शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मे महिन्यात उपलब्ध होणार भातबियाणे

By admin | Updated: April 23, 2015 00:34 IST

कृषी समिती सभा : २५ जणांना अडीच लाखांची भरपाई

सिंधुदुर्गनगरी : खरीप हंगामासाठी सुधारीत व संकरीत भातबियाणांची ५ हजार ६५३ क्विंटलची मागणी करण्यात आली असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भातबियाणे उपलब्ध होणार आहे. तसेच गेल्या आर्थिक वर्षात वणवा लागून नुकसान झालेल्या २५ जणांना अडीच लाख रूपयांची नुकसान भरपाई दिल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी दिली.जिल्हा परिषद कृषी समितीची तहकूब सभा उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात मंगळवारी झाली. यावेळी सदस्य विभावरी खोत, योगिता परब, समिती सचिव एस. एन. म्हेत्रे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. यावर्षी खरीप हंगामासाठी महाबीजकडून २३५५ क्विंटल सुधारीत बियाणे व २५५ क्विंटल संकरीत बियाणे तर खासगी कृषी सेवा केंद्रामार्फत २८१० क्विंटल सुधारीत बियाणे तर २३८ क्विंटल संकरीत बियाणे असे एकूण ५६५३ क्विंटल भाताची मागणी करण्यात आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भातबियाणे जिल्ह्यात दाखल होणार असून ते विक्रीस ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सभागृहात देण्यात आली.वणवा लागल्याने काजू, आंबा बागा जळून बेचिराख होतात. त्या संबंधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा प्रस्ताव कृषी समिती सभेत ठेवण्यात आला होता. त्यानुसार २६ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून त्यांना नुकसानीपोटी अडीच लाख रूपये देण्यात येणार आहेत.लहान शेतकऱ्यांना आपल्या परसबागेत भाजीपाला लागवडीसाठी पाणी सिंचन सुविधा मिळावी म्हणून एक अश्वशक्तीचे ६० पंप मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच या शेतकऱ्यांसाठी ७५ टक्के अनुदानावर शेडनेट देण्याची योजना बनविण्यात आल्याचे यावेळी देसाई यांनी सांगितले.मार्केटींग फेडरेशनने खरेदी केलेल्या २३ हजार ९९८ क्विंटल भाताची उचल न झाल्याने यावर्षी खतासाठी गोडावून उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होणार आहे. यावर हे भात खरेदी व्हावे यासाठीची निविदा प्रक्रिया करण्यात आली असून लवकरच त्याची उचल करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.यावर्षी पाच लाख रूपये खतासाठी तरतूद करण्यात आली आहे. कलमी रोपे बियाणे यासाठी ५० टक्के अनुदानावर प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)