शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

पथदीपांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: December 2, 2014 23:36 IST

रत्नागिरी पालिका : मिरकरवाडासह पाच ठिकाणी जोडणी कापली

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेने पथदिव्यांच्या विजेचे बिल न भरल्याने महावितरणने सोमवारी सायंकाळी शहरातील खालची आळी, मिरकरवाडासह ५ ठिकाणच्या पथदिव्यांची वीज जोडणी कापली. त्यामुळे शहराच्या निम्म्या भागातील पथदीप सोमवारी रात्री बंद होते. मात्र, पालिकेकडे शहरातील पाच भागांतील पथदिव्यांची वीजबिले पालिकेकडे आलीच नाहीत तर ती भरणार कशी, असा सवाल नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी केला आहे. माहिती न घेता वीजपुरवठा खंडित केल्याने नगराध्यक्ष मयेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणला पालिकेकडून पाणी पुरवठा होतो. त्याचे हजारोंचे बिल महावितरणकडे थकीत आहे. खरेतर याआधीच त्यांचा पाणीपुरवठा खंडित करायला हवा होता, अशी आक्रमक भूमिका नगराध्यक्ष मयेकर यांनी घेतली. तसेच थकीत पाणीपट्टीमुळे महावितरणचा पाणीपुरवठा खंडित करण्यास कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी पाठविल्याचेही मयेकर यांनी सांगितले. त्यामुळे महावितरण व रत्नागिरी पालिका आमने-सामने आले असून, हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. रत्नागिरी शहरात ४ हजार पथदिवे आहेत. त्यासाठी दर महिन्याला पालिका ८ ते १० लाखांचे वीजबिल भरणा करते. शहरातील पाच विभागातील वीजबिलेच पालिकेला प्राप्त झालेली नाहीत. त्याच भागातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. माहिती न घेता कृती करणे ही महावितरणची घिसाडघाईच असल्याचे मयेकर म्हणाले. पालिका विद्युत विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात ४ हजार पथदिव्यपांपैकी २५०० पथदिवे हे सोडियम व्हेपर्सचे आहेत. त्यामध्ये १५०० व्हेपर्स १५० वॅट क्षमतेचे, तर १००० व्हेपर्स हे २५० वॅट क्षमतेचे आहेत. १५०० पथदीप हे ट्युबलाईट स्वरुपातील असून, ४० वॅटच्या ट्यूबलाइट वापरण्यात आल्या आहेत. पथदिव्यांचे अनेक विभाग शहरात करण्यात आले असून, त्यातील पाच विभागांची वीजबिले पालिकेला मिळालेली नाहीत. (प्रतिनिधी)