शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

गव्यांकडून भातशेतीची नुकसानी

By admin | Updated: August 26, 2015 22:55 IST

शेतकऱ्यांचे धाबे दणाणले : वडाचापाट, चाफेखोल, माळगावमधील प्रकार

बागायत : गेले आठ दिवस वडाचापाट, चाफेखोल व माळगांव येथील शेतकऱ्यांचे गव्यांनी धाबे दणाणून सोडले आहेत. या तिन्ही गावातील पोलीस पाटील यांना या घटनेची माहिती येथील स्थानिक शेतकऱ्यांनी दिली व पोलीस पाटलांनी शेताची पाहणी करून वन अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सर्व प्रकार सांगितला. मात्र, वनअधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जखमांना मीठ चोळले. शेताची पाहणी करण्याचे किंवा गव्यांचा बंदोबस्त करण्याचे सोडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन पोलीस पाटीलांमार्फत केले.यावर्षी कमी पावसाचा तडाखा त्यात पेरणी, लावणी उशिर, बियाण्यांची महागाई, महागडी खते, वाढलेली मजुरी, शेतीला नसलेला बाजारभाव, विजेची वाढलेली बिले यापासून डोके वर काढून केलेली शेती. त्यात माकड, रानटी डुक्कर, इतर रानटी प्राण्यांपासून वारंवार होणारा त्रास आणि आता मात्र गेले आठ दिवस ठाण मांडून बसलेल्या गव्यांच्या कळपामुळे चाफेखोल, वडाचापाट, माळगांव येथील शेतकरी मोठ्या चिंतेत पडलेला आहे. कारण आता हातातोंडाशी आलेले भात, भुईमूग, नाचणी, भाजीपाला गव्यांनी खावून व नाचून पूर्णपणे जमिनदोस्त केला आहे. मात्र या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीकडे कोणीही शासकीय अधिकारी किंवा ग्रामपंचायत स्तरावरील, पंचायत समिती स्तरावरील किंवा जिल्हा परिषद स्तरावरील लोकांनी दाद घेतलेली नाही याची खंत या शेतकऱ्यांना भेडसावत आहे.चाफेखोल येथील शेतकरी रविंद्र जाधव यांनी या वन्यप्राण्यांचा वनविभागाने जर बंदोबस्त केला नाही तर आम्हा शेतकऱ्यांना शेतीशिवाय उपाशी रहावे लागेल. कारण सध्या रेशनही मिळत नाही. त्यामुळे अशी नासधूस झाल्यास आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. गव्यांच्या रोजच्या वावरामुळे शेतीच्या कामाला न जाण्याचे शेतातील कामगारांनी पसंत केले आहे. त्यामुळे ठोस पावले उचलावीत असा इशारा चाफेखोल, माळगांव, वडाचापाट येथील सर्व शेतकऱ्यांनी दिला आहे.यावेळी शेतकरी कृष्णा जाधव, प्रकाश जाधव, रवींद्र साळुंखे, बंडू कदम, प्रमोद कदम, रवि साळकर, लवू वरक, शाहू वरक, रवींद्र जाधव, सुरेश खांबल, बाळा कदम उपस्थित होते. (वार्ताहर)