शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६५ लाखाची नुकसान भरपाई अदा

By admin | Updated: October 27, 2015 23:58 IST

जिल्हा प्रशासन : पडझडीच्या नुकसानापोटी रक्कम प्राप्त; जून - सप्टेंबरमधील नुकसान

रत्नागिरी : यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी पडझड झाली तर काही बळीही घेतले. या नुकसानाची दखल शासनाकडून घेण्यात आली असून, मृतांच्या वारसांना तत्काळ भरपाई देण्यात आली आहे. तसेच पडझडीच्या नुकसान भरपाईपोटी ६५ लाख रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाला आत्तापर्यंत तीन टप्प्यात प्राप्त झाली आहे. या रकमेचे वितरण सर्व तालुक्यांना करण्यात आले आहे.१ जून ते सप्टेंबर २०१५ अखेरपर्यंत जिल्ह्यात पडलेल्या वादळी पावसाने काही ठिकाणी घरे, गोठे तसेच खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. काही व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. या पावसात झालेल्या नुकसानाची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यात मृत झालेल्या ९ व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांप्रमाणे एकूण ३६ लाख रुपयांचे वाटप तत्काळ करण्यात आले.या वादळी पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. या कालावधीत पूर्णत: पडझड झालेल्या घरांची संख्या ६ असून, त्यापैकी चार घरांना ३,०१,४५० रुपये एवढी नुकसानभरपाई देण्यात आली आहे. अंशत: नुकसान झालेल्या १२५ घरांपैकी पात्र ३५ घरांना ७२,२३५ रुपये एवढी मदत देण्यात आली आहे. ५९६ कच्च्या घरांपैकी पात्र २१९ घरांना १,९७,५०० इतकी भरपाई देण्यात आली. तसेच बाधित ७५ गोठ्यांपैकी पात्र २५ गोठ्यांना १६,१५० रुपये भरपाई देण्यात आली आहे. या कालावधीत झालेल्या चक्रीवादळ, पुरामध्ये ४७ सार्वजनिक मालमत्तांच्या नुकसानीचे २६,६२,१७९ रुपये, तर २५ खासगी मालमत्तांच्या नुकसानीचे ११,९३,७९६ अशी एकूण ३८,५५,९७५ रुपयांच्या नुकसानाची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र, अद्याप याच्या भरपाईची रक्कम देण्यात आलेली नाही.तसेच अनेक भागात वीज पडल्याने व्यक्ती, जनावरे मृत झाली. या कालावधीत जिल्ह्यातील १९ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मालकांनाही अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. या कालावधीत पडझड झालेल्या घरांपैकी पात्र ठरलेल्या ११३ घरांच्या दुरूस्ती व पुर्नबांधणीसाठी शासनाने दिलेल्या भरपाईच्या रकमेपाटी आतापर्यंत ६५ लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. या नुकसानभरपाई निधीचे वाटप संबंधित तालुक्यांना करण्यात आले आहे. यापैकी १० लाख, २० लाख आणि ३५ लाख अशी एकूण ६५ लाख भरपाईची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे आली असून, तीचे सर्व तालुक्यांतून लवकरच वितरण करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)मदत नाही : १९ जनावरांचा मृत्यूरत्नागिरी जिल्ह्यात जून, सप्टेंबर या कालावधीत चक्रीवादळ, पुरामध्ये ४७ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले होते. तसेच २५ खासगी मालमत्तांचेही नुकसान झाले. या नुकसानाची नोंद प्रशासनाने केली आहे. मात्र, त्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. तसेच जिल्ह्यात १९ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला. त्यांच्या मालकांनाही अद्याप नुकसानभरपाई देण्यात आलेली नसल्याचे दिसत आहे.दापोलीत अधिकजून - सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान दापोली तालुक्यात झाले आहे. यात २१५ घरांचे व २७ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.