शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

गव्यांकडून भातशेतीची नुकसानी

By admin | Updated: August 26, 2015 22:55 IST

शेतकऱ्यांचे धाबे दणाणले : वडाचापाट, चाफेखोल, माळगावमधील प्रकार

बागायत : गेले आठ दिवस वडाचापाट, चाफेखोल व माळगांव येथील शेतकऱ्यांचे गव्यांनी धाबे दणाणून सोडले आहेत. या तिन्ही गावातील पोलीस पाटील यांना या घटनेची माहिती येथील स्थानिक शेतकऱ्यांनी दिली व पोलीस पाटलांनी शेताची पाहणी करून वन अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सर्व प्रकार सांगितला. मात्र, वनअधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जखमांना मीठ चोळले. शेताची पाहणी करण्याचे किंवा गव्यांचा बंदोबस्त करण्याचे सोडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन पोलीस पाटीलांमार्फत केले.यावर्षी कमी पावसाचा तडाखा त्यात पेरणी, लावणी उशिर, बियाण्यांची महागाई, महागडी खते, वाढलेली मजुरी, शेतीला नसलेला बाजारभाव, विजेची वाढलेली बिले यापासून डोके वर काढून केलेली शेती. त्यात माकड, रानटी डुक्कर, इतर रानटी प्राण्यांपासून वारंवार होणारा त्रास आणि आता मात्र गेले आठ दिवस ठाण मांडून बसलेल्या गव्यांच्या कळपामुळे चाफेखोल, वडाचापाट, माळगांव येथील शेतकरी मोठ्या चिंतेत पडलेला आहे. कारण आता हातातोंडाशी आलेले भात, भुईमूग, नाचणी, भाजीपाला गव्यांनी खावून व नाचून पूर्णपणे जमिनदोस्त केला आहे. मात्र या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीकडे कोणीही शासकीय अधिकारी किंवा ग्रामपंचायत स्तरावरील, पंचायत समिती स्तरावरील किंवा जिल्हा परिषद स्तरावरील लोकांनी दाद घेतलेली नाही याची खंत या शेतकऱ्यांना भेडसावत आहे.चाफेखोल येथील शेतकरी रविंद्र जाधव यांनी या वन्यप्राण्यांचा वनविभागाने जर बंदोबस्त केला नाही तर आम्हा शेतकऱ्यांना शेतीशिवाय उपाशी रहावे लागेल. कारण सध्या रेशनही मिळत नाही. त्यामुळे अशी नासधूस झाल्यास आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. गव्यांच्या रोजच्या वावरामुळे शेतीच्या कामाला न जाण्याचे शेतातील कामगारांनी पसंत केले आहे. त्यामुळे ठोस पावले उचलावीत असा इशारा चाफेखोल, माळगांव, वडाचापाट येथील सर्व शेतकऱ्यांनी दिला आहे.यावेळी शेतकरी कृष्णा जाधव, प्रकाश जाधव, रवींद्र साळुंखे, बंडू कदम, प्रमोद कदम, रवि साळकर, लवू वरक, शाहू वरक, रवींद्र जाधव, सुरेश खांबल, बाळा कदम उपस्थित होते. (वार्ताहर)