शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

मे महिन्यात उपलब्ध होणार भातबियाणे

By admin | Updated: April 23, 2015 00:34 IST

कृषी समिती सभा : २५ जणांना अडीच लाखांची भरपाई

सिंधुदुर्गनगरी : खरीप हंगामासाठी सुधारीत व संकरीत भातबियाणांची ५ हजार ६५३ क्विंटलची मागणी करण्यात आली असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भातबियाणे उपलब्ध होणार आहे. तसेच गेल्या आर्थिक वर्षात वणवा लागून नुकसान झालेल्या २५ जणांना अडीच लाख रूपयांची नुकसान भरपाई दिल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी दिली.जिल्हा परिषद कृषी समितीची तहकूब सभा उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात मंगळवारी झाली. यावेळी सदस्य विभावरी खोत, योगिता परब, समिती सचिव एस. एन. म्हेत्रे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. यावर्षी खरीप हंगामासाठी महाबीजकडून २३५५ क्विंटल सुधारीत बियाणे व २५५ क्विंटल संकरीत बियाणे तर खासगी कृषी सेवा केंद्रामार्फत २८१० क्विंटल सुधारीत बियाणे तर २३८ क्विंटल संकरीत बियाणे असे एकूण ५६५३ क्विंटल भाताची मागणी करण्यात आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भातबियाणे जिल्ह्यात दाखल होणार असून ते विक्रीस ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सभागृहात देण्यात आली.वणवा लागल्याने काजू, आंबा बागा जळून बेचिराख होतात. त्या संबंधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा प्रस्ताव कृषी समिती सभेत ठेवण्यात आला होता. त्यानुसार २६ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून त्यांना नुकसानीपोटी अडीच लाख रूपये देण्यात येणार आहेत.लहान शेतकऱ्यांना आपल्या परसबागेत भाजीपाला लागवडीसाठी पाणी सिंचन सुविधा मिळावी म्हणून एक अश्वशक्तीचे ६० पंप मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच या शेतकऱ्यांसाठी ७५ टक्के अनुदानावर शेडनेट देण्याची योजना बनविण्यात आल्याचे यावेळी देसाई यांनी सांगितले.मार्केटींग फेडरेशनने खरेदी केलेल्या २३ हजार ९९८ क्विंटल भाताची उचल न झाल्याने यावर्षी खतासाठी गोडावून उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होणार आहे. यावर हे भात खरेदी व्हावे यासाठीची निविदा प्रक्रिया करण्यात आली असून लवकरच त्याची उचल करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.यावर्षी पाच लाख रूपये खतासाठी तरतूद करण्यात आली आहे. कलमी रोपे बियाणे यासाठी ५० टक्के अनुदानावर प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)