शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

मे महिन्यात उपलब्ध होणार भातबियाणे

By admin | Updated: April 23, 2015 00:34 IST

कृषी समिती सभा : २५ जणांना अडीच लाखांची भरपाई

सिंधुदुर्गनगरी : खरीप हंगामासाठी सुधारीत व संकरीत भातबियाणांची ५ हजार ६५३ क्विंटलची मागणी करण्यात आली असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भातबियाणे उपलब्ध होणार आहे. तसेच गेल्या आर्थिक वर्षात वणवा लागून नुकसान झालेल्या २५ जणांना अडीच लाख रूपयांची नुकसान भरपाई दिल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी दिली.जिल्हा परिषद कृषी समितीची तहकूब सभा उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात मंगळवारी झाली. यावेळी सदस्य विभावरी खोत, योगिता परब, समिती सचिव एस. एन. म्हेत्रे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. यावर्षी खरीप हंगामासाठी महाबीजकडून २३५५ क्विंटल सुधारीत बियाणे व २५५ क्विंटल संकरीत बियाणे तर खासगी कृषी सेवा केंद्रामार्फत २८१० क्विंटल सुधारीत बियाणे तर २३८ क्विंटल संकरीत बियाणे असे एकूण ५६५३ क्विंटल भाताची मागणी करण्यात आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भातबियाणे जिल्ह्यात दाखल होणार असून ते विक्रीस ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सभागृहात देण्यात आली.वणवा लागल्याने काजू, आंबा बागा जळून बेचिराख होतात. त्या संबंधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा प्रस्ताव कृषी समिती सभेत ठेवण्यात आला होता. त्यानुसार २६ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून त्यांना नुकसानीपोटी अडीच लाख रूपये देण्यात येणार आहेत.लहान शेतकऱ्यांना आपल्या परसबागेत भाजीपाला लागवडीसाठी पाणी सिंचन सुविधा मिळावी म्हणून एक अश्वशक्तीचे ६० पंप मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच या शेतकऱ्यांसाठी ७५ टक्के अनुदानावर शेडनेट देण्याची योजना बनविण्यात आल्याचे यावेळी देसाई यांनी सांगितले.मार्केटींग फेडरेशनने खरेदी केलेल्या २३ हजार ९९८ क्विंटल भाताची उचल न झाल्याने यावर्षी खतासाठी गोडावून उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होणार आहे. यावर हे भात खरेदी व्हावे यासाठीची निविदा प्रक्रिया करण्यात आली असून लवकरच त्याची उचल करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.यावर्षी पाच लाख रूपये खतासाठी तरतूद करण्यात आली आहे. कलमी रोपे बियाणे यासाठी ५० टक्के अनुदानावर प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)