शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

न्यायालयांची परिक्रमा खंडपीठे दोन दिवस व्हावीत, विश्व हिंदू परिषदेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 15:46 IST

खटल्यांसाठी मुंबई येथे जाणे पक्षकारांना भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे

मालवण :  कोकण विभागीय आयुक्त आणि महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण ही दोन्ही न्यायालयेमुंबई येथे असल्याकारणाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील पक्षकारांना तेथे खटल्यांसाठी जाणे भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे ठरते. बहुतांश वेळा या ठिकाणी पक्षकारांना तारखांवर तारखा दिल्या जातात. यामुळे होणारा सर्वच भुर्दंड लक्षात घेता दोन्ही न्यायालये महिन्यातून दोन दिवस रत्नागिरी आणि दोन दिवस सिंधुदुर्ग येथे सुरू केल्यास रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतला आहे. हा प्रश्न वि. हिं. प.च्या पदाधिकाऱ्यांनी शासन दरबारी मांडली असून, गावागावांतील ग्रामसभांमध्ये याबाबत ठराव घेण्यात यावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेमार्फत करण्यात आले आहे.कोकणातील सर्व जिल्ह्यांसाठी महसुली खटले चालविण्याकरिता वरिष्ठ स्तरावर विभागीय आयुक्त कोकण विभाग आणि महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण मुंबई ही न्यायालये आहेत. मात्र, ही दोन्ही न्यायालये कायमस्वरूपी मुंबई येथे आहेत. रायगड, ठाणे पालघर आणि मुंबई या चार जिल्ह्यांसाठी मुंबईचे अंतर भौगोलिकदृष्ट्या कमी, आर्थिकदृष्ट्या सोयीचे आहे. परंतु, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हेदेखील या न्यायालयांच्या अधिकार कक्षेत येतात.मात्र, भौगोलिकदृष्ट्या या जिल्ह्यांचे मुंबईपासूनचे अंतर बरेच मोठे आहे. अशा परिस्थितीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथून मुंबईला जाऊन वरिष्ठ न्यायालयातील अपील, रिव्हिजन, अथवा तत्सम काम चालविणे वकील तसेच पक्षकारांना आर्थिकदृष्ट्या फारच खर्चिक होत आहे. खटल्यासाठी मुंबई येथे जाणे, येण्यासाठी प्रचंड वेळ खर्ची पडत आहे.यामुळे विभागीय आयुक्त आणि महसूल न्यायाधिकरण यांची परिक्रमा खंडपीठ महिन्यातून दोन दिवस रत्नागिरी, दोन दिवस सिंधुदुर्ग येथे सुरू केल्यास येथील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासाठी प्रशस्त जागादेखील उपलब्ध आहे. मात्र, शासनाने याबाबत निर्णय घेणे आवश्यक असल्याचे निवेदन विश्व हिंदू परिषदेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही जिल्ह्यांत गावागावांत याबाबत ठराव घेण्यात यावा, असे आवाहनदेखील विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCourtन्यायालयMumbaiमुंबई