शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

जिल्ह्यात ६५ लाखाची नुकसान भरपाई अदा

By admin | Updated: October 27, 2015 23:58 IST

जिल्हा प्रशासन : पडझडीच्या नुकसानापोटी रक्कम प्राप्त; जून - सप्टेंबरमधील नुकसान

रत्नागिरी : यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी पडझड झाली तर काही बळीही घेतले. या नुकसानाची दखल शासनाकडून घेण्यात आली असून, मृतांच्या वारसांना तत्काळ भरपाई देण्यात आली आहे. तसेच पडझडीच्या नुकसान भरपाईपोटी ६५ लाख रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाला आत्तापर्यंत तीन टप्प्यात प्राप्त झाली आहे. या रकमेचे वितरण सर्व तालुक्यांना करण्यात आले आहे.१ जून ते सप्टेंबर २०१५ अखेरपर्यंत जिल्ह्यात पडलेल्या वादळी पावसाने काही ठिकाणी घरे, गोठे तसेच खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. काही व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. या पावसात झालेल्या नुकसानाची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यात मृत झालेल्या ९ व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांप्रमाणे एकूण ३६ लाख रुपयांचे वाटप तत्काळ करण्यात आले.या वादळी पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. या कालावधीत पूर्णत: पडझड झालेल्या घरांची संख्या ६ असून, त्यापैकी चार घरांना ३,०१,४५० रुपये एवढी नुकसानभरपाई देण्यात आली आहे. अंशत: नुकसान झालेल्या १२५ घरांपैकी पात्र ३५ घरांना ७२,२३५ रुपये एवढी मदत देण्यात आली आहे. ५९६ कच्च्या घरांपैकी पात्र २१९ घरांना १,९७,५०० इतकी भरपाई देण्यात आली. तसेच बाधित ७५ गोठ्यांपैकी पात्र २५ गोठ्यांना १६,१५० रुपये भरपाई देण्यात आली आहे. या कालावधीत झालेल्या चक्रीवादळ, पुरामध्ये ४७ सार्वजनिक मालमत्तांच्या नुकसानीचे २६,६२,१७९ रुपये, तर २५ खासगी मालमत्तांच्या नुकसानीचे ११,९३,७९६ अशी एकूण ३८,५५,९७५ रुपयांच्या नुकसानाची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र, अद्याप याच्या भरपाईची रक्कम देण्यात आलेली नाही.तसेच अनेक भागात वीज पडल्याने व्यक्ती, जनावरे मृत झाली. या कालावधीत जिल्ह्यातील १९ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मालकांनाही अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. या कालावधीत पडझड झालेल्या घरांपैकी पात्र ठरलेल्या ११३ घरांच्या दुरूस्ती व पुर्नबांधणीसाठी शासनाने दिलेल्या भरपाईच्या रकमेपाटी आतापर्यंत ६५ लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. या नुकसानभरपाई निधीचे वाटप संबंधित तालुक्यांना करण्यात आले आहे. यापैकी १० लाख, २० लाख आणि ३५ लाख अशी एकूण ६५ लाख भरपाईची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे आली असून, तीचे सर्व तालुक्यांतून लवकरच वितरण करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)मदत नाही : १९ जनावरांचा मृत्यूरत्नागिरी जिल्ह्यात जून, सप्टेंबर या कालावधीत चक्रीवादळ, पुरामध्ये ४७ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले होते. तसेच २५ खासगी मालमत्तांचेही नुकसान झाले. या नुकसानाची नोंद प्रशासनाने केली आहे. मात्र, त्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. तसेच जिल्ह्यात १९ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला. त्यांच्या मालकांनाही अद्याप नुकसानभरपाई देण्यात आलेली नसल्याचे दिसत आहे.दापोलीत अधिकजून - सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान दापोली तालुक्यात झाले आहे. यात २१५ घरांचे व २७ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.