शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

पथदीपांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: December 2, 2014 23:36 IST

रत्नागिरी पालिका : मिरकरवाडासह पाच ठिकाणी जोडणी कापली

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेने पथदिव्यांच्या विजेचे बिल न भरल्याने महावितरणने सोमवारी सायंकाळी शहरातील खालची आळी, मिरकरवाडासह ५ ठिकाणच्या पथदिव्यांची वीज जोडणी कापली. त्यामुळे शहराच्या निम्म्या भागातील पथदीप सोमवारी रात्री बंद होते. मात्र, पालिकेकडे शहरातील पाच भागांतील पथदिव्यांची वीजबिले पालिकेकडे आलीच नाहीत तर ती भरणार कशी, असा सवाल नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी केला आहे. माहिती न घेता वीजपुरवठा खंडित केल्याने नगराध्यक्ष मयेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणला पालिकेकडून पाणी पुरवठा होतो. त्याचे हजारोंचे बिल महावितरणकडे थकीत आहे. खरेतर याआधीच त्यांचा पाणीपुरवठा खंडित करायला हवा होता, अशी आक्रमक भूमिका नगराध्यक्ष मयेकर यांनी घेतली. तसेच थकीत पाणीपट्टीमुळे महावितरणचा पाणीपुरवठा खंडित करण्यास कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी पाठविल्याचेही मयेकर यांनी सांगितले. त्यामुळे महावितरण व रत्नागिरी पालिका आमने-सामने आले असून, हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. रत्नागिरी शहरात ४ हजार पथदिवे आहेत. त्यासाठी दर महिन्याला पालिका ८ ते १० लाखांचे वीजबिल भरणा करते. शहरातील पाच विभागातील वीजबिलेच पालिकेला प्राप्त झालेली नाहीत. त्याच भागातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. माहिती न घेता कृती करणे ही महावितरणची घिसाडघाईच असल्याचे मयेकर म्हणाले. पालिका विद्युत विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात ४ हजार पथदिव्यपांपैकी २५०० पथदिवे हे सोडियम व्हेपर्सचे आहेत. त्यामध्ये १५०० व्हेपर्स १५० वॅट क्षमतेचे, तर १००० व्हेपर्स हे २५० वॅट क्षमतेचे आहेत. १५०० पथदीप हे ट्युबलाईट स्वरुपातील असून, ४० वॅटच्या ट्यूबलाइट वापरण्यात आल्या आहेत. पथदिव्यांचे अनेक विभाग शहरात करण्यात आले असून, त्यातील पाच विभागांची वीजबिले पालिकेला मिळालेली नाहीत. (प्रतिनिधी)