शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

पथदीपांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: December 2, 2014 23:36 IST

रत्नागिरी पालिका : मिरकरवाडासह पाच ठिकाणी जोडणी कापली

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेने पथदिव्यांच्या विजेचे बिल न भरल्याने महावितरणने सोमवारी सायंकाळी शहरातील खालची आळी, मिरकरवाडासह ५ ठिकाणच्या पथदिव्यांची वीज जोडणी कापली. त्यामुळे शहराच्या निम्म्या भागातील पथदीप सोमवारी रात्री बंद होते. मात्र, पालिकेकडे शहरातील पाच भागांतील पथदिव्यांची वीजबिले पालिकेकडे आलीच नाहीत तर ती भरणार कशी, असा सवाल नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी केला आहे. माहिती न घेता वीजपुरवठा खंडित केल्याने नगराध्यक्ष मयेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणला पालिकेकडून पाणी पुरवठा होतो. त्याचे हजारोंचे बिल महावितरणकडे थकीत आहे. खरेतर याआधीच त्यांचा पाणीपुरवठा खंडित करायला हवा होता, अशी आक्रमक भूमिका नगराध्यक्ष मयेकर यांनी घेतली. तसेच थकीत पाणीपट्टीमुळे महावितरणचा पाणीपुरवठा खंडित करण्यास कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी पाठविल्याचेही मयेकर यांनी सांगितले. त्यामुळे महावितरण व रत्नागिरी पालिका आमने-सामने आले असून, हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. रत्नागिरी शहरात ४ हजार पथदिवे आहेत. त्यासाठी दर महिन्याला पालिका ८ ते १० लाखांचे वीजबिल भरणा करते. शहरातील पाच विभागातील वीजबिलेच पालिकेला प्राप्त झालेली नाहीत. त्याच भागातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. माहिती न घेता कृती करणे ही महावितरणची घिसाडघाईच असल्याचे मयेकर म्हणाले. पालिका विद्युत विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात ४ हजार पथदिव्यपांपैकी २५०० पथदिवे हे सोडियम व्हेपर्सचे आहेत. त्यामध्ये १५०० व्हेपर्स १५० वॅट क्षमतेचे, तर १००० व्हेपर्स हे २५० वॅट क्षमतेचे आहेत. १५०० पथदीप हे ट्युबलाईट स्वरुपातील असून, ४० वॅटच्या ट्यूबलाइट वापरण्यात आल्या आहेत. पथदिव्यांचे अनेक विभाग शहरात करण्यात आले असून, त्यातील पाच विभागांची वीजबिले पालिकेला मिळालेली नाहीत. (प्रतिनिधी)