर्चा करण्यात आली. महामार्ग प्रशासनाने नुकसान भरपाई म्हणून नगरपंचायतीला देऊ केलेली रक्कम पुरेसी नसून ती वाढीव स्वरुपाने मिळावी, असे उपस्थित अधिकाºयांना नगराध्यक्ष सुनिल कुरुप व परवेश घारे यांनी ठणकावून सांगितले. शहराचा वाढता आलेख आणि अल्प मोबदला यावर महामार्ग प्रशासनाने विचार करावा असे सांगण्यात आले.

टॅग्स :highwayमहामार्गRajan Salviराजन साळवीsindhudurgसिंधुदुर्ग